‘विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान’ ही आज देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक चळवळींपैकी एक बनली आहे, या संस्थेद्वारे दर्जेदार आणि संस्कार आधारित शिक्षण दिले जात आहे. १९५२ मध्ये गोरखपूरमधील एका शाळेपासून सुरुवात झालेली ही संस्था आज ६८४ जिल्ह्यांमध्ये १२,११८ शाळा चालवित आहे. विद्या भारतीने या १२७ सीमावर्ती जिल्ह्यांमधील १६७ विकास गटांमध्ये २११ शाळा स्थापन केल्या आहेत. याशिवाय, संस्था देशभरात ८,००० हून अधिक अनौपचारिक शिक्षण केंद्रे देखील चालवत आहे, जी समाजातील वंचित घटकांना मोफत शिक्षण देत आहे. सध्या, विद्या भारती शाळांमध्ये ३५.३३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि १.५३ लाखांहून अधिक शिक्षक त्यांना शिक्षण देत आहेत.
विद्या भारतीच्या माजी विद्यार्थ्यांचे एक नेटवर्क त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक दृष्टिकोनाचे एक भक्कम उदाहरण बनले आहे. त्यांच्या पोर्टलवर १० लाख ३० हजारांहून अधिक माजी विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. ज्यामुळे हे जगातील सर्वात मोठे माजी विद्यार्थी संघटन बनले आहे. हे माजी विद्यार्थी ८७ हून अधिक देशांमध्ये राहतात आणि विविध क्षेत्रात योगदान देत आहेत आणि त्यांच्या शालेय शिक्षणादरम्यान प्राप्त झालेल्या सेवा, संस्कृती आणि वचनबद्धतेच्या मूल्यांना पुढे नेत ते राष्ट्र जागृतीचे एक ध्येय मानत कार्य करीत आहेत.
विद्या भारती ही तिच्या मूल्य-आधारित शिक्षणाला आधुनिक तांत्रिक दृष्टिकोनाशी जोडून पुढे जात आहे. वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक जगात, संस्था नैतिकता आणि चारित्र्य निर्माणाला प्राधान्य देताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर केला जाईल याची खात्री करते. आमच्या शाळा AI-सक्षम शिक्षण प्लॅटफॉर्म, डिजिटल वर्गखोल्या स्वीकारत आहेत आणि हे सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP २०२०) नुसार आहे. सध्या, ५०७ हून अधिक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करण्यात आली आहे, जी मुलांना AI, रोबोट, कोडिंग आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानात प्रत्यक्ष शिक्षण देत असून जागतिक STEM मानक या संस्थांनी पूर्ण केलेली आहेत.
औपचारिक शिक्षणासोबतच, विद्या भारती मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अनेक अनौपचारिक शाळा देखील चालवते. देशभरातील सुमारे १०,००० शिशु वाटिका ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना शिशूवर्ग आणि प्राथमिक शिक्षण देत आहेत.
आमचे आयटीआय, जन शिक्षण संस्था आणि कौशल्य केंद्रे ही आदिवासी आणि ग्रामीण तरुणांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करणारी व्यावसायिक शिक्षणाची केंद्रे आहेत. ही केंद्रे कारगिल (लहक), शिमला आणि मंडी ( हिमाचल प्रदेश) आणि किफिरे (नागालंड) सारख्या दुर्गम भागात स्थापन करण्यात आली आहेत.
याव्यतिरिक्त, विद्या भारती सैनिक विद्यालये, सीमावर्ती शाळा आणि निवासी आदिवासी शाळा देखील चालवते जेणेकरून शिक्षणात कोणतेही क्षेत्र मागे राहू नये. भारतीय शिक्षण संशोधन संस्था ( लखनऊ ) आणि समर्थ भारत संशोधन केंद्र ( गांधीधाम, गुजरात) सारख्या संस्था भारतीय ज्ञान परंपरांवर आधारित अभ्यासक्रम आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करीत आहेत.
शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी बोर्ड परीक्षेचे निकाल विद्या भारतीच्या शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध करतात. ९३% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी १२ वी उत्तीर्ण झाले आहेत, त्यापैकी २,५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ९६.५% विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत, त्यापैकी २७,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. देशभरातील ३२८ शाळा सीबीएसईशी संलग्न आहेत, तर उर्वरित राज्य मंडळांअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
विद्यार्थ्यांनी उत्तराखंड, ओडिशा आणि पंजाब या राज्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून आणि हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, आसाम इत्यादी राज्यांमधील राज्य शिक्षण मंडळांच्या गुणवत्ता यादीत पहिल्या १० स्थानांवर विक्रम प्रस्थापित केले आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे, यावर्षी २७ हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे – प्रकाश यादव (प्रयागराज), विभोर सारस्वत (शिकारपूर, बुलंदशहर, उत्तर प्रदेश) आणि ऋषभ चौधरी (गरोथ, मध्य प्रदेश) यांनी टॉप ५० मध्ये स्थान मिळवले आहे. या सर्वांवरून हे सिद्ध होते की सामान्य माणसाचे मूल्य-आधारित शिक्षण देखील जागतिक मानकांपेक्षा चांगले निकाल देत आहे.