योगेश पायघन
छत्रपती संभाजीनगर : ‘ज्यांचे हात धरून मोठे झाले. त्यांच्याविरोधात अहंपणे बोलत असाल तर दुर्दैव आहे. इतका अहंकार बरा नाही. जे निवडून आहे त्यांना विचारा कसे निवडून आले. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जिंकणे शक्य नव्हते. त्यामुळे कुण्या एकाने श्रेयवादात जावू नये. स्थानिक पातळीवर युती व्हावी असे शिवसेनेचे धोरण आहे. पण, त्यांना वाटते युती होऊ नये त्यांनी पक्षाच्या प्रमुखांना कळवावे. मात्र, जाहीर वाच्यता करू नये. त्याचा परिणाम मतदारांवर होतो.’ असे भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.
घमेंड करू नका युती तोडली तर पच्छाताप होईल या शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत टोलाही लगावला. ते म्हणाले, स्थानिक भाजप नेते अत्यंत जोशात आहे. आम्ही काय बोलाव, काय बोलू नये आम्ही बघू. आम्ही त्यांच्याच मुळे उठाव केला आणि सत्तेत आलो, आणि ते कुणामुळे आले असा सवाल करत उपरोधात्मक टोलाही लगावला. मंत्री शिरसाट म्हणाले.
मुंबई ठाणे मनपा निवडणुकीत मोठा भाऊ कोण? या प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हे करतात. फीडबॅक घेत असतात व अहवाल पक्षाकडे सादर केला जातो. विधानसभेत असे सर्व्हे झाले. मात्र, त्यातील ८० टक्के सर्व्हे चूक निघाले. या अंदाजावर राजकीय गणित बांधणे चुकीची आहे. मात्र, पक्षाची परिस्थिती काय याचा आढावा अशा सर्व्हेतून घेतले जातात. कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ अजून हे ठरलेले नाही. याला अजून वेळ आहे. आजच्या घडीला सांगणे नाही. आता जर सांगितलं की कोण मोठा आणि कोण छोटा तर वाद होईल. कोण कुठल्या ठिकाणाहून लढत आहेत त्यानंतर सर्व्हेला महत्व राहील. हा प्राथमिक सर्व्हे यानंतर अजून दोन सर्व्हे होतील. राज -उद्धव ठाकरे एकत्र आल्यास फरक पडणार नाही. हा फक्त अंदाज आहे, हा सर्व्हे आहे, असेच घडेल असे मानून चालणे योग्य नाही. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे, मोठा भाऊ कोण हे निवडणुकीवेळी ठरेल. असेही ते म्हणाले.
नाराजीची वाच्यता न करण्याचा शिंदेंचे आदेश
मंगळवारी झालेली बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत होती, संघटन बाबतीत होती. काम करताना काय काय अडचणी येतात या बाबत आमदारानी सांगितले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे. कुठेही वाच्यता करू नका. तिन्ही नेते मिळून मार्ग काढू. आदित्य ठाकरे म्हणतात जे येईल त्याच्या सोबत युती करू. आदित्य ठाकरेंनी स्पष्ट बोंबलायला पाहिजे की, राज ठाकरे येत असेल तर स्वागत करू. उद्या ओवेसीं आणि अबू आझमी सोबत आले तर घ्याल का? बेसलेस वक्तव्य आहे. असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.
हॉटेल खरेदी हा विषय माझ्यासाठी संपला
‘हॉटेल हा विषय माझ्यासाठी संपला आहे. पण, ज्यांना खोदकाम करायचे आहे त्यांनी करावे. संजय राऊत उबाठा बुडवत आहे. म्हणून काँग्रेस बाजूला आहे. शरद पवार यांना जाणीव होती म्हणून पवारांनी त्यांना मोहिमेवर ठेवले होते. असा आरोपही त्यांनी केला. तर उबाठा आंदोलन करणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, अडीच वर्षात तुम्ही काय केले? आंदोलन करा. मात्र, नाचू नका, वरातीत घोड्यासमोर नाचता तसे नाचू नका. इतर पक्षात पाहू नका, आपल्या पक्षात काय चला बघा. आमच्या पक्षात चंद्रहार पाटील प्रवेश करीत आहे. हिम्मत असेल तर थांबवून दाखवा. असे आव्हानही मंत्री शिरसाट यांनी दिले.