उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी होते. त्यांना स्वतःच्या पक्षाचा राजकीय कार्यकर्ता तयार करण्याची त्यांच्यामध्ये हिम्मत नाही. म्हणून ते इतरांकडून नेते विकत आहेत आणि स्वतःचा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा विकत घेतलेल्या लोकांवर पक्ष चालवता येत नाही, हे एकनाथ शिंदे यांना कळायला अजून वेळ लागेल, असा हल्लाबोल माजी खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला.
Narayan Rane : त्यांची शिवसेना आता राहिलेली नाही, त्यांचे दुकान आता बंद झालंय : नारायण राणेओरिजनल शिवसेना कायदेशीरदृष्ट्या एकनाथ शिंदेकडे गेली आहे. त्यांची शिवसेना आता राहिलेली नाही, त्यांचे दुकान बंद झालेले आहे. बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांंनी पद आणि पैशासाठी कधीही तडजोड केलेली नाही. पण, या लोकांनी पदासाठी तडजोड केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधाराही सांभाळली नाही. आजही ते सांभाळत नाही. शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे, त्यामुळे त्यांचा कसला वर्धापनदिन. मी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन करतो, अशी कडवट टीका खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
Shivsena UBT : काल मातोश्रीवरील बैठकीला हजेरी आज शिंदेसेनेत प्रवेशाचा निर्णयशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतील दोन माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे काल (ता. १८ जून) मातोश्रीवर या दोन माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती. विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी असे शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या दोन माजी नगरसेवकांची नावे आहेत. तसेच शाखाप्रमुख संजय जंगम हेही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील अपघाताची PM मोदींकडून दखल, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीरजेजुरी-मोरगाव रस्त्यावरील अपघाताची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती संवेदना व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना करून 50 हजारांची मदत घोषित केली आहे.
पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारापुणे, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला असून अजूनही पाऊसाची बँटिंग सुरुच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रीपासूनच पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी आलेल्या वारकाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून मंदीरात जाणाऱ्या भक्तीसोपान पुलावरील लोखंडी रेलिंग तुटले आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी हा पुल बंद करण्यात आला आहे.