बारामती : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य 5 वर्षापूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केले होते. या वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपावरुन 2020 मध्ये कोरोनाच्या काळात राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना बारामती कोर्टात दाखल केले होते. मात्र, या केस संदर्भात जामीन घेतल्यानंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर यांनी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या नावाने अटक वॉरंटही जारी केले होते.(Gopichand Padalkar Acquitted Over Remark Calling Sharad Pawar “Corona for Maharashtra”)
दरम्यान पडळकर यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भातीसल या केसचा निकाल बारामतीच्या कोर्टात आज पार पडला. कोर्टाने चार साक्षीदार तपासल्यानंतर आज याबाबतचा अंतिम निकाल जाहीर केला. त्यामध्ये पडळकरांच्या वक्तव्यामुळे कोणतेही जातीय दंगे त्यांचे विधान हे व्यक्तीसाठी होते, त्यामुळे कोणताही सामाजिक तेढ निर्माण झाला नाही, असं निरीक्षण नोंदवत आमदार गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आणि राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावायचं आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे. मला वाटत नाही ते धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते.
हेही वाचा…Eknath Khadse : यांच्यासारख्यांनी माझ्या भाच्याला…, खडसेंचा मंत्री महाजनांवर गंभीर आरोप