Maharashtra Live News Update : कोरोना झाला तरी कुठे ही अॅडमीट होण्याची गरज नाही; आरोग्यमंत्र्यांचं अजब वक्तव्य
Saam TV June 14, 2025 01:45 AM
कोरोना झाला तरी कुठे ही अॅडमीट होण्याची गरज नाही; आरोग्यमंत्र्यांचं अजब वक्तव्य

देशात आणि राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मात्र कोरोना बाबत अजब आणि धक्कादायक वक्तव्य केले आहे. कोरोना झाला तरी कुठे ही अॅडमीट होण्याची गरज नाही असं त्या म्हणाल्या आहेत.

पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

धक्काबुक्की होत असताना भाजप कार्यकर्ते पडले आशिष शेलारांच्या गाडीवर

कांदिवली पूर्व परिसरातील फेरीवाले आशिष शेलार यांना निवेदन देण्यासाठी गेले असता झाली मारामारी

भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये झाली झटापट

दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समता नगर पोलीस ठाणे मध्ये तक्रार देण्यासाठी दाखल

व्यवस्थेने नैतिक जबाबदारी घ्यायची असते, पण आता तशी पद्धत राहिलेली नाही - जयंत पाटील

विमान दुर्घटना कशामुळे झाली? त्याची कारणे काय आहेत हे तपासणे गरजेचे. व्यवस्थेची यात जबाबदारी असेल तर ती जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. व्यवस्थेने नैतिक जबाबदारी घ्यायची असते पण, आता तशी पद्धत राहिलेली नाहीए. आता काहीही घडलं तरी आम्ही आहोतच अशीच भूमिका आहे. असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Kalyan: कल्याणमध्ये झळकले आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर

ठाकरे गटाच्या पदाधिकार्याने लावले बॅनर

राज्यात ठाकरे गट मनसे युतीबाबत चर्चा रंगल्या असतानाच कल्याणात झळकले आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर

कल्याण काळातलाव येथील ठाकरे गटाच्या कार्यलया समोर लावण्यात आले बॅनर

बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं- संजय राठोड

आज बच्चू कडूना भेटण्यासाठी आम्ही सर्व आलो आहे

बच्चु भाऊंना मी विनंती करतो आहे त्यांचा स्वभाव मला माहिती आहे.. त्यांनी सातत्याने शेतकरी शेतमजूर दिव्यागासाठी उठाव केला आहे -

बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे

वृद्ध बांधवांनी उपोषण करू नये

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी विषय बोलणार आहे

येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व विषय माडले जातील

कॅबिनेट बैठकीमध्ये बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या व मुद्द्यावर चर्चा करू

बच्चू कडू यांची गरज महाराष्ट्राला आहे

मागण्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू

बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे

कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा

बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याच कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे अस मी मानत आले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.

शेतकरी कर्जमाफी असूदे की, हमीभाव... मायबाप शेतकऱ्याच्या प्रत्येक मुद्यावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्यांना गांभीर्याने घ्यावं. तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा.

परवाना नसताना खत विक्री, कृषी विभागाकडून श्रीरामपुरात मोठी कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एमआयडीसी येथे कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत खत विक्री आणि साठवणुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसलेले गोडाऊन सील केलंय.. कृषी समृद्धी क्रॉप सोल्यूशनच्या गोडावूनवर टाकलेल्या छाप्यात 2 लाख 82 हजार रुपये किमतीच्या खताच्या गोण्या आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.. गोडाऊन मालक योगेश नगरकर याच्या विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. खरिपाच्या तोंडावर कृषी विभागाने अवैध खत आणि औषध विक्री विरोधात धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे..

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात रात्रभर मान्सूनच्या पावसाने झोडपल

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे - कासेगाव पूल गेला पाण्याखाली

पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटला

जीव धोक्यात घालून दुचाकी स्वार आणि उळे - कासेगाव चे ग्रामस्थ पूल ओलांडण्यासाठी करतायेत प्रवास

एका वर्षांपूर्वी याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका तरुणाला गमावावा लागला होता जीव

दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल नउचल्याचे चित्र दिसून येत आहे.

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केलं विष प्राशन

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाशी दखल न घेतल्याने केलं विष प्राशन

अजय भागवतराव चौधरी वय (35 वर्ष) रा. करजगाव ता. वरुड येथील रहिवासी...

अजय चौधरी हे प्रहार वरुड तालुका संपर्क प्रमुख आहेत..

त्यांच्यावर वरुड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू..

अकोल्यातल्या पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात पपई आणि लिंबू बागांचे मोठं नुकसान

वादळी वारा आणि जोराच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या अतोनात नुकसान.

शेतकरी गोपाल ताले यांच्या शेतातील पपई बाग अक्षयच्या जमिनीवर झोपले आहेत..

तर पपईच मोठे नुकसान झालंय..

तर परिसरातील लिंबू बागा वाऱ्याच्या झोतात पडल्या आहेत...

नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत...

Shirdi: साई मंदिर परिसरात 108 फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण

साई मंदिर परिसरात आता भारताचा राष्ट्रध्वज मोठ्या डौलाने फडकणार आहे..

'फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया' यांच्या सौजन्याने मंदिर परिसरातील लेंडी बागेत 108 फूट उंच भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण करण्यात आलंय..

हा भव्य राष्ट्रध्वज शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी देशभक्तीचा एक नवा प्रेरणास्तंभ ठरणार आहे..

हे लोकार्पण फ्लॅग फाउंडेशनचे अध्यक्ष तथा लोकसभा खासदार नवीन जिंदाल, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते झाले..

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे प्रहार कार्यकर्ते आक्रमक

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस अद्याप पर्यंत आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे, अमरावती परतवाडा रोडवर वलगाव येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास रस्ता अडवून ठेवला, यावेळी दोन्ही बाजूंनी वाहतूक जाम झाली होती, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासह विविध मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या, दरम्यान पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप आंदोलन करता कडून करण्यात येतो आहे, यावेळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त येणार होता, यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शेतकऱ्यांच्या पपई पिकाच लाखो रुपयाचे नुकसान

बीडच्या गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील श्री किसन उत्तमराव शेळके यांनी आपल्या शेतामध्ये पपई या फळबागाची लागवड केली होती भर उन्हाळ्यामध्ये एक लाख रुपयाचे पाणी विकत घालून फळबाग जोपासला होता मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र अद्याप पर्यंत पंचनामा करण्यासाठी तलाठी आले ना मंडळाधिकारी आले तात्काळ पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Ahmedabad Plane Crash Live Update: अहमदाबादमधील विमान अपघातग्रस्त ब्लॅक बॉक्स सापडला

अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण कळणार

ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी दिल्लीला पाठवण्यात आले आहे

महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्याला जोडणाऱ्या महामार्गाची दयनीय अवस्था

नांदेडहून बिदरला जाणाऱ्या राज्य महामार्गावरील हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तेलंगणा- महाराष्ट्र-कर्नाटक या या तीन राज्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून याच रस्त्यावरून बिदर येथील गुरुनानकजी यांचा नानक झिरा साहेब हा प्रसिध्द गुरुद्वारा आहे.

देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या वाहणांची वर्दळ या रस्त्यावर असते.

मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांमध्ये नागरिकांमध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक दरारोज लहान मोठे अपघातही होत आहेत.

त्यामुळे खड्डे लवकरात-लवकर बुजून देण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक करीत आहेत.खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्गात आढळला दुर्मिळ 'काळतोंड्या' साप

सिंधुदुर्गतील देवगड मणचे गावात Dumeril's Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाचा साप नुकताच आढळून आला.

हा दुर्मिळ साप सिंधुदुर्गात आढळून आल्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ आढळून आला.

हा साप अंदाजे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचा असून, त्याच्या डोक्यावर काळया रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला "काळतोंड्या" असे म्हणतात.

हा साप बिनविषारी असून स्वभावाने लाजरा आहे.

त्याचा वावर मुख्यतः दाट जंगल व गवताळ भागांमध्ये असतो. पाली, सापसुरळी हे त्याचं खाद्य आहे. ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळा आढळून आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलन आजचा सहावा दिवस

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर चढले प्रहार चे कार्यकर्ते..

सकाळी सहा वाजता पासूनच चढले प्रहार चे कार्यकर्ते तहसील कार्यालयावर

आज सकाळी 11 वाजता मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपोषण स्थळी भेट देत आहेत...

तर सायंकाळी 5 वाजता अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडू यांची भेट घेऊन चर्चा करणार

सायंकाळी उपोषण सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष

Solapur Monsoon: सोलापूर जिल्ह्यात रात्रभर मान्सूनच्या पावसाने झोडपल

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे - कासेगाव पूल गेला पाण्याखाली

पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटला

एका वर्षांपूर्वी याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका तरुणाला गमावावा लागला होता जीव

दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल नउचल्याचे चित्र दिसून येत आहे.

