नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतातील त्याच्या अधिकृत दर्जाशी जुळत नसलेल्या कारवाया केल्याबद्दल भारत सरकारने अयोग्य व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तान उच्चायोगाच्या चार्ज डी अफेयर्सना आज याबाबत एक डिमार्च जारी करण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Pune Live : पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नीने जीवन संपविलेपती आणि त्याच्या प्रियेसीच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १० मे रोजी दुपारी घडली असून माधुरी विकास कोकणे अस आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
Pune Live : कात्रज डेअरीकडून दुध विक्री दरात २ रुपयांची वाढपुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दुध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे कात्रज दूध ग्राहकांना फटका बसणार आहे. संघाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने तसेच वाहतुक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने सोमवारपासून (ता. १२) दूध विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सहमतीने घेतला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले आहे.
Nashik Live : तासाभराच्या पावसाने मुंबई- आग्रा महामार्ग जलमय- तासाभराच्या पावसाने मुंबई- आग्रा महामार्ग जलमय
- वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
- मुंबई आग्रा महामार्गावरील ओझरजवळ वाहतूक कोंडी
- गेल्या तासाभरापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा
- रस्त्यावर साचले पावसाचे पाणी,साचलेल्या पाण्याने रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप
- महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना पाण्यातून वाट काढणे झाले अवघड
- महामार्गावरच साचले आहे गुडघाभर पाणी
Solapur Live : सोलापुरातील दोन विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत मिळवले 35 टक्के गुणदोन्ही विद्यार्थ्यांनी 35 टक्के गुण मिळवत एसएससी परीक्षेत काठावर उत्तीर्ण झाले आहेत. शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शिवम वाघमारे हा सोलापुरातील श्री सिद्धेश्वर बालमंदिरचा विद्यार्थी आहे तर इम्रान शेख हा श्री मल्लिकार्जुन हायस्कुलचा विद्यार्थी. दरम्यान, शिवम वाघमारेने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या मित्र परिवाराने गुलाल उडवत जल्लोष साजरा केला आहे.
मॉन्सून एक आठवडा आधीच अंदमानमध्ये दाखल - IMDमॉन्सून एक आठवडा आधीच अंदमानमध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. त्यामुळं वेगानं मॉन्सून पुढे सरकत आहे.
Jammu And Kashmir : शोपिया हे ठिकाण दहशतवाद्यांच्या आकाचा अड्डा - कर्नल अभय पटवर्धनऑपरेशन किलर स्थानिक भाग असून शोपिया पश्चिमेला सीमेजवळ आहे. घनदाट जंगल आणि डोंगरदर्याचा भाग असल्यामुळं दहशतवादी नेहमी शोपियामध्ये येत असतात. शोपिया दहशतवाद्याचं मोठं केंद्र आहे. दहशतवाद्यांचे आका हे सगळे त्या भागात असतात. हा मारलेला एक शोपियाचा साथीदार आहे. जोपर्यंत याची अधिकृत माहिती सैन्याकडून येत नाही, त्याशिवाय त्यावर अधिकृतरित्या काहीही सांगता येणार नाही.
Dombivali Live: डोंबिवलीत कन्व्हेअन्स डीडच्या नावाखाली सोसायटी पदाधिकाऱ्यांची २४ लाखाची फसवणूकडोंबिवली पूर्वेतील टंंडन रस्ता भागातील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तुमचा सरकारी जमिनीवरील सात बारा उतारा तुमच्या सोसायटीच्या नावे करून देतो. या बदल्यात शासन शुल्क वगळून इतर खर्चासाठी सोसायटीतील एकूण १५ सदस्यांच्या माध्यमातून एका मध्यस्थाने (एजंट) सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून मागील तीन वर्षात २८ लाख ९३ हजार रूपये वसूल केले. त्यानंतर सोसायटी चालकांंना बनावट सात बारा उतारा आणि महसूल विभागाची काही कागदपत्रे सादर करून सोसायटी पदाधिकाऱ्यांची एकूण २४ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
Mumbai Live: गिरीश महाजन यांच्याविरुद्धचे बदनामीकारक व्हिडिओ हटवण्याचे आदेशमुंबई उच्च न्यायालयाने दोन युट्यूबर्सना महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध यूट्यूबवर अपलोड केलेले सहा व्हिडिओ “प्रथमदर्शनी बदनामीकारक” असल्याचे सांगत ते हटवण्याचे निर्देश दिले
Pune Live: पुण्यातील वाघोलीजवळ पती-पत्नीने राहत्या घरात घेतला गळफासपुण्यात वाघोली जवळ आव्हाळवाडीत पती पत्नीने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागनाथ वारुळे ( वय ४३ ) व त्यांची पत्नी उज्वला वारुळे ( वय ४० ) असे या दांपत्याचे नाव आहे. ते वाघोली येथील बाजारात फळ विकण्याचे काम करत होते. याबाबत वाघोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
PM Modi Live: भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला - पंतप्रधान मोदीआदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की भारतीय एअरफोर्सची ताकद जगाने पाहिली. भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला.
