आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो. यंदा आषाढ महिन्याची एकादशी 6 जूलै रोजी आहे. या एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ असे म्हटले जाते. देवशयनी या शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो की, ‘देव’ भगवान विष्णू ‘शयनी’ अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते. म्हणजेच याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेसाठी जातात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. ज्योतिषशास्त्रात चातुर्मासातील पूजेचे विशेष महत्त्व वर्णन केले आहे. या चार महिन्यात पूजा, पठण, जप आणि तपस्या केल्यास पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. 2025 मधील चातुर्मास कधी संपणार आहे, जाणून घेऊयात लेखातून,
कधी सुरू होईल चातुर्मास?
2025 मधील चातुर्मास 6 जूलैपासून सुरू होणार असून 1 नोव्हेंबर रोजी संपेल. दुसऱ्या दिवशी अर्थात 2 नोव्हेंबर रोजी सर्व शुभ कार्ये तुळशी विवाहाने पुन्हा सुरू होतील.
पुढील गोष्टी कराव्यात –
या गोष्टी करणे टाळा –
चातुर्मासात शुभ कार्ये का केली जात नाहीत?
धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. भगवान विष्णू हे शुभ कार्यांचे संरक्षक मानले जात असल्याने त्यांच्या झोपेच्या वेळी ही कामे करणे योग्य मानले जाते. कारण, या काळात शुभ कर्मांचे फळ मिळत नाही. याव्यतिरिक्त दुसरं कारण म्हणजे चातुर्मास पावसाळ्यात येत असल्याने या दिवसात हवामान दमट असते. या वातावरणात बॅक्टेरिया अधिक असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात. प्रवास करणे देखील कठीण होते. अशावेळी लग्नासारखी शुभ कार्ये आयोजित करणे गैरसोयीचे ठरू शकते.
हेही पाहा –