आंध्र प्रदेशचा प्रकल्प, तेलंगणा सरकारने त्याचा विरोध केला
Marathi June 21, 2025 12:24 PM

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची घेतली मुख्यमंत्री रेड्डीनी भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेलंगणा सरकारने आंध्रप्रदेश सरकारकडून प्रस्तावित गोदावरी-बनकचेरला जोड प्रकल्पावर चर्चेसाठी हैदराबाद येथे सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेतली आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची तातडीने भेट घेतली आहे. तर हैदराबाद येथील बैठकीत भाजपचे दोन खासदार सामील झाले. गोदावरी-बनकचरेला प्रकल्पावरुन तेलगूभाषिक राज्यांदरम्यान (तेलंगणा आणि आंध्रप्रदेश) तणाव वाढला आहे.

भाजप एकीकडे तेलंगणात सातत्याने मजबूत होत आहे, तर आंध्रप्रदेशात भाजप सत्तारुढ आघाडीत सामील आहे. यामुळे भाजपसमोर विचित्र संकट उभे ठाकले आहे, कारण या प्रकल्पाला मंजुरी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस रणनीतिक स्वरुपात बीआरएसला थेट आणि भाजपला अप्रत्यक्ष स्वरुपात लक्ष्य करत आहे. या प्रकल्पावरून मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेत तेलंगणाच्या आक्षेपांची माहिती दिली आहे. रेवंत रेड्डी  यांनी गोदावरी-बनकचेरला प्रकल्पावरून यापूर्वीच्या बीआरएस सरकारला जबाबदार ठरविले आहे.

प्रस्ताव मिळाल्यावरच होणार पडताळणी

केंद्र सरकारची भूमिका याप्रकरणी सतर्क आहे. तेलंगणाचे सिंचनमंत्री एन. उत्तम कुमार रे•ाr यांच्या पत्राच्या उत्तरादाखल केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांनी योग्यप्रकारे प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी सर्वेक्षण करविण्यात आले आहे. गोदावरी-बनकचरेला योजनेचा विस्तृत प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर केंद्रीय जल आयोग दिशानिर्देश, लवादाचे निर्णय, आंतरराज्य करार आणि एपीआरए 2014 च्या तरतुदींनुसार याबाबत निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजपकडून काँग्रेस सरकार लक्ष्य

तेलंगणातील काँग्रेस सरकारने राज्याची जनता आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रे•ाr याप्रकरणी दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे ते कृष्णा आणि गोदावरीतून तेलंगणात पाणी मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याचे नाटक करत आहेत, तर दुसरीकडे आंधप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडु यांना यासंबंधी त्यांनी एक पत्रही लिहिले नाही. यातून रेवंत रे•ाr हे याप्रकरणी गंभीर नसून केवळ राजकारण करत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका भाजप खासदार पुरी अरविंद यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.