पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा म्हटले की, अनेक आजार डोकं वर काढतात. देशात तर पुन्हा कोविड 19 चे रुग्ण आढळले आहेत. फुफ्फुसांवर दिर्घ परिणाम करणाऱ्या या विषाणूने पुन्हा डोकं वर काढल्याने सर्वचजण चिंतेत आहेत. हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे सर्दी-खोकल्याची रुग्णही वाढत आहेत. अशावेळी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. कारण रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अनेक शारीरिक आजार होण्याची शक्यता अधिक असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मोड आलेले चणे खायला हवेत. मोड आलेल्या चण्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच शिवाय व्हायरल इन्फेक्शनपासून सुटका होते. सर्दी-खोकल्याने त्रस्त असाल तर मोड आलेले चणे नक्की खा. आज आपण जाणून घेऊयात, मोड आलेले चणे खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते –
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास, मोड आलेले चणे खावेत. यामुळे सर्दी – खोकला आदी व्हायरल आजारापासूनदेखील संरक्षण होतं. मोड आलेल्या चण्यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न, मिनरल आणि विटामिन्स आदी पोषक घटक असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हिमोग्लोबिन वाढते –
रोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मोड आलेले चणे खाल्ल्यास शरीरातील रक्तपातळी वाढते. त्यामुळे शरीरातील रक्तपातळी वाढण्यासाठी मोड आलेले चणे खावेत.
बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम –
भिजवलेल्या चण्यांमध्ये फायबरची मात्रा जास्त असते. ज्यामुळे आपल्या पोटाचा कोटा साफ होण्यासाठी मदत होते. तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम हवा असेल तर मोड आलेले चणे खाण्यास सुरूवात करा, नक्कीच फरक जाणवेल.
त्वचेच्या समस्यांपासून सुटका –
भिजवलेल्या चण्यामध्ये मीठ न घालता ते खाल्ल्यास त्वचेच्या समस्यांपासून सुटका होते.
ताकद वाढते –
शरीराची ताकद वाढवण्यासाठी मोड आलेले चणे खाणं हा उत्तम पर्याय आहे. गुळाबरोबर चणे खाल्ल्यास युरिन प्रॉब्लेमपासूनदेखील सुटका होण्यास मदत होते.
हेही पाहा –