Jalna Accident : खासगी कामानिमित्त बाहेर पडले, ट्रक अन् दुचाकीच्या अपघातात दोन जिवलगांचा अंत; अख्ख्या गावाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा
Saam TV June 09, 2025 05:45 AM

जालना : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. बऱ्याच जणांचा यात मृत्यू देखील होत आहे. असाच एक भीषण अपघात जालन्यात दोन मित्रांचा झाला आहे. या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं जालना शहर हळहळलं आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये ६ जून रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २५ वर्षीय दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अशी मयत तरुणांची नावे आहेत. या अपघातात मृत झालेले दोघंही जालना शहराच्या जवळ असलेल्या शिरसवाडी गावचे रहिवाशी असून ते एका खासगी कामानिमित्त रात्री जालना शहरात आले होते. जालना शहरातून परत गावाकडे जात असताना ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या दोन मित्रांचा मृत्यू झाल्यानी माहिती शिरसवाडी गावात पोहोचताच परिसरात एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दोन्ही मित्रांवर शिरसवाडी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दोघांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.