मुंबई : पावसाळा सुरु झाल्याने साप उष्णतेसाठी मानवी वस्तीत येत आहेत. बीकेसी परिसरात शनिवार ते बुधवार या पाच दिवसात अजगरची १२ पिल्ले मिळाली असून त्यापैकी एका पिल्लाचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे.
सेबी भवनात अजगराची पिल्ले रस्त्यावर फिरत असल्याचा मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास वापरा संस्थेला फोन आला. संस्थेने वन विभाचे रांउड हाॅफीसर रोशन शिंदे व मुंबई रेंज कंट्रौल यांना याबाबत फोन करून कळवण्यात आले. याठिकाणी सर्पमिञ अतूल कांबळे व माहीम पोलीस वसाहतीमध्ये राहणारे सर्पमिञ पोलीस कॉन्स्टेबल सचीन मोरे हे घटनास्थळी दाखल झाले.
गेल्या शनिवारी पहिला साप असल्याचा कॉल आला होता. त्यावेळी सदर सेबी भवनातील सुरक्षा रक्षकांना आधी चार अजगरचे पिल्ले मिळाली होती त्यांनी ती मिठी नदीच्या आवारात असलेल्या खार-फुटीच्या खाडीत सोडली होती.
सर्पमित्र मंगळवारी बीकेसी येथे गेले असता पहिले पिल्लू हा सेबी भवन बाहेर पादचारी मार्गावर भेटला. त्याला रेसक्यू करून झाल्यावर सर्प मित्राने आजू-बाजूचा परिसर सर्वे केला. त्यावर रस्त्यावर एक अजगराची गाडी खाली आल्यामुळे मृत अवस्थेत दिसले.
शनिवारी जिथे साप भेटला त्याचठिकाणी दगडाखाली दूसरा, गटाराच्या चेंबर मध्ये तीसरा,तर सेबी भवनासमोरील गार्डनाला उभारलेल्या लाद्यामध्ये चौथा असे एकूण ५ अजगरांची पिल्ले राञी दीड-पावने दोन वाजेपर्यंत सापडली. सकाळी पोलिस हवालदार मुरलीधर जाधव यांनी एक अजगराचा पिल्लू रेसक्यू केले. तर बुधवारी दुपारी याठिकाणी एक पिल्लू मिळाले, असे एकूण १२ पिल्ले मिळाली.
वार - मिळालेली अजगर पिल्ले
शनिवारी - ५
मंगळवारी - ६
बुधवार - १
रहिवाशांनी या भागात रस्त्यावर वाहने उभी करू नयेत किंवा अडचणीच्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत. तसेच कोणत्याही सापाला पकडू नये. साप निघाल्यास जवळील सर्पमिञ किंवा वन-विभागाशी संपर्क साधून सापाची माहिती द्यावी.
- अतुल कांबळे, सर्पमित्र