सातारा : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मॉन्सून पूर्व पावसामुळे सात तालुक्यातील २१३. ७९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. १०.९५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा बाधित झाल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ५९.०२ लाखांचे शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सध्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु असून या नुकसानीत आणखी वाढ होणार आहे. यामध्ये पश्चिमेकडील पाटण, सातारा आणि वाई तसेच कोरेगाव यासह पूर्वेकडील माण,खटाव, फलटण, तालुक्यांचा समावेश आहे.
शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी व इतर विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच नेमक्या नुकसानीचे अंतिम आकडे समजतील. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे भरपाईसाठी पाठवले जातील.
- संतोष पाटील (जिल्हाधिकारी सातारा)
नुकसानीची स्थिती अशीघरे पडली- ११६५
लहान-मोठी मृत जनावरे- २६
कोंबड्यांचा मृत्यू- १५०
शेतकऱ्यांचा मृत्यू- दोन
६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली मंडले-५०