Maharashtra Live News Update : संगमेश्वर रामपेठेत पूरस्थिती; दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत
Saam TV June 16, 2025 04:45 PM
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली

सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारासची घटना

महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु

महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरु

महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल, वाहतुकीवर मोठा परिणाम नाही

महामार्गावरील निकृष्ट कामाची पावसाने केली पोलखोल

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पास वाटप

छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पास वाटून सजवलेल्या बसमधून घेऊन शाळेत सोडण्यात आले. छत्रपती संभाजी नगर शहराजवळ काही अंतरावर असलेल्या जटवाडा, ओव्हर या गावांसह तांडा, वाडा आणि वस्त्यांवर शाळेच्या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती बस स्थानकाकडून विद्यार्थ्यांसाठी बस सेवा पुरवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थिनींना मोफत पास देऊन महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर आणि मध्यवर्ती बस स्थानकाच्या टीम कडून या विद्यार्थ्यांना मोफत पास वाटप करून पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. परिवहन महामंडळाच्या टीमकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बसची देखील आकर्षक सजावट करण्यात आली. संभाजीनगर जिल्ह्यातील आठही आगारांमधून शाळेमध्ये मोफत पास वाटण्यात आले.

Maharashtra Live News Update : संगमेश्वर रामपेठेत पूरस्थिती; दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत

रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली असून, शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात, तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक आणि जनजीवन ठप्प झाले आहे. या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुरुवात

पुण्यासह राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुरुवात झालीय. पुणे शहरातील भावे प्राथमिक शाळेत आज सकाळपासून उत्साह पाहायला मिळतोय. नवीन नवीन युनिफॉर्म घालून सर्व चिमुरडे शाळेत पोचले आहेत. फक्त विद्यार्थी च नाही तर त्यांच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे. शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना ग्रीटिंग कार्ड देऊन शाळेत स्वागत करण्यात आलं. इतकचं नाही तर शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे वर्गाच्या बाहेर रांगोळी काढलीय आणि सगळ्या चिमुरड्यांना खाऊ सुद्धा दिला जातोय. पुण्यातील भावे प्राथमिक शाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

हकालपट्टी झालेले ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता

- सुधाकर बडगुजर यांच्यासह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविलेले गणेश गीते देखील करणार भाजपमध्ये प्रवेश

- स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध जुगारून बडगुजर आणि गीते यांना दिला जाणार प्रवेश

- मंत्री गिरीश महाजन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष चव्हाण यांच्याकडून विरोध करणाऱ्यांना तंबी

- आपल्याकडे पक्ष प्रवेश न दिल्यास ते इतर पक्षात जाणारच आहे त्यामुळे त्यांना प्रवेश देणे योग्य राहील

- सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा उद्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्याची चर्चा

- उद्या मुंबईत सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची शक्यता

चारचाकी वाहनाची तोडफोड CCTV मध्ये कैद

घरासमोर ठेवलेल्या चारचाकी वाहनाची तीन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना भद्रावती इथे घडली. तोडफोडीची ही घटना cctv कॅमेरात कैद झाली असून या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली आहे. वासुदेव ठाकरे घरी आपल्या कुटुंबासह परतल्यानंतर त्यांनी महेंद्र कंपनीचे थार हे चारचाकी वाहन घरासमोर ठेवले. रात्रीच्या सुमारास अचानक तोडफोडीचा आवाज आला. अज्ञात तीन व्यक्ती हे लाकडी दांडक्यासह गाडीची तोडफोड करताना दिसले. आरडाओरड झाल्यानंतर हे तिन्ही व्यक्ती एका कारमध्ये बसून पळाले. भद्रावती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

चासकमान धरणाच्या भिंतीला समांतर असलेल्या भीमा नदीवरील पुलाची दुरवस्था चिंतेचा विषय बनलाय

पुलावर सातत्याने भगदाडे पडत असून, नुकतेच पुन्हा एकदा विविध ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आलेय या आधीही सात ते आठ वेळा अशाच प्रकारे भगदाडे पडल्याने पुलाच्या मजबुतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेय त्यामुळे पूल दिवसेंदिवस अधिकच धोकादायक होत असतानाही त्यावरून वाहनांची आणि नागरिकांची वाहतूक मात्र सुरूच आहे. यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली असूनही संबंधित विभाग आणि धरण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. स्थानिक नागरिकांनी वेळेत दखल घेऊन पूल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी केली आहे.

Ratnagiri: रत्नागिरीत रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग

आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला रेड अलर्ट

जिल्ह्यात एकुण 1021.92 मिलीमिटर पाऊस पडलाय तर सरासारी 113.54 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात पडलाय लांज्यात 139 मिमी पाऊस पडलाय त्या खालोखाल गुहागर 136.80 मिमी, संगमेश्वर 129.50 मिमी , चिपळूणमध्ये 128 मिमी पाऊस पडलाय

रात्रीपासून किनारपट्टी भागात वेगवान वारे

ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहताहेत

जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून, जगबुडी आणि कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर वाहतेय

आज दिवसभर पावसाचा जोर असणार आहे

हनुमान यात्रेनिमित्त सलगरमध्ये बैलगाडा शर्यत..

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगरमध्ये कारहुनवी सणानिमित्त हनुमानाची मोठी यात्रा भरली आहे.या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेश मधील हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे.या कारहुनवीच्या यात्रेला गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढल्याच दिसून आलं.या मिरवणुकीनंतर हनुमान मंदिराच्या भोवती या बैलगाड्यांची चित्ताथरारक शर्यत पाहायला मिळाली. ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र मधून मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावल्याचे चित्र दिसून आलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून जिल्ह्यात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत आहेत मालवण, कणकवली, कुडाळ सावंतवाडीत पावसाचा जोर असून सह्याद्री पट्ट्यातही पावसाचा जोर वाढला आहे. समुद्रालाही उधाण येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिलीपकुमार सानंदांसह ११ हजार कार्यकर्ते राष्ट्रवादीत.

खामगाव मतदारसंघात अजित पर्वाला आता सुरुवात झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सलग तीन टर्म काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे आणि जवळपास 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये असणारे खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खामगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. खामगाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास 11000 पेक्षा जास्त कार्यकर्ते देखील या प्रवेश सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सहभाग झालेत...

Maharashtra Live News Update : येत्या दोन दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

- हवामान विभागाच्या अंदाजानुसार १७ ते २१ जून दरम्यान मेघगर्जनेसह पावसासाठी पोषक वातावरण होणार निर्माण.

- तर पुढील २४ तासात विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मान्सूनचे ढग पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज..

- जून महिन्यात विदर्भात उन्हाचे चटके जाणवत आहेय.. या महिन्यात पारा ४४.२ अंशावर जाऊन आलाय..

संत झोलेबाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने प्रस्थान

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील चिखली झोलेबाबा येथून संत झोलेबाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने रवाना झाली आहे. या पालखी वारीचे यंदाचे अकरावे वर्ष असून, मोठ्या संख्येने महिला-पुरुष आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये पाहायला मिळतो आहे.

Maharashtra rain Live News Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे, पाऊस धो धो कोसळणार

आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनचा प्रवाह तीव्र

डोंगर उतारावर; तसेच कच्ची घरे, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, हवामान शास्त्रज्ञ यांच्याकडून आवाहन

कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती

कोकण, घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे हवामान तज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update : मावळ येथील रेस्क्यू ऑपरेशन समाप्त

एन डी आर एफ चे रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री थांबवण्यात आले आहे

सर्व हरवलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आल्यानंतर एन डी आर एफ ने ऑपरेशन थांबवले

प्रशासनाकडून कोणी व्यक्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास पुन्हा ऑपरेशन सुरू करणार

मावळ दुर्घटनेत ४ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्हा दौऱ्यावर

पालघर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्हा दौऱ्यावर . देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियांनाच उद्घाटन . मनोर येथे कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थित . शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद दुर्वेश शाळेत मुख्यमंत्र्यांकडून केलं जाणार विद्यार्थ्यांचं स्वागत . देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री मंगलप्रभात लोढा देखील राहणार उपस्थित .

जालन्यात ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी खताचा तुटवडा मागणीपेक्षा पुरवठा कमीच...

