LIVE: नागपूर जिल्ह्यातील फार्मा कंपनीच्या युनिटमध्ये स्फोट
Webdunia Marathi June 18, 2025 02:45 AM

Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील फार्मा कंपनीच्या युनिटमध्ये स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, पूर्व महाराष्ट्र जिल्ह्यातील भिलगाव येथील अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड युनिटच्या ग्लास लाईन रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) जिल्हाध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला केल्यानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापूरमध्ये शरद पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवणारे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांच्या हक्कांसाठी 7 दिवस उपोषणाला बसलेले कडू आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार, 16जून रोजी वर्धा येथे पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 800 रोहिंग्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित केले.

राज्यातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता शैक्षणिक संस्था चालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले.आपल्या कुटुंबासाठी ट्रॅक्टर चालवणाऱ्या कष्टाळू तरुणाने एकाच रात्री आपले संपूर्ण कुटुंब संपवले.

राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरात 'अघोरी' पूजा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या संदर्भात ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवणारे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहेत. शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांच्या हक्कांसाठी 7 दिवस उपोषणाला बसलेले कडू आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार, 16जून रोजी वर्धा येथे पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 800 रोहिंग्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित केले.

राज्यातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता शैक्षणिक संस्था चालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत...

धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावात रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले.

शिर्डी येथे सात अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका 42 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.मित्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने मुलांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात विमानाचा कॅप्टन सुमित सभरवाल यांनाही आपला जीव गमवावा लागला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. या अपघातात विमानात बसलेल्या प्रवाशांपैकी आणि क्रू मेंबर्सपैकी फक्त १ व्यक्ती वाचली. आज मंगळवारी सकाळी डीएनए चाचणीनंतर कॅप्टन सुमित यांचा मृतदेह मुंबईतील पवई येथील त्यांच्या घरी पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील पुण्यातील इंद्रायणी नदीवर बांधलेला सुमारे तीन दशके जुना लोखंडी पूल रविवारी संध्याकाळी अचानक कोसळला.

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर मंगळवारी नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान मस्कतहून कोचीमार्गे दिल्लीला जात होते.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव तहसीलदार म्हणाले, "चाळीसगावजवळील तुंगनगर गावात रविवारी दुपारी २ वाजता शेतात काम करणाऱ्यांवर वीज कोसळली.

बीकेसी येथील अमेरिकन दूतावासाच्या हेल्पलाइन नंबरवर शनिवारी रात्री दूतावास उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर संशयित कॉलरचे लोकेशन परेल येथे ट्रेस करण्यात आले, जिथून त्याला अटक करण्यात आली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेसाठी कॅनडाला गेले आहेत. तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.कॅनडामध्ये दोन दिवसांच्या जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनाही त्यात आमंत्रित करण्यात आले होते..

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आज (17 जून) होणारी सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

१२ वर्षे जुन्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि अधिकाऱ्यांना फटकारले आहे. नवीन वर्षाच्या पार्टीत परवानगीशिवाय दारू पिणे आणि मानसिकदृष्ट्या विकलांग मुलींना बार डान्सर्ससोबत नाचण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणात चौकशी आणि कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जून रोजी पालघरमध्ये 'धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान' सुरू केले. आदिवासींचे प्रतीक बिरसा मुंडा यांच्या नावावरून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश भारतातील आदिवासी गावांचा सर्वांगीण विकास करणे आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबईतील हवामान आल्हाददायक राहिले आहे. जोरदार वाऱ्यामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहे.

पुण्यातील येरवडा येथे एका 27 वर्षीय तरुणाने दारू दुकानातील कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे.सदर घटना 15 जून रोजी रात्री 9 वाजता येरवडा येथीलएका वाईन शॉप येथे घडली. या हल्ल्यात पीडितेच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. .

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील फार्मा कंपनीच्या युनिटमध्ये स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.