रविवारी (6 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिलने नाबाद 61 धावा केल्या. त्याआधी, मोहम्मद सिराजच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर संघाने हैदराबादला 152 धावांवर रोखले. सिराजने डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या, ज्यात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश होता, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर सिराज म्हणाला की, टीम इंडियामधून वगळण्याचा निर्णय त्याला पचवता येत नाही. हैदराबादमधील त्याच्या घरच्या मैदानावर खेळणे हा एक आनंददायी अनुभव असल्याचे सांगताना सिराज म्हणाला की, कुटुंबासमोर खेळल्याने आत्मविश्वास मिळतो.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, “जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावर येता तेव्हा एक वेगळीच भावना असते. कुटुंबही पाहत असते आणि यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. मी आरसीबीमध्ये सात वर्षे खेळलो आहे, मी आरसीबीसाठी खेळत असताना चढ-उतार आले. माझ्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मी केलेले काम मला मदत करत आहे. ब्रेक दरम्यान, सुरुवातीला मी ते (टीम इंडियामधून बाहेर पडणे) पचवू शकलो नाही. पण नंतर मी स्वतःला समजावून सांगितले की मी खूप गोष्टींची योजना आखली आहे. हे (चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून बाहेर पडणे) व्हायला नको होते, परंतु मी माझ्या मानसिकतेवर, माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. आता मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेत आहे. जेव्हा तुमची भारतीय संघात निवड होत नाही, तेव्हा तुमच्या मनात येते की तुम्ही चांगले आहात का. पण मला आयपीएलसाठी तयार राहायचे होते. जेव्हा तुम्ही जे करायचे ते करत असता तेव्हा तुम्ही चांगल्या स्थानी असता. जेव्हा चेंडू तुम्हाला जे हवे ते करत असतो तेव्हा ते एक वेगळीच भावना देते आणि ते खरोखर आनंददायी वाटते.”
मोहम्मद सिराज चॅम्पियन्स ट्रॉफी संघात नव्हता, त्याला नॉन-ट्रॅव्हलिंग राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले. तो काळ सिराजसाठी खूप कठीण होता कारण त्याला त्याच्या आयपीएल संघ आरसीबीनेही कायम ठेवले नव्हते, तो एका नवीन संघाचा भाग बनला होता.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 विकेट घेत मोहम्मद सिराजने पर्पल कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत, तो फक्त पहिल्या सामन्यातच चांगला नव्हता तर त्यानंतर त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे.