नाना देवळे
मंगरूळपीर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या अडीच-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाकडून मिळाल्याने प्रशासकीय पातळीवर त्यासाठीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. दुसरीकडे निवडणुकांबाबतची अनिश्चितता दूर झाल्यामुळे पालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशींग बांधून बसलेले अनेक इच्छुक उमेदवार पुन्हा सक्रिय झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या आणि चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करा, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिला होता. या आदेशानंतर राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून अपेक्षित हालचाल झाली असून प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत तातडीने या निवडणूका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद ह्या निवडणुकांसाठी ''भावी'' म्हणून मिरविलेले सर्व इच्छुक पुन्हा कंबर कसून कामाला लागले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील चार महिन्यांत या निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबल्याने काहीसे शांत झालेले इच्छुक उमेदवार पुन्हा कामाला लागले असून त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. यामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण देखील बदलताना दिसत असून राजकीय मरगळ संपल्याचे चित्र दिसत आहे.
आघाडी की स्वबळावर; चर्चांना उधाणराज्यात विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र सर्व पक्ष स्वबळावर लढणार की आघाडी करणार, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. तर प्रत्येक पक्ष हा युती नाही झाली तर स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी रणनीती आखत आहे.
Kharif Sowing : वरुणराजाची जिल्ह्यावर वक्रदृष्टी; मृग नक्षत्र संपतेय, मात्र खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या नव्या खासदार, आमदारांची पहिली निवडणूकमागील नगर पालिका निवडणुकीत खासदार, आमदार असलेले आता बदलले असून सध्या महाविकास आघाडीचे खा. संजय देशमुख असून महायुतीचे आमदार शाम खोडे आहेत. या दोघांनाही ही पहिलीच निवडणूक असून पालिका निवडणुकीत यांचीही कसोटी लागणार आहे. जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार असून त्यादृष्टीने त्यांनी निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे.