Panchayat Season 4 Cast Fees: टीव्हीएफची 'पंचायत' ही भारतीय प्रेक्षकांची आवडती वेब सिरीज आहे, जी पुन्हा एकदा तिच्या चौथ्या आणि धमाकेदार सीझनसह परतली आहे. या सीझनमध्ये क्रांती देवी आणि मंजू देवी यांच्यात प्रधान बनण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पंचायतच्या चौथ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
पंचायत ४ ची कथा लोकांना थोडी कंटाळवाणी वाटली असली, तरी या मालिकेतील स्टारकास्ट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. जितेंद्र कुमारने या सीझनमध्ये सचिवाची भूमिका साकारली होती, तर रघुबीर यादव प्रधान म्हणून प्रसिद्ध झाले. मंजू देवीपासून ते प्रल्हाद चा आणि विकास-रिंकीपर्यंत, सर्वजण आता प्रत्येक घरात प्रसिद्ध झाले आहेत. 'पंचायतच्या या सीझनसाठी सर्वात जास्त पैसे कोणी घेतले ते जाणून घेऊया.
Aap Jaisa Koi: आर माधवन आणि फातिमा सना शेख यांच्या रोमँटिक ड्रामाची पहिली झलक आली समोर; 'आप जैसा कोई'चा रोमँटिक ट्रेलर रिलीजपंचायत ४ साठी या अभिनेत्याला सर्वाधिक फी मिळाली
पंचायत ४ साठी सचिव म्हणजे जितेंद्र कुमार यांना सीझन 4 साठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. बातमीनुसार, जितेंद्र कुमार उर्फ अभिषेक त्रिपाठी यांनी 'पंचायत सीझन 4' च्या प्रत्येक भागासाठी 70000 रुपये आकारले आहेत. म्हणजेच संपूर्ण सीझनसाठी त्याची एकूण फी सुमारे 5 लाख 60000 आहे.
Robbery in Actor House: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी झाली चोरी; रायफल सोडून चोरांनी लाखोंची मालमत्ता केली लंपासView this post on InstagramA post shared by prime video IN (@primevideoin)
जितेंद्र कुमारनंतर, दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मानधन आकारणारी अभिनेत्री नीना गुप्ता आहेत, ज्यांनी संपूर्ण सीझनसाठी 4 लाख रुपये आकारले आहेत, त्यांची प्रत्येक एपिसोडची फी 50 हजार होती. तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे ऑनस्क्रीन पती आणि फुलेराचे प्रधान उर्फ रघुवीर यादव आहेत ज्यांनी मालिकेसाठी प्रति एपिसोड सुमारे 40,000 रुपये आणि संपूर्ण सीझनसाठी 3,20,000 रुपये आकारले.
प्रल्हाद चाने प्रत्येक एपिसोडसाठी २०,००० रुपये घेतले आणि संपूर्ण ८ एपिसोडसाठी त्याचे मानधन १,६०,००० रुपयांपर्यंत पोहोचले, तर चंदन रॉय उर्फ विकासनेही फैसल मलिकने १,६०,००० रुपये इतकेच मानधन घेतले.