बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू होईल मात्र या ठिकाणी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेला आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनात ही मतमोजणी होणार आहे.
लातूर मनपा आयुक्त मीना ऍक्टिव्ह मोडवर, शहरातील अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाईलातूर शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढत चालल्याने. महानगरपालिकेने अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, शहरातील गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम लातूर मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात राबविली जात आहे. तर काल पासून 40 अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. महात्मा गांधी चौकापासून गंजगोलाईच्या दिशेने मेनरोडवर झालेले अतिक्रमण आज देखील हटविण्यात येणार आहे.
फुटपाथ वरील टपऱ्या, दुकान रोडवर आलेले शेड हटविण्यात आल्याने शहरात वाहतूक देखील सुरळीत होणार आहे.
जालना जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्णजालना जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालीय. जिल्ह्यात यंदा 6 लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत अडीच लाख हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा लवकर पेरण्या केल्या. या हंगामात कापूस, मका, सोयाबीन या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात खते आणि बियाण्यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून बोगस खते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही या दृष्टीने कृषी विभाग लक्ष ठेवून आहे.
मोकाट जनावरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, एक जण जखमी- नाशिकच्या कळवण शहरातील धक्कादायक घटना
- भर रस्त्यात दोन मोकाट जनावरांच्या भांडणात चवताळलेल्या जनावरांच्या हल्ल्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू
- भालचंद्र मालपुरे असे मृत वृद्धाचे नाव
- मोकाट जनावरांनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्याने वृद्धाचा मृत्यू, एक जण जखमी
- संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद
दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा आजपासूनयात दहावीच्या परीक्षेसाठी ३४ हजार ५६२ आणि बारावीच्या परीक्षेसाठी ६८ हजार ९८ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ही पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्येच सुरू होत आहे
राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी परीक्षा
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा
दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै, तर बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे.
पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊसपुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती जलसाठा ?
खडकवासला: 63.60 टक्के
पानशेतः 34.07 टक्के
वरसगावः 42.99 टक्के
टेमघर: 23.68 टक्के
चार ही धरणात एकूण धरण साठा: 38.67 टक्के
मागच्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा: 12.32 टक्के
ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थसोपानकाकांच्या सासवड नगरीत दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली. जेजुरी नगरीमध्ये आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पहायला मिळणार आहे. खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं स्वागत केलं जातं. हा सोहळा म्हणजे डोळ्यांचा पारणे फेडणारा असतो. लाखो वारकरी आता जेजुरी नगरीकडे निघाले आहेत. माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी असणार आहे.
राज्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलादमदार पावसामुळे पेरण्यामध्ये वाढ
राज्यात 23.27 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण
गेल्यावर्षी याच दिवशी 19 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या
राज्यात 33 लाख 59 हजार 89 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत
सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या या पुणे विभागात झाल्या आहेत
रत्नागिरीतील 28 धरणं 100% भरलीरत्नागिरीत पडणा-या पावसामुळे इथल्या धरण क्षेत्रात कमालीची वाढ झालीय.समाधानकारक पाऊस सध्या रत्नागिरीत पडतोय.जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 28 धरणं 100 टक्के भरली आहेत.तर 28 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत.मंडणगड तालुक्यातील 3, दापोली तालुक्यातील 3, खेडमधील 3, गुहागरमधील 1, चिपळूणमधील 6, संगमेश्वरमधील 3, रत्नागिरीमधील 1, लांजामधील 4, राजापूरमधील 4 धरणं 100 टक्के भरली आहेत.सर्व धरणांमध्ये 305.53 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.
गोपाल दातकर यांचं आमरण उपोषण मागेठाकरे जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांचं आमरण उपोषण 5 दिवसांनंतर मागे घेण्यात आले. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थित हे उपोषण मागे घेण्यात आले. दहीहंडा परिसरातील पाणीप्रश्न संदर्भात दातकर यांनी उपोषण सुरू केल होत. 5 दिवसानंतर संबंधित विभागाने पाणीपुरवठा दिलेल्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.. दरम्यान, अकोल्यातल्या दहीहांडा व परिसरात नोव्हेंबर 2024 पासून सातत्याने तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे, त्यामुळं गोपालं दातकर यांनी दहीहांडा येथे आमरण उपोषण सुरू होते. अखेर दोन गावांसह दररोज पाणीपुरवठा करणार असल्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर दहीहंडा परिसरातील पाणी प्रश्न मार्गी लागलाय..
मोर्णा नदीच्या पुलावरून तरुणाने मारली उडी? शहरभर चर्चा, नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी.अकोल्यातल्या मोर्णा नदीच्या मोठ्या पुलावरून एका तरुणाने उडी मारली, अशी चर्चा अकोल्यात सर्वत्र झाली.. अकोला पोलिसांपर्यत देखील ही चर्चा पोचली.. पोलिसांसह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं.. जवळपास रात्री दोन वाजेपर्यंत मोर्णा नदीत आणि पुलाच्या परिसरात शोध मोहीम राबवण्यात आले. मात्र, पुलावरून तरुणाने उडी घेतली असल्याचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही.. परंतु तरुणाने पुलावरून उडी घेतल्याच्या चर्चेनंतर पोलिसांसह शोध बचाव पथकाची चांगली धावपळ झाली. तसेच घटनास्थळी पाहणाऱ्यांची देखील मोठी गर्दी जमली होती..काल रात्री अकरावाजे पासून सुरू झालेली शोध मोहीम रात्री दोन वाजेपर्यंत चालली होती. तरीही पथकाला खाली हात परतावं लागलं. आता पुन्हा सकाळपासून तरुणाच्या शोधार्थ शोध मोहीम राबवला जाणार आहे. मात्र, तरुणाने नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या चर्चेने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवी सुनावणी आज होणारबीडच्या विशेष मको का न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवी सुनावणी आज होणार आहे.
सुनावणीसाठी स्वतः विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.
वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावरती आज न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.
आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरती सरकारी वकील उज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत.
आरोपी वाल्मीक कराडने दोष मुक्तीसाठी केलेल्या अर्जावरती आज बीड न्यायालयात होणार फैसला.
आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यूमुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीक खांब येथे कारला भिषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला तर कारमधील तीन प्रवासी गंभिर जखमी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात कारचं मोठं नुकसान झाल असून स्थानिक बचाव पथकांनी मृत आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
पालकांकडून शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी, शालेय साहित्यासह गणवेश महागलेअमरावती शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत.शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून पालकही साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत.गतवर्षी पेक्षा यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून यात २५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे.तर बाजारात शालेय साहित्य घेण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.
सामान्यतः कच्चा माल, पेट्रोल व डिझेल यांचे भाव वाढल्याने यावर्षी शालेय साहित्यही महाग झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुस्तके, गाईड, वर्क बुक्स सोबतच वह्या, दफ्तर, जेवणाचे आकर्षक डबे आणि वॉटर बॅग्ज अशा साहित्याने बाजारपेठ सजली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादक कंपनीने दरात काही प्रमाणात वाढ केली आहे. दरवर्षी शालेय साहित्य दरवाढीचा सामना पालकांना करावा लागत आहे.
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्कासांगलीत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का. मिरज शहर प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश
विद्यार्थ्यांच्या पायचे ठसे कागदावर उमटवलेबुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आणि शाळेये प्रवेश मोठ्या उत्साह, वातावरणामध्ये संपन्न झाला विद्यार्थ्यांचे अभेक्षण करून विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे उमटवून हातामध्ये फलक घेऊन नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची खंडाळा गावातून ट्रॅक्टर , मधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना शाळेय गणवेश बुट व पुस्तके वही पेन शाळेय साहित्याचा वाटप करण्यात आला या वेळी सर्व पालकांनी शाळेकरता सहकार्य केले या मिरवणुकीत पालक ही उपस्थित होते.