ओमानच्या आखातात एक धक्कादायक घटना घडली. भारतीय तेलवाहू जहाजावर मोठा मिसाईल हल्ला करण्यात आला. या जहाजावर सर्व भारतीय नागरिक होते. अमेरिकेने ही कारवाई जहाजावर केल्याची माहिती आहे. मोठे मिसाईल जहाजावर टाकले. त्यानंतर या रिकाम्या एमटी मारिव्हेक्स या तेलवाहू जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि त्याला आग लागली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी जहाजावर एकून 24 भारतीय खलाशी होते. त्यांनी जहाजावर हल्ला झाल्यावर तात्काळ थेट भारतीय तटकक्षक दलासोबत संपर्क केला आणि या हल्ल्याची माहिती दिली. एमआरसीसी मुंबई यांनी तात्काळ या हल्ल्याबाबत माहिती ओमानच्या अधिकाऱ्यांना दिली. ओमानच्या अधिकाऱ्यांनी लगेचच मदतकार्य राबवले. मिसाईल हल्ल्यानंतरही जहाजावरील सर्व 24 भारतीय खुलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 8 जून 2026 रोजी दुपारी 2.20 वाजता घडली. एमआरसीसी मुंबई यांना सूचना मिळाली की, पलाऊ ध्वज असलेल्या तेलवाहू जहाज एमटी मारिवेक्स याच्यावर ओमानजवळ हल्ला झाला. जहाजावर 24 लोक होती, सर्वजण भारतीय नागरिक आहेत. ही माहिती मिळताच मुंबई एमआरसीसी यांनी ओमानच्या समुद्री मदत बचावकार्याला संपर्क केला.
त्यानंतर शोध सुरू झाला. मदतकार्याकरिता हेलीकॉप्टर पाठवण्यात आली. सायंकाळी 5 वाजता ओमानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व 24 भारतीयांना सुरक्षित काढले आहे. तोपर्यंत भारतीय एजन्सी सतत ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या. या मोठा हल्ला तेलवाहू जहाजावर करण्यात आला. हे जहाज रिकामे होते. मात्र, हल्ल्यानंतर जहाजाला मोठी आग लागली. इराणच्या बंदराकडे जाण्याचा हे जहाज प्रयत्न करत होते. यादरम्यानच अमेरिकेच्या लष्कराने अमेरिकेची तटबंदी तोडल्याचे सांगत या जहाजावर मोठा हल्ला केला.
यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांनी वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. हल्ल्यानंतर जहाजाने इराणच्या बंदराकडे जाणे थांबवले. एएनआयच्या सूत्रांनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या हल्ल्याची दखल घेतलेली नाही. 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची त्यांनी पुष्टी केली आहे. मात्र, या हल्ल्यानंतर तणाव पुन्हा एकदा वाढस्याचे बघायला मिळत आहे.