मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधाकारक पडत असल्याने तलावांतील जलसाठ्यात ३,६४,२३३ दशलक्ष लिटर म्हणजे २५.१७ टक्के इतकी वाढ झाली आहे. हा साठा पुढील १८ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.
मुंबई दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. मुंबई महापालिकेकडून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावात मिळून १,९०,७७१ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ४७ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता.
मात्र गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावातील हा पाणीसाठा आता ३,६४,२३३ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ९१ दिवस म्हणजे १८ सप्टेंबर पुरेल इतका झाला आहे.गेल्या आठवड्यात सात तलावातील पाणीसाठ्याची पातळी ९ टक्केवर आली होती. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पालिकेनेही राखीव साठा वापरण्यास सुरुवात केली. मात्र गेल्या तीन - चार दिवसात तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने तलावातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होऊ लागली आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची गरज असते.
त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मात्र जर पाणीसाठा कमी असेल तर मुंबईकरांवर किमान ५ टक्के ते २० टक्के इतक्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागते. मात्र चार - पाच दिवसांत तलांव क्षेत्रात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांची पाणीचिंता आता मिटली आहे.
दात कमकुवत का होतात? काळजी कशी घ्यावी? डॉक्टर काय सांगतात...२० जून सकाळी ६ पर्यंतचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा -: ६१०२८
मोडक सागर -: तलाव जलसाठा ५७३३७
तानसा -: ४०६९३
मध्या वैतरणा ४२६८०
भातसा -: १४८४६२
विहार -: ११०२६
तुळशी -: ३००७
सन २०२५ - ३६४२३३
सन २०२४ - ७७०५२