Nashik Live: नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरीनाशिकमध्ये देखील आजही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
Live: दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन केल्लर’ शोपियनमध्ये भीषण चकमकदहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन केल्लर’ शोपियनमध्ये भीषण चकमक
ऑपरेशन केल्लर :शोपियन १३ मे २०२५ रोजी शोकाल केल्लर परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींच्या गुप्त माहितीवर युनिटची कारवाई.
भारतीय लष्कराच्या शोध व नष्ट मोहिमेदरम्यान भीषण चकमक ३ कडवट दहशतवाद्यांचा खात्मा
Live: दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनची एंट्रीदक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनची एंट्री
दक्षिण भारतात पुढील ५ दिवस पाऊस, विजा व वादळाचा इशारा
ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज
उ.प्रदेश, राजस्थान, झारखंड व गंगेचा प.बंगालात उष्णतेची लाट
Live: सीबीएसई बारावी निकाल जाहीर: यंदा ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण, गेल्या वर्षाच्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी वाढसीबीएसई बारावी निकाल जाहीर: यंदा ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण, गेल्या वर्षाच्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी वाढ.
मुलींनी मुलांपेक्षा ५.९४ टक्क्यांनी अधिक यश मिळवत ९१% हून अधिक मुली उत्तीर्ण!
Jammu and Kashmir LIVE Updates: सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना युद्धबंदी हवी आहे; जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्रीजम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, "...येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर फक्त आर्थिक नुकसान झाले आहे... येथे सामुदायिक बंकर बांधण्यात आले होते पण त्यांची फार काळ गरज नव्हती आणि अनेक वर्षांपासून नवीन बंकर बांधण्यात आलेले नाहीत... आपल्या सर्वांना युद्धबंदी सुरू राहावी असे वाटते... सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना युद्धबंदी हवी आहे. आता ही युद्धबंदी सुरूच राहावी..."
Jammu and Kashmir LIVE Updates: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी ठारकाश्मीर: दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील केल्लरच्या शुक्रू वनक्षेत्रात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी ठार झाले आहेत.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, काही अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर केल्लर जंगलात मोठ्या प्रमाणात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली.
पोलिस आणि लष्कराच्या पथकाने शोध मोहीम सुरू करताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. गोळीबारात लष्करचे तीन दहशतवादी ठार झाले.
Maharashtra Board 10th Result LIVE: दहावी बोर्डाचा निकाल ऑनलाईल जाहीरदहावी बोर्डाचा निकाल ऑनलाईल जाहीर झाला आहे. तुम्ही रोल नंबर टाकून निकाला पाहू शकता.
मोदींनी आदमपूर एअर बेसवर जवानांची घेतली भेटमोदींनी आदमपूर एअर बेसवर जवानांची भेट घेतली आहे.
Monsoon Rain LIVE Updates: अवकाळी पावसामुळे हवेत गारवाराज्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. तसेच पावसाला सुरुवात झाली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सीडीएस आणि प्रमुखांसह उच्चस्तरीय सुरक्षा बैठकसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सीडीएस आणि प्रमुखांसह उच्चस्तरीय सुरक्षा बैठक.
जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात केलर परिसरातील शुकरु जंगलात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा. जंगल परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू
12th CBSE Result: बारावी सीबीएसई निकालात जवाहर नवोदय विद्यालय प्रथम, ९९.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्णबारावी सीबीएसई निकालात जवाहर नवोदय विद्यालयाने देशात प्रथम स्थान पटकाविले आहे. देशात असलेल्या या विद्यालयातील ९९.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय केंद्रीय विद्यालयातील ९९.०५ टक्के,एसटीएसएस शाळांमधील ९८.९६ टक्के, शासकीय अनुदानित विद्यालयातील ९१.५७ टक्के, शासकीय ९०.४८ तर खासगी शाळेतील ८७.९४ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकले.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, नागपूर विभाग सर्वात मागेराज्याच्या दहावीच्या परीक्षेत सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाचा विचार केला असता, कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के इतका असून तो राज्यातील सर्वाधिक आहे. याउलट, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ९०.७८ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यातील विविध विभागांतील निकालात दिसणारी ही टक्केवारी शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि शालेय व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेचा आरसा आहे.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचे यशराज्यातील दहावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. विशेष बाब म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी ८,८४४ जण उत्तीर्ण झाले असून, त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२७ इतकी आहे. ही टक्केवारी राज्याच्या एकूण निकालाच्या तुलनेत लक्षणीय असून, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आणि मेहनतीला सलाम करणारी आहे.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: दहावी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा सर्वोत्कृष्ट निकालराज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतलेल्या दहावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण २४,३७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २३,९५४ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ९,४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळं एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३९.४४ इतकी नोंदवली गेली आहे. विभागवार निकाल पाहता, कोकण विभागाने ९८.८२ टक्के उत्तीर्णतेसह सर्वोच्च कामगिरी केली आहे. त्यानंतर कोल्हापूर ९६.८७%, मुंबई ९५.८४%, नाशिक ९३.०४%, अमरावती ९२.९५% आणि लातूर ९२.७७% अशा क्रमाने निकाल लागला आहे. या निकालांवरून कोकण आणि कोल्हापूर विभागांनी पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, कोल्हापूर व मुंबईचीही उज्वल कामगिरीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने सर्वाधिक ९८.८२ टक्के उत्तीर्णतेसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर विभागाने ९६.८७ टक्के आणि मुंबई विभागाने ९५.८४ टक्के टक्केवारीसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. पुणे विभागाचा निकाल ९४.८१ टक्के, नाशिकचा ९३.०४ टक्के, अमरावतीचा ९२.९५ टक्के, औरंगाबादचा ९२.८२ टक्के आणि लातूरचा ९२.७७ टक्के इतका आहे. नागपूर विभागाचा निकाल तुलनेने सर्वात कमी म्हणजेच ९०.७८ टक्के नोंदवला गेला आहे. यंदा राज्यभरात एकंदर उत्तीर्णतेचा दर्जा समाधानकारक असून विविध विभागांनी एकसंध आणि स्थिर प्रगती साधली आहे.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: दहावीच्या निकालात मुलींची यशस्वी बाजीराज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपली बाजी मारली आहे. राज्यभरात सरासरी ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतानाच मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९६.१४ टक्के आहे, तर मुलांची ९२.३१ टक्के आहे. यामध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा तब्बल ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा कोकण विभागाने ९८.८२ टक्के निकालासह सर्वाधिक यश मिळवलं असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यांच्या यशामध्ये मुलींचा पुढाकार स्पष्टपणे दिसून येतो.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर – ८०.३६ टक्के उत्तीर्णताराज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण २८,५१२ खाजगी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २८,०२० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले आणि त्यापैकी २२,५१८ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. यानुसार एकूण उत्तीर्णतेचा दर ८०.३६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे, जो खाजगी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून समाधानकारक मानला जात आहे.
Maharashtra Board 10th Result 2025 LIVE Updates: १४,५५,४३३ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्णमहाराष्ट्र राज्यातील दहावी परीक्षेसाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले, आणि त्यामधील १४,५५,४३३ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी असून, राज्यभरातून विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे.
