सिंधुदुर्ग : मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji maharaj statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील (Sindhudurg) मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब असून त्याच तेजाने आणि स्वाभिमाने हा पुतळा उभा झालाय. मालवण किल्ल्यावर दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत पुन्हा हा पुतळा प्रस्थापित करू शकलो. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे भोसले आणि रविंद्र चव्हाण यांचा काळात काम वेगाने झालं. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.
आयआयटीचे अभियंते आणि जे.जे महाविद्यालयीतल शिल्पकार हे पुतळा घडवताना सोबत होते. त्यामुळेच, जरी वादळं आली, तरी त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. जवळपास 93 फुट ऊंच हा पुतळा असून 10 फुटाचा चबुतरा देखील आहे. विशेष म्हणजे देशातला सर्वात उंच पुतळा देखील हा आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात पुतळा टिकेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुतळ्याच्या मेन्टेनन्सची जबाबदारी पुढील 10 वर्षांसाठी कंत्राटदार यांच्याकडेच असेल. आम्ही निर्धार केला होता कुठल्याही परिस्थितीत महाराजांना साजेसा पुतळा उभारू तो पूर्ण झालाय, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
पुतळा कोसळल्यानंतर नेमका तो का पडला असेल याची कारणं शोधली आणि त्यानंतर ह्या पुतळ्याची उभारणी केल्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितले. या आधीच्या पुतळ्यात फक्त लोखांडाचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे त्याला 3-4 महिन्यांत जंग लागला. त्यामुळे, ह्या पुतळ्याची उभारणी करताना आम्ही ब्रॉन्झ, झिंकसारख्या धातूंचा वापर केला. हेच धातू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती करताना देखील वापरत आहोत. अशात, दीर्घकाळ हा टीकावा असं नियोजन केलं. तसेच, दुसरीकडे चक्रीवादळात देखील पुतळा टिकेल याचे नियोजन केल्याचे अनिल सुतार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, महाराजांच्या पुतळ्याची उंची 60 फुट आहे, एकूण पुतळ्याची उंची तलवारीपर्यंत 93 फूट आहे. सोबतच, चबुतरा 10 फुटाचा आहे, असेही त्यांनी म्हटले.
अधिक पाहा..