Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून होणार सुरू
esakal June 30, 2025 02:45 PM
Narsobawadi Datta Temple : नृसिंहवाडी दत्त मंदिरातील पाणी आज उतरण्याची शक्यता

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात आठवडाभर दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने पाणी पातळी कमी जास्त होत आहे. आज समोरील बाजूस कृष्णा नदी पात्रासमोर मंदिरात दोन फूट पाण्यात राहूनच भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दरम्यान, नदीपात्रातील पाणी कमी होत असून, आज (ता. ३०) मंदिर दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे.

Rajesh Kumar Meena : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या सोमवारी (ता. ३०) निवृत्त होत असल