इराणहून भारतात सुखरूप परतलेले उत्तर प्रदेशातील बरेली येथील यात्रेकरू आज आपल्या मातृभूमीच्या मातीचे चुंबन घेऊन देवाचे आभार मानत आहेत. परत येताना त्यांच्या डोळ्यात भीती होती. पण इथे आल्यावर आता ते आपल्याच लोकांमध्ये पुन्हा आले आहेत, याचे समाधान ता त्यांच्या डोळयात दिसतं. इराणमध्ये घालवलेले ते चार दिवस त्यांच्यासाठी एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. डोक्यावर उडणारी मिसाइल्स, धमाका-स्फोटांचे आवाज आणि बंद झालेली एअरपोर्ट्स. पुढचा निशाणा आपण बनून आपलाच जीव जाणार नाही ना याची भीती त्यांना सतत सतावत होती.
तीर्थयात्रेनंतर परतलेल्या बरेलीच्या कांगी टोला येथील नजमा बेगम म्हणतात की, चार दिवस असे गेले, तेव्हा असं वाटलं की मायदेशात परतणे शक्य नाही. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून आकाशात अनेक मिसाइल्स उडताना दिसत होती. क्षणभर माझे हृदय धडधडलं. मग मला वाटलं की जर इथेही मृत्यू आला तर मी ते शहीद म्हणून स्वीकारेन. आम्ही तर कफनही खरेदी केलं होतं. इराणमधील वातावरण खूप भावनिक होते. लोक एकमेकांना धीर तर देत होते, पण आतून तर सगळेच घाबरले होते.
विमान रद्द झाल्याचं ऐकलं आणि हादरलोच..
मायदेशी परत आलेल्यांमध्ये ठाणे बारादरी परिसरातील मीरा की पैठ येथील रुखसर नक्वीही होती. ‘जेव्हा विमान रद्द झाल्याची बातमी कळली तेव्हा मी माझं हृदय थरथर कापू लागलं. जणू काही सगळ्या आशाच संपल्या. मला रात्री झोपही येत नव्हती. माझी एकच प्रार्थना होती, कसंतरी करून मला मायदेशी परतता येऊ दे. भारतीय दूतावासाने आम्हाला मदत केली आणि आम्हाला कोमहून मशदला नेण्यात आले. आम्हाला मशदमधील एका चांगल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. पण आमची मातृभूमी पाहण्यासाठी आमचे मन अस्वस्थ होते.’ असा अनुभव तिने कथन केला.
मिसाइल्सचे व्हिडीओही बनवले
बरेलीच्या प्रेमनगर परिसरातील किला कॅन्टोन्मेंट येथील हसन जाफर यांनी आपल्या हृदयद्रावक कहाणीचे वर्णन केलं. तेथील लोकांना आकाशात उडणाऱ्या मिसाइल्सचे व्हिडिओ बनवण्याची इतकी सवय झाली होती. पण आम्ही भारतीय यात्रेकरू घाबरलो होतो. स्फोटांचे आवाज अगदी हादरवणारे होते. मशद विमानतळावरही मोबाईल फोन बंद होते. मायदेशी सुखरूप पोहोचता यावे एवढीच सगळेजण मनापासून प्रार्थना करत होते, असं त्यांनी सांगितलं.
दिल्ली एअरपोर्टवर तिरंगा देऊन स्वागत
किला येथील मुजीब जेहरा यांनी सांगितलं की, यात्रेकरूंना फारशी अडचण आली नाही, पण सर्वांच्या मनात भीती होती. भारतीय दूतावासाचे मिसम रझा आणि इराणमधील मौलाना हैदर साहब यांनी खूप मदत केली. जेव्हा आम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचलो तेव्हा लोकांनी आम्हाला तिरंगा दिला तेव्हा आमचे डोळे भरून आले. असं वाटलं जणू आपल्याला पुन्हा आयुष्य मिळालं. भारत सरकार आणि इराण सरकारचे आभार मानते.
मायदेशी येऊन मिळालं समाधान
इराणला गेलेले बरेलीचे हे यात्रेकरू, आता आयुष्यभर लक्षात राहतील अशी कहाणी घेऊन परतले आहेत. मृत्यू त्यांच्या डोक्यावर येऊन ठेपला होता, मात्र तरीही त्यांनी हिंमत गमावली नाही. इराणमध्ये राहणे खूप कठीण होते, मात्र त्यापे7ाही कठीण होतं ते आपल्या मायदेशापासून दूर राहणं. आता सगळेजण सुखरुपरित्या मायदेशी परतलेत तर समाधाना मिळालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.