केदार जाधव यांनी काही दिवसांपूर्वी भाजप मध्ये केला होता प्रवेश
बारामती मधील क्रिकेट ग्राउंड च्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी केदार जाधव यांनी घेतली अजित पवारांची भेट
बारामती मधील माळेगांव साखर कारखान्यात यश मिळाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो असल्याची केदार जाधव यांनी दिली माहिती
पावसामुळे मावळतील धरण पाणीसाठ्यात वाढ, पवना धरण 55% तर कासरसई धरण शंभर टक्के भरलेमावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 55 टक्के भरले असून कासरसाई धरण 100% भरलेले आहे. कासरसई धरणाच्या सांडव्यावरून 340 क्लासेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मावळ तालुक्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भटकया कुत्र्याचे हल्ल्यात वानराचा मृत्यू ,नागरिकांनी वानरावर केले अंत्यसंस्कारसांगलीच्या आष्टा येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका वानराचा मृत्यू झाला आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू असून अनेक नागरिकांना देखील भटक्या कुत्र्यांकडून जखमी करण्याचे प्रकार घडले असताना, आता भटक्या कुत्र्यांकडून एका वानराला लक्ष करण्यात आला आहे,आष्टा शहरातील शिंदे मळा येथे एका भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामध्ये वनराचा मृत्यू झाला आहे,या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वानरावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्याचबरोबर आष्टा नगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
सारथी संस्थेतील पायऱ्यावरील कामावरून अजित पवार यांची नाराजीPWD च्या अधिकार्यावर नाराजी व्यक्त करत पायऱ्यावर लावलेल्या ग्रेनाईटमध्ये पाणी मुरत नाही
अस का झाल त्याची माहिती मला पाहिजे, अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं
पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यावर पाणी साचले आहे
त्यामुळे अजित पवार यांच्या पाहणीत दिसल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
अजित पवारांनी PWD अधिकार्याकडून तातडीन मागितली माहिती
Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या सेनेला नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा मोठा धक्का- ठाकरे सेनेचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज 8 माजी नगरसेवकांसह करणार शिंदेच्या सेनेत प्रवेश
- आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार जाहीर प्रवेश
- प्रवेशासाठी थोड्याच वेळात नाशिकहून शेकडो वाहनांचा ताफा शक्तिप्रदर्शन करत ठाण्याकडे होणार रवाना
- विलास शिंदे सह 8 माजी नगरसेवक,12 जिल्हा परिषद सदस्य,40 हून अधिक सरपंच,जिल्हा बँक,बाजार समितीचे आजी माजी पदाधिकारीही करणार शिंदे गटात प्रवेश
- सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदे गटात गेल्याने ठाकरें सेनेला अवघ्या 1 महिन्यात दुसरा मोठा धक्का
ST बस धावली फक्त ३ नटबोल्टवर, ST महामंडळाचा जीवघेणा प्रवासएस टी महामंडळाची बस चक्क तीन नट बोल्ट वर धावत असल्याचा प्रकार श्रीवर्धन बस डेपो परिसरात उघडकीस आला आहे. ही बस मुबई कडून श्रीवर्धन पर्यंत प्रवास करीत आली मात्र ही बस पुढील प्रवासासाठी म्हणजे दिघी ला निघाली असता जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी प्रवाशांनी या घटनेवर संताप व्यक्त केला तर गाडीची दुरुस्ती करून घेतली मात्र हा प्रकार उघडकीस आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता या प्रकारामुळे एस टी महामंडळाकडून बसेस ची देखभाल तांत्रिक तपासणी होत नसल्याचे समोर येत आहे. तर दुर्घटना घडल्यावरच एस टी प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.
राज्यात बरसला सरासरीच्या 93 टक्के पाऊस, विदर्भात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद28 जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस बरसला
पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने गाठली सरासरी
अजून दोन दिवस शिल्लक असून सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता
राज्यात जून मध्ये सरासरी 208 मिलिमीटर पाऊस पडतो मात्र त्या तुलनेत काल शनिवार पर्यंत 194 मिलिमीटर अर्थात ९३ टक्के पाऊस पडला आहे
25 ते 50 टक्के पाऊस असणाऱ्या तालुक्यांची संख्या 38 तर 75 ते 100% पाऊस 87 तालुक्यांमध्ये झाला
155 तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या शंभर टक्के हजेरी लावली
अल्पवयीन मुलांनी माजवली कोयत्याने दहशत, शोरूम फोडलं सर्व प्रकार सीसीटीव्हीपुण्याच्या सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या माणिक बागेमध्ये तीन जणांनी कोयत्याने शोरूम चे नुकसान केले .त्याचबरोबर गाड्यांची तोडफोड केली. याबाबत सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
तीनही आरोपी अल्पवयीन आहेत. भाईगिरी करायची आहे या हेतूने रात्री अडीचच्या सुमारास तीन जण शोरूम जवळ आले आणि त्यांनी शोरूम फोडलं.
नाशिकमध्ये पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात- नाशिकमध्ये पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात, मात्र पाऊस सुरू झाल्यास पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आल्यानं पाणी पातळी घटली
- सद्यस्थितीत गंगापूर धरणातून १,३६० क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिरतानाजी सावंत यांना शनिवारी दुपारी ४:३० वाजता रूबी हॉल क्लिनिक, ससून रोड येथे चक्कर येणे, उलटी होणे आणि हृदयाची धडधड वाढणे या तक्रारींमुळे दाखल करण्यात आले होते
दाखल होताच आपत्कालीन वैद्यकीय पथकाने त्यांची तत्काळ तपासणी केली व त्यानंतर अधिक तपासणी व निरीक्षणासाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
राजापूरमध्ये दुकानांना भीषण आगरत्नागिरी- राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठत रात्री दीड वाजता दुकानांना भीषण आग
आगीत सात दुकाने जळून खाक, राजेश दत्ताराम पावस्कर यांच्या इमारतीला आग
आगीवर स्थानिक ग्रामस्थ आणि राजापूर अग्निशामक दलाने मिळवलेले नियंत्रण
इमारतीमध्ये असलेले दुकान गाळ्यातील सामान आणि दुकान गाळे जळून नुकसान
ग्रामस्थांकडून खाजगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
कोणतीही जिवित हानी नाही, पण उपहारगृहा पासून फोटो स्टुडिओ पर्यत या इमारतीत होती दुकाने
yavatmal News : हमी केंद्रावर ज्वारीची खरेदी उद्यापर्यंतच होणारयवतमाळ जिल्ह्यात यावर्षी दहा हजार हेक्टर वर शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची लागवड केली संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड होत असताना खुल्या बाजारात ज्वारीचे दर पडले आहेत.केंद्र शासनाने ज्वारीला 3371 रुपये क्विंटलचा हमीदर जाहीर केला आहे. तर खुल्या बाजारात बाजार समितीमध्ये ज्वारीला 1800 ते 2000 रुपये क्विंटलचा दर आहे. एका क्विंटल मागे ज्वारीला दीड हजार रुपयाचा घाटा सहन करावा लागत आहे अशात हमी केंद्रावर ज्वारीची खरेदी उद्यापर्यंतच होणार असल्याने ज्वारी उत्पादन शेतकरी अडचणीत आले आहे.
पंढरपुरात तुळशी माळा तयार करण्याच्या कामाला वेगआषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात तुळशी माळा तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. पंढरपुरातील काशी कापडी समाजातील तरुणांनी तुळशी माळा तयार करण्याचा पारंपारिक व्यवसाय जपला आहे.
कोचिंग क्लासेस उमा किरण लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार व प्रशांत खटावकर बीड पोलिसांच्या ताब्यातपुण्याकडून मांजरसुंबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पातखंना मिळाली आणि त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलिसांनी सापळा लावत दोन आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे त्यांची बीडच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक दाखवली आहे.
उल्हासनगरात भरधाव कारने तीन ते चार जणांना उडवलंशनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास कुर्ला कॅम्प रस्त्यावरील पाणीपुरी हातगाडीवर काही नागरिक पाणीपुरी खात उभे होते. यावेळी अचानक भरधाव कार हातगाडीला येऊन धडकली. यात हातगाडीवर उभ्या असलेलं ३ ते ४ नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का? याचा तपास केला जातोय.
भंडाऱ्यात शिंदेंनी लगावला ठाकरेंना टोलाभंडाऱ्यात आभार यात्रेच्या निमित्ताने भंडारा येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा झाला. यादरम्यान, शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही' असं वक्तव्य शिंदेंनी केले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला आहे. 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल', 'काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल', 'काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली आहे.