एकीकडे भारत पाकिस्तानवर हवेतून हल्ले करत असतानाच आता पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढावलं आहे. कारण मध्यरात्री 1.44 मिनिटांनी पाकिस्तान भुकंपाने हादरलं आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागून हे हल्ले करत असतानाच भूंकपामुळे पाकिस्तानमध्ये भितीचं वातावरण आहे.
Pakistan drone attack : पाकिस्तानने फतेह 1 क्षेपणास्त्र दिल्लीवर डागलेपाकिस्तानने आता थेट भारताची राजधानी दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारताने परतवून लावला. हरियाणातील सिरसामध्येच पाकचे फतेह 1 क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलं. पाकिस्तानकडून जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर आणि बियास एअर बेसवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.