भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पाच दिवसांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा नसल्याने या मालिकेत अनुभवाची उणीव आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची कसोटी लागणार आहे. टीम इंडिया 13 जून ते 16 जून दरम्यान इंट्रा स्कॉड सामना होणार आहे. या सामन्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी प्रशिक्षक गौतम गंभीरला करायची आहे. असं असताना प्रशिक्षक गौतम गंभीरला तातडीने भारतात परतावं लागलं आहे. आईची तब्येत खराब असल्याने गौतम गंभीरने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका बसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना सध्या आयसीयुमध्ये दाखल केलं असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. भारतात आल्यानंतर गौतम गंभीर इंग्लंडला कधी परतेल याबाबत सुरुवातीला काहीच सांगण्यात आलं नव्हतं. कारण आईच्या तब्येतीवर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहे. पण आता 17 जूनपर्यंत टीम इंडियासोबत ज्वॉईन होईल असं सांगण्यात येत आहे.
गौतम गंभीरच्या गैरहजेरीत इंट्रा स्कॉड सामन्यातून आता सपोर्ट स्टाफला खेळाडूंची निवड करावी लागू शकते. कारण गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यावर परत कधी हे काही स्पष्ट नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमी गौतम गंभीरवर आलेलं संकट टळावं यासाठी प्रार्थना करत आहे. जेणेकरून गौतम गंभीरच्या अनुभवाचा फायदा टीम इंडियाला पहिल्या कसोटीपासून होईल. गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला इंग्लंडमध्ये अनुभवाची उणीव भासेल. त्यामुळे गौतम गंभीरचं टीम इंडियासोबत असणं गरजेचं आहे.
गौतम गंभीरची आई सीमा गंभीर यांना 11 जून रोजी हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच कुटुंबियांनी याबाबतची माहिती प्रशिक्षक गौतम गंभीरला दिली. त्यानंतर त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, गौतम गंभीर पहिला कसोटी सामना सुरू होण्याच्या 3 दिवस आधी इंग्लंडला परतेल. म्हणजेच 17 जूनपर्यंत टीम इंडियासोबत असेल. जर असंच घडलं तर टीम इंडियासाठी चांगली बातमी असणार आहे.