10th Result 2025 LIVE Updates : दहावीचा निकाल जाहीर, यंदा ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्णमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून यंदा एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला सीट नंबर टाकून निकाल पाहता येईल. यंदाही मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात थोडीशी वाढ झाली असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
10th Result LIVE Updates : दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणारमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाबाबत बोर्डाची पत्रकार परिषद सकाळी 11 वाजता पार पडेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपला निकाल ऑनलाइन पाहता येईल. अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि result.mh-ssc.ac.in या वेबसाईट्स उपलब्ध असतील.
10th Result LIVE Updates :10वीचा निकाल पाहताना सीट नंबर चुकल्यास काय कराल?दहावीचा निकाल पाहताना अनेकदा विद्यार्थ्यांकडून सीट नंबर चुकीचा टाईप होतो, त्यामुळे निकाल दिसत नाही. हे टाळण्यासाठी लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा सीट नंबर वेगळा असतो. जर तुमचा सीट नंबर विसरलात किंवा चुकीचा भरला, तरी घाबरू नका — आईचं नाव टाकून सुद्धा निकाल पाहता येतो. त्याचप्रमाणे, जर आईचं नाव चुकीचं भरलं गेलं, तरी तुम्ही बरोबर सीट नंबर टाकून निकाल पाहू शकता. त्यामुळे रिझल्ट चेक करताना ही दोन्ही माहिती बरोबर असणं फार महत्त्वाचं आहे.
10th Result Live Update: ११ वाजता पत्रकार परिषद... त्यानंतर १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकालमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये निकालाची टक्केवारी, यशस्वी विद्यार्थी, जिल्हानिहाय कामगिरी आणि अन्य महत्वाची माहिती जाहीर केली जाईल. निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार असून, विद्यार्थ्यांना आपल्या आसन क्रमांकाचा वापर करून निकाल तपासता येणार आहे.
Mumbai Live: घाटकोपरमध्ये पुन्हा रिमझिम पावसाची हजेरी, दुर्दैवी दुर्घटनेची आठवण ताजीमुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्या असून भांडुप, विक्रोळी, पवई आणि घाटकोपर परिसरात सकाळपासूनच हवामानात गारवा जाणवत आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी मागच्या वर्षी घाटकोपरमध्ये घडलेल्या भीषण होर्डिंग दुर्घटनेत अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. त्यामुळे आजच्या या पावसात त्या हृदयद्रावक घटनेच्या आठवणी स्थानिकांच्या मनात पुन्हा ताज्या झाल्या आहेत. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Punjab : अमृतसरमध्ये विषारी दारूने १४ जणांचा बळी, अनेकजणांची प्रकृती गंभीरअमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ११ मे रोजी दारू खरेदी केलेल्या आणि प्यायलेल्यांपैकी अनेकांचा सोमवारी सकाळीच मृत्यू झाला होता. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai : राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट, तासभर चर्चाशिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात बोलणं झाल्याची चर्चा सुरू आहे.
Nashik Rain : नाशिकला अवकाळीने झोडपलं, पिकांचं प्रचंड नुकसाननाशिक जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं असून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कांदा, आंबा, डाळिंब, टोमॅटोसह पिकं मातीमोल झाली आहेत. नाशिक जिल्ह्याला येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Air India And Indigo: एअर इंडिया आणि इंडिगोने ७ शहरातील विमान उड्डाणे केली रद्दभारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी अद्याप तणाव पूर्ण निवळलेला नाही. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडियाने सात शहरातील विमान उड्डाणं रद्द केली आहेत. यात जम्मू, अमृतसर, चंदिगढ, लेह, जोधपूर, भूज, जामनगर, राजकोट यांचा समावेश आहे.
Marathwada : मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान, वीज पडून ६ जणांचा मृत्यूमराठवाड्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असून गारपिटीचा फटका फळबागांना बसलाय. अवकाळी पावसात वीज पडून ६ जणांचा मृत्यू झाला असून १४ जनावरंही दगावली आहेत.
Mumbai Rain : राज्यात ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुंबईत पावसाला सुरुवातराज्यात कोकणसह विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. मुंबईत आज सकाळपासून अनेक भागात पाऊस पडत आहे. राज्यातील ६ जिल्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
Pune Rain : पुण्यात पुढील ४ दिवस पावसाचा यलो अलर्टपुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलीय. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळालाय. दरम्यान, पुढचे चार दिवस पुणे शहराला यलो अलर्ट देण्यात आलाय.
Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यूबुलढाण्यातील भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात घडला. पहाटे साडेचार वाजता नांदुरा शहराजवळ कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Belgaum Police : सोशल मीडियावरील वादग्रस्त १४ पोस्ट हटविल्याबेळगाव : सोशल मीडियावरील वादग्रस्त १४ पोस्ट हटविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील जलाशय, धरण तसेच संवेदनशील परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.’
Satej Patil : आलमट्टी धरणप्रश्नी काँग्रेसचे रविवारी 'चक्का जाम' आंदोलनकोल्हापूर : ‘कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. याला विरोध करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. यासाठी रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता जयसिंगपूरजवळील अंकली नाक्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे’, अशी घोषणा आज येथे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
CUET-UG परीक्षा आजपासून होणार सुरू, किती तारखेपर्यंत चालणार परीक्षा?सीईयूटी यूजी आणि जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा नियोजित वेळेनुसार होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर या परीक्षांवर संकट आले होते. मात्र, आता दोन्ही देशांमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर, परीक्षा त्यांच्या नियोजित वेळेनुसार होतील. या परीक्षा १३ मे ते ०३ जून दरम्यान होणार आहेत.
Kolhapur News : कुत्र्याने चावा घेतल्याने ‘केअर टेकर’वर गुन्हाकोल्हापूर : आर. के. नगर येथील शिवाजी उद्यानात सहा वर्षांच्या बालकाला कुत्रा चावल्यामुळे केअर टेकरवर गुन्हा दाखल झाला. श्रावण पडळकर (रा. पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात राहुल रमेश खाडे यांनी फिर्यादी दिली आहे. त्यांचा मुलगा पृथ्वीराज याला रविवारी सायंकाळी कुत्रा चावल्याची फिर्याद त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'च्या गुरुवारच्या बैठकीत अध्यक्षांबाबत निर्णय शक्यकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) कार्यकारिणी बैठक १५ मे रोजी होत आहे. या बैठकीत अध्यक्ष बदल होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावेळी विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे राजीनामा देणार की नाहीत, हे निश्चित होईल. अद्याप तरी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबात नेत्यांचा कोणताही निरोप नसल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत काय होणार, यावर पुढील अध्यक्ष ठरणार आहे.
Shiv Sena Thackeray Group : शिवसेना ठाकरे गटाची १७ ला मुंबईत बैठककोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची १७ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे. या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेतला जाणार आहे. यासाठी बूथ, गट, तालुका, जिल्हानिहाय निवडणूक तयारीची माहिती घेतली जाणार आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या जिल्हानिहाय सभांचे नियोजन होणार आहे.
Indian Army : जालंधरला भारतीय सैन्य दलाने पाकचे दोन ड्रोन पाडले; जम्मूवर घिरट्याचंदीगड : पंजाबमधील जालंधरमध्ये भारतीय सैन्य दलाने रात्री एक संशयित ‘ड्रोन’ निष्क्रिय केल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, सांबा, राजौरी, जम्मू, कथुआ अमृतसर, होशियारपूरसह वैष्णव देवीला जाणाऱ्या रस्त्यांवरही ब्लॅक आउट करण्यात आले.
10th Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता होणार जाहीरपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी (ता. १३) दुपारी एक वाजता ऑनलाइन माध्यमातून जाहीर होणार आहे.
Donald Trump : अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे अणुसंघर्ष टळला; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाLatest Marathi Live Updates 13 May 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (ता. १३) दुपारी एक वाजता ऑनलाइन माध्यमातून जाहीर होणार आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानचे बरेच नुकसान केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधतानाच पाकिस्तानला दम दिला. ‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय न घेतल्यास दोन्ही देशांसोबतचा व्यापार थांबविण्याचा इशारा मी दिला. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांमध्ये आण्विक संघर्षामध्ये रूपांतरित होऊ शकणाऱ्या परिस्थितीला टाळता आले आहे,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) कार्यकारिणी बैठक १५ मे रोजी होत आहे. या बैठकीत अध्यक्ष बदल होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची १७ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे. पाकिस्तानविरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याच्या उद्देशाने भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..