ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर कटकमधील पहिल्या टी 20i सामन्यात 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी हार्दिकचा अपवाद वगळता तिलक वर्मा आणि अक्षर पटेल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र टॉप ऑर्डरमधील तिन्ही फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना बचाव करण्यासाठी कमी धावा मिळाल्या. आता भारतीय गोलंदाज या मैदानात कशी बॉलिंग करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.