जालन्यात ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. डीएपी खताचा पुरवठा हा मागणीपेक्षा कमी झाल्यामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना डीएपी खताच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे..खरीप पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांचा कुठलाही तुटवडा जाणवणार नाही असं वारंवार कृषी विभाग सांगत होतं मात्र सध्या जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून युरिया, डीएपी, एमओपी एनपीके ,एसएसपी या खताची दोन लाख 77 हजार 710 मॅट्रिक टन इतकी मागणी करण्यात आली होती . मागणीप्रमाणे खताचा पुरवठा देखील करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये डीएपी खत खताचा पुरवठा मागणीपेक्षा कमी झाल्याने तुटवडा जाणवत आहे.

आषाढीनिमित्त भुसावळहून पंढरपूरसाठी मोफत रेल्वे सेवा

भुसावळ यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून भुसावळहून पंढरपूरकडे ५ जुलैपासून मोफत विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जळगाव, भुसावळ, चोपडा, यावल, रावेरसह लोकसभा क्षेत्र आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने ही गाडी अनारक्षित स्वरूपात चालवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री खडसे यांनी गाडीच्या तिकिटांचा खर्च त्यांच्यावतीने करण्यात येणार आहे.५ जुलै रोजी सकाळी भुसावळ रेल्वे तसे वडापात्रात रेल्वे वेळापत्रक काढण्यात आले आहे

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपोजवळ पाणी आलं रस्त्यावर

रस्त्यावर पाणी तरी वाहतुकीवर परिणाम नाही

ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे पाणी रस्त्यावर

लांजा एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर आहे पाणी

कशेडी घाटात मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली

बोगद्याच्या अलीकडे काही अंतर आधी रस्त्यावर आला डोंगरातील मातीचा मोठा ओसरा

० कोणतीही हानी नाही

० बॅरेगेटींग करून वाहतुक बाजुने सुरु

उल्हासनगरात पोलिसांकडून गावठी दारूचा अड्डा उध्वस्त!

विठ्ठलवाडी पोलिसांना या गावठी दारूच्या अड्ड्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेत पाहणी केली असता हजारो लिटर गावठी दारू तयार केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने ही सगळी दारू नष्ट करत हा अड्डा उध्वस्त केला. माणेरे गावालगतच्या जंगलात गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याच्या तक्रारी आजवर अनेकदा प्राप्त झाल्या असून पोलिसांनी आजवर अनेकदा या ठिकाणी कारवाई केली आहे. मात्र तरीसुद्धा हे अड्डे सुरूच असल्याने गावठी दारू तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

येत्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्व जागा लढण्याची तयारी ठेवणार

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे उल्हासनगर मध्ये पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता, प्रमुख वक्ते म्हणून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते, यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते, येत्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वीस प्रभागात 78 म्हणजेच सर्व जागांवर उमेदवार तयार रहा,आघाडीचा निर्णय जो होईल तो आम्हाला मान्य असेल, असं मत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले.

ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग

रात्रभर कोसळणार्या पावसाने पहाटेच्या सुमारास उसंत घेतली आहे. आज देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे. पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहरांतील सर्वच् भागात म्हणजे घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, कळवा या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

दिव्यांगांची वारी; चालली विठ्ठलाच्या दारी

पांडुरंगाच्या ओढीने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाले आहेत. या वारकऱ्यांमध्ये यवतमाळातील तरुण दृष्टीहीन वारकरीही स्वतंत्र वारी काढून सहभागी होत आहेत. येथील सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने या दिव्यांग वारीचे आयोजन करण्यात आले असून, वारीचे हे दुसरे वर्ष आहे. स्थानिक सिद्धी विनायक मंदिरातून संत सूरदास महाराजांची पालखी घेवून दिव्यांगांची ही वारी यवतमाळ येथून पंढरपूरकडे निघाली.

उल्हासनगर अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस

रात्रभर उल्हासनगर अंबरनाथ शहरात रिमझिम पाऊस पडत असून, सकाळी सुद्धा या शहरात रिमझिम पाऊस पडत आहे . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उल्हासनगर, अंबरनाथ,अंबरनाथ ग्रामीण या भागात पावसाने रात्रभर हजेरी लावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.