Maharashtra Live Update : बारावीचा निकाल 91.88 टक्के
Sarkarnama May 05, 2025 09:45 PM
बारावीच्या निकालात कोकणची बाजी

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकालपत्र मिळणार आहे. यंदा बारावीच्या निकाल 91 टक्के लागला आहे. यामध्ये कोकणने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल तब्बल 96.74 टक्के लागला आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ : असदुद्दीन ओवैसी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला समजवण्याची नाही तर धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य एमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी यांनी केले आहे. पाकिस्तान हे निर्लज्ज आणि अपयशी राष्ट्र आहे. त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली असल्याचेही ओवैसी म्हणाले.

मुळशी बंदची हाक

मुळशीतील पौडमधील मंदिरात देवीच्या मुर्तीच्या विटंबना करणाऱ्यावर कडक करावई करावी, यामागणी आज (सोमवार) मुळशी बंदची हाक देण्यात आली आहे. पौडमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला प्रतिसाद दिला आहे.

लवकरच भाजप शिंदेंची शिवसेना फोडेल - संजय राऊत

महायुतीमध्ये सगळं काही ठिकठाक चाललेल नाही. तिन्ही पक्ष एकमेकांना गिळायला बसलेत. लवकरच भाजप एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडेल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

BJP Vs Congress : काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा! चंद्रशेखर बावनकुळेंचा विधानानं खळबळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामा करा, असा कानमंत्र बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांनी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

Solapur Update : सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी हिंदुत्ववादी संघटनांशी चर्चा करत, इथं मटण मार्केट होणार असल्याचे सांगितलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये बीफ मार्केट होऊ देणार नसल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगताना, महापालिकेकडून प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट उल्लेख झाला. त्याबाबत लवकरच महापालिका शुद्धीपत्रक काढणार असल्याचे सांगितले जाते.

Chandrakant Navghare : 'असे धंदे करू नका, शिक्षकांना पैसे मागू नका'; राष्ट्रवादीचा आमदार शिक्षण विभागावर संतापला

शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेतील मुख्याध्यापकांना पैशाची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे शिक्षण अधिकाऱ्यांच्या या प्रकारावर चांगलेच भडकले आहेत. असे धंदे करू नका, शिक्षकांकडून पैसे खाऊ नका, अशी तंबी आमदार नवघरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिली आहे.

Mahayuti Government : नागपूर, नाशिक, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी महायुती सरकार 750 कोटींचे अर्थसाह्य देणार

नागपूर, नाशिक, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा परवाना वाचवण्यासाठी शेवटीची संधी म्हणून, या बँकांना सुमारे 750 कोटींचे अर्थसाह्याचा हातभार देण्याच्या हालचाली महायुती सरकार दरबारी सुरू आहे. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे या तिन्ही जिल्ह्यातील मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत.

Pahalgam Attack : भारतीय जहाजांना पाकिस्तानात बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानावर जहाजबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय ध्वजधारी जहाजांना त्यांच्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आणि पाकिस्तानी जहजांच्या बंदरांमध्ये प्रवेशावर भारताने बंदी घातली आहे.

Pahalgam Terror Attack : हवाई दलप्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे सुरक्षा परिस्थितीवर दोघांनी भेट महत्त्वाचे ठरते. या दोघांमध्ये सुरक्षाच्या दृष्टीने गंभीर मुद्यांवर चर्चा झाली.

Jammu and Kashmir Army jawan accident : लष्कराचा ट्रक 700 फूट दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ही अपघात झाला. बॅटरी चष्माजवळ जात असताना लष्कराचा ट्रक 700 फूट दरीत कोसळला.

Accident News : कर्नाळा घाटात खासगी बसचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू, तर 19 जण जखमी

कर्नाळा अभयारण्यमधील घाटात रविवारी रात्री खासगी बसला झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.