रत्नागिरी: माणूस किती शक्तिशाली असो किंवा मोठा राजकीय मराठी असो, कुटुंबीयांच्या बाबतीत तो हळवा असतो. अनकेदा मानलेली काही नाती ही कुटुंबाएवढीच जवळची असतात. त्यामुळे, सुख-दु:खाच्या लहान-सहान प्रसंगातून ही नाती उलगडली जातात. गुहागर (Ratnagiri) तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव (भास्कर जाधव) यांच्या घरी गेल्या 8 वर्षांपासून कामाला होती. आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न (विवाह) ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणीी करताना बापमाणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो, तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्या तरळले.
भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे आज लग्न होते, त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. डोळ्यातील रुमाल काढत त्यांनी आपले अश्रू पुसले. तसेच, स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की, ‘सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे, तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.’
भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेत, अनेकदा राजकीय मंडळींनाही त्यांचा प्रत्यय आलेला आहे. प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली, कोण वावगे वागले तर ते रोखठोकपणे बोलतात. मग ती व्यक्ती बाहेरची कोणी असो वा घरातली, त्याचा ते विचार करत नाहीत. ते कणखर आहेत, पण तेही किती हळवे आहेत हे आजच्या प्रसंगाने सर्वांसमोर आले. त्यामुळेच, सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही, जातीतली सुद्धा नाही. तरीदेखील वडील बनून ते तिच्या पाठीशी राहिले, हा त्यांचा विचार आणि कृती ग्रामस्थांना भारावून टाकून गेली. भास्कर जाधवांच्यात दडलेला बापमाणूस पाहून रत्नगिरीकरही गहिवरले.
मनोज जरांगे पाटलांना भोवळ,बीड दौरा अर्धवट सोडून थेट रुग्णालयात; डॉक्टरांनी दिली माहिती
अधिक पाहा..