Ratnagiri Red Alert: रत्नागिरीत आज रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ईशारा

वेगवान वारे देखील वाहन्याची शक्यत

13 आणि 14 या दो दिवशी रेड अलर्ट असणार आहे

तर 15 आणि 16 जूनला आँरेंज अलर्ट असणार आहे

जिल्ह्यातील नागरीकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाप्रशासनानं केलंय...

जालन्यातील नंदापूर येथील शेतकरी प्रकाश उबाळे यांचं लिंबू बागेच मोठ नुकसान

जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागातदारांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.जालन्यातील नंदापूर शिवारातील शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबूबागेच देखील वादळी वाऱ्यामुळे मोठ नुकसान झाल आहे.जवळपास एक एकर असलेल्या लिंबूच्या बागेतील वीस मोठी झाडे वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहे. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

Akola: वाऱ्यामूळ घरकुल बांधकाम कोसळले, घरकुल लाभार्थी चिंतीत

अकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय..

अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळं घरकुल योजनेतून सुरू असलेल्या घरांच्या बांधकामावर मोठा परिणाम झालाय..

अकोल्यातल्या बाळापुर तालुक्यातल्या चिंचोली गणू येथील एका शेतमजुराचं बांधकाम 60 टक्के झाले होत..

मात्र जोराच्या वाऱ्यामुळे त्यांचं घरकुल बांधकाम कोसळले आहे.. त्यामुळं सिद्धार्थ आत्माराम अंभोरे हे लाभार्थी चिंतीत आहेत..

मिळालेल्या घरकुल अनुदान आणि त्यांनी साठवून ठेवलेल्या 85 हजार रुपयांतून हे घर बांधकाम सुरू झालं होतं. दरम्यान, संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता अंभोरे कुटुंबं करते आहे.

Pune Travel: पुण्यात ट्रॅव्हल्स चालकांचा उद्यापासून बंदचा इशारा

वाहतूक विभागाच्या निषेधार्थ उद्यापासून सर्व बसेस बंद करण्याचा असोसिएशनचा इशारा

पोलीस आयुक्तांकडून काढण्यात

आलेल्या आदेशाबाबत पुणे बस आणि कार मालक संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली असून,या आदेशात लझरी बसला शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सर्व पिकअप पाॅइंट्स शहराबाहेर दिले गेले आहे.

या निर्णयामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना बससाठी शहराच्या बाहेर यावे लागणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

वाहतूक कोंडीही वाढणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा निषेध म्हणून हे बस बंद करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

पुणे शहरात काल रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात 20 झाडपडीच्या घटना

नवले पुलानजीक एक जेष्ठ महिला नाल्यामध्ये वाहून गेल्याची माहिती

अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु

आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण

हवामान खात्याने दिलाय पाऊसाचा इशारा

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदावाद विमानतळावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघात ग्रस्त भागाला भेट देणार

Maharashtra Live News Update : रत्नागिरीत आज रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या असा दोन दिवस रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.तर १५ व १६ जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात असून, या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

- अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानातील केबिन क्रू दीपक पाठक मुळचे नैताळेचे रहिवासी

- दीपक पाठक हे कुटुंबीयांसह बदलापूरला राहत असले, तरी ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळेचे रहिवासी

- गेल्या ११ वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते

- मूळचे नैताळेचे असलेले दीपक पाठक नोकरीनिमित्ताने बदलापूरमध्ये झाले होते स्थायिक

- दीपक पाठक यांची सासुरवाडी देखील नैताळेचं, ४ वर्षांपूर्वी पाठक यांचा झाला होता विवाह

पावसाळ्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांना नद्यांच स्वरूप

पिंपरी चिंचवड शहरात काल रात्री आलेल्या दमदार पावसामुळे खंडोबामाळ ते थरमॅक्स चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाच पाणी तुंबल होत. रस्त्यावर पाणी तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्याला जून नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांना आपल्या वाहनांनी प्रवास करण्याची वेळ ओढवली होती. एकीकडे पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील नाले सफाई पावसाळ्यापूर्वीपूर्णपणे करण्यात आल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांना नद्यांच स्वरूप आलेले चित्र पाहायला मिळत असल्याने महापालिकेने केलेल्या नालेसफाईच पितळ उघडं पडल आहे.

