नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीला चार-पाच महिन्यांचा कालावधी राहिला असताना. मतदार याद्यांच्या फेरतपासणीदरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची सत्यता तपासण्याचा विचार निवडणूक आयोग करीत आहे. मतदारयाद्यांत नावांचा समावेश तसेच नावे कमी करण्यात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आणि काही सामाजिक संघटनांकडून वारंवार होत असल्यामुळे आयोगाकडून वरील पाऊल उचलले जाणार असल्याचे समजते.
OBC Sarpanch Reservation: आनंदाची बातमी! ओबीसी सरपंच आरक्षणात वाढ; ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत लवकरचमतदार याद्यांमध्ये फेरफार करत निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही काळापासून करत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावत या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले होते. सर्व नियमावलीचे पालन करत तसेच राजकीय पक्षांच्या देखरेखीखाली निवडणूक होत असते.
त्यामुळे त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता नाही. काही पक्षांकडून केले जात असलेले आरोप निराधार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. तथापि विरोधी पक्षांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी बिहार निवडणुकीपूर्वी तेथील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवेळी घरोघरी जाऊन मतदारांची सत्यता तपासण्याचा आयोग विचार करत आहे.
Nitin Gadkari: नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा होणार विकास; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नितीन गडकरींनी दिली मान्यताफेरतपासणीही गैरप्रकार
नोकरी, रोजगार, विवाह, शिक्षण आदी कारणांमुळे मतदार राज्याच्या दुसऱ्या भागात किंवा अन्य राज्यात स्थलांतरित होत असतात. अशा स्थितीत मतदार याद्यांचे फेरतपासणी करणे आवश्यक ठरते. याद्यांच्या फेरतपासणीवेळी गैरप्रकार केला जात असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. २०२४ मध्ये ४६.२६ लाख लोकांनी निवासस्थान बदलले असल्याचे आयोगाला सांगितले होते. २.३२ कोटी लोकांनी विविध प्रकारच्या सुधारणांच्या अनुषंगाने अर्ज केले होते. तर ३३.१६ लाख लोकांनी नवे मतदार ओळखपत्र देण्याची विनंती आयोगाकडे केली होती.