-उल्हासनगर महानगरपालिकेचा अजब कारभार,भर पावसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण

उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एका ठेकेदारास कंत्राट देण्यात आला असून, हा ठेकेदार रात्री पडत असलेल्या पावसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण करत होता, येथील जवाहर हॉटेल जवळ हे काम सुरू होते, यावेळी मनसेचे उपशहर प्रमुख मुकेश सेठमालानी हे तिथून जात असताना त्यांनी पाहिले की भर पावसात डांबरीकरण रस्त्यावरील डांबरीकरण केले जात आहे, पावसात डांबरीकरण का करत आहेत असा प्रश्न मुकेशंनी काम करणाऱ्यांना विचारलं असता, ठेकेदाराची माणसे तिथून आपले साहित्य घेऊन निघून गेले, मात्र हे काम सुरू असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी येथे उपस्थित नव्हता. म्हणजे बेभरोसे उल्हासनगर महानगरपालिका ठेकेदाराच्या मर्जीने येथील नागरिकांकडून मालमत्ता कराद्वारे वसूल केलेल्या पैशाची विल्हेवाट लावत आहे, पावसात रस्त्यावर केलेले डांबरीकरण टिकत नाही हे माहीत असताना सुद्धा ठेकेदार आपल्या मर्जीने हे काम करत आहे, त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचा हा अजब कारभार इथे दिसून आला,

विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन अवघ्या तासाभरात; व्हीआयपी दर्शन बंद केल्याने दर्शन रांगेची गती वाढली

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंदी बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यात आली आहे. दर्शन रांगेची गती वाढली आहे. त्यामुळे आता दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरात देवाचे पदस्पर्श दर्शन मिळू लागले आहे.लवकर दर्शन मिळाल्याने भाविकांनी व्हीआयपी दर्शन बंदीचे स्वागत केले.

विठ्ठल दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. आषाढी वारीच्या निमित्ताने तर भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. दर्शन रांगेतून येणार्या भाविकांचे जलद व सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.तर दर्शन रांगेतून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दर्शन बारीला जाळीचे गार्ड बसविले आहेत. आॅलनाई दर्शन सुविधा देखील बंद केली आहे. त्याचा एकत्रित चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना अवघ्या एक ते दीड तासामध्ये जलद व सुलभपणे दर्शन मिळत आहे. लवकर दर्शन होत असल्याने अनेक भाविकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाचे स्वागत ही केले.

आज बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस

आज सायंकाळी 5 वाजता महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूने देणार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट..

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनावर आज तोडगा निघणार का याकडे लक्ष?

बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांची माहिती

पोटात अन्न नसल्याने बच्चू कडू यांच्या किडनी व शरीराच्या इतर भागावर परिणाम झाला

वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडू यांच्या शरीराची पूर्णपणे तपासणी

बच्चू कडू यांना डॉक्टरांकडून सलाईन घेण्याचा सल्ला मात्र बच्चू कडू यांचा सलाईन घेण्यास नकार

कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून बच्चू कडू यांना सलाईन घेण्याची विनंती, मात्र मागण्या पूर्ण होईस्तर मी औषधोपचार घेणार नाही -बच्चू कडू यांची माहिती

मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे या मंत्र्यांसोबत मागण्या संदर्भात बच्चू कडू यांची ऑनलाइन बैठक मात्र या ऑनलाईन बैठकीमध्ये ठोस आश्वासन न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम

धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात 13 टक्के वाढ

धाराशिव जिल्ह्यात मे महीन्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे प्रकल्पात 13 टक्के पाणीसाठा वाढला आहे.तसेच जलस्रोतांमध्येही जलसाठा वाढल्याने जिल्ह्यातील टॅंकर बंद झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण प्रकल्पात सध्या 28.30 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.शिवाय सहा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.जिल्ह्यात गतवर्षी कमी पाऊस झाला झाल्याने यंदा अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागला होता मे महीन्यात 105 गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या मात्र मे महीन्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला त्यामूळे जिल्ह्यातील एकुण 226 प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

जिल्हा परिषद शाळांचा ढासळला विद्यार्थी संख्या पट; ३५ शिक्षक निलंबित

बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली असून, याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या २० शाळांवर लक्ष केंद्रीत करत, त्यामध्ये कार्यरत असलेल्या ३५ शिक्षकांचे निलंबन आदेश जारी केले आहेत, तसेच ६० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत

माझं दु:ख मी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पञाद्वारे व्यक्त केल : पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या गतवर्षीच्या निधीवरील स्थगिती उडवण्याची विनंती मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.ऐकीकडे राज्यात सर्वञ कामे सुरू असताना धाराशिव जिल्ह्यातच विकासकामे बंद आहेत,याच पालकमंत्री म्हणून मला ही दुख आहे अशी खंत राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलीय.प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम व नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना नियोजन समितीच्या निधी वरील स्थगिती उठवण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

उद्यानातील खेळणे तुटल्याने ज्येष्ठाचे डोक्याला दुखापत कोथरुड मधील थोरात उद्यानातील घटना

कोथरुड बस स्थानकाजवळ राहत असलेल्या प्रतिभा सुरेश शेठ, वय ६८ या थोरात उद्यानात नियमित व्यायामाला येत असतात.

काल सकाळी नेहमी प्रमाणे व्यायामासाठी उद्यानात आल्यावर त्या व्यायामासाठी बसविलेल्या खेळण्यावर व्यायाम करु लागल्या.

या खेळण्याच्या जॉईंटचा बोल्ट अचानक तुटून डोक्यात पडल्याने त्या जखमी झाल्या.. उद्यानात असलेल्या लोकांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.

दरम्यान या घटनेमुळे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उद्या शुभारंभ

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या शुभारंभ होणार

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढेल आणि सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील.

वारकऱ्यांसाठी प्रथमोपचारापासून आयसीयूपर्यंत सुविधा

वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज, ३३१ रुग्णवाहिका, १ हजार ३५० आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती...

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात आणि एकूणच वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्य आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, त्यांना संपूर्ण पालखी मार्गावर सर्दी खोकल्यासारख्या प्राथमिक उपचारापासून अतिदक्षता विभागातील अत्यावश्यक उपचार पुरविण्याचे सूक्ष्म आणि व्यापक नियोजन केले आहे.

वारी मार्गावर विशेषज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी असे मिळून वारी पंढरीची १,३०३ आरोग्यविषयक मनुष्यबळ सेवा देणार आहे.

दरवर्षी वारी दरम्यान १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांना प्राथमिक आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात.यंदा त्यामध्ये आणखी नवीन सेवांचा समावेश केला आहे.

बीबीए, बीसीएची पुन्हा सीईटी, अर्जासाठी २० जूनपर्यंत मुदत

राज्यात बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जनोंदणीला आजपासून सुरू झाली असून, नोंदणी करण्यासाठी २० जूनपर्यंत अंतिम मुदत आहे. यापूर्वीची सीईटी दिलेले विद्यार्थी देखील अतिरिक्त सीईटी देऊ शकणार आहेत.

बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या सीईटीची माहिती नसल्याने दि. २९ व ३० एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेत काही विद्यार्थी सहभागी होऊ शकले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून व यंदाच्या वर्षी या अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण होण्याच्या दृष्टीने अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे.

सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जनोंदणी व अर्जनिश्चिती करता येणार आहे.

पुणे अहमदाबाद विमानांना उशीर

अहमदाबाद लंडन विमान अपघातामुळे अहमदाबाद विमानतळ काही वेळ बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या दोन विमानांना फटका बसला.

एका विमानाच्या उड्डाणाला पाच तास उशीर झाला.तर, दुसऱ्या विमानाला एक तास उशीर झाला.

इंडिगो कंपनीचे विमान दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते.मात्र, अपघाताच्या घटनेमुळे या विमानाला उशीर झाला. हे विमान रात्री नऊ वाजता पाच तास उशिराने उड्डाण केले.

तर,अक्सा एअर कंपनीचे विमान पुण्यातून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ते विमान रात्री पावणे सात वाजता सुटले. त्यामध्ये अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.

मुंब्रा एका कार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक

गाडीवरील संतुलन बिघडल्यामुळे भरधाव वेगाने चालणाऱ्या कारणे चार ते पाच गाड्यांना उडविले आहे.

मुंब्र्यातील संजय नगर या भागामध्ये ही घटना घडली कारचालक हा अल्पवयीन मुलगा असल्याने त्याने ब्रेकच्या ऐवजी एक्सलेटर दाबल्याने कार अधिक वेगाने पुढे गेली व सलग चार ते पाच वाहनांना धडक देत पुढे निघाली

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी कार चालकाला चोप दिला व त्याचबरोबर चार चाकी वाहनाची तोडफोड देखील केली,

सदर घटना मध्ये चार जण गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार याकरिता दाखल करण्यात आले...

सदर घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गर्दीला आटोक्यात आणले. प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्हा पुढील चार दिवस हवामान खात्याचा येलो अलर्ट

आज पासून पुणे शहरातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता

वेधशाळेची माहिती

13 जून ते 17 जून दरम्यान पुणे शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

तर काल रात्री पुणे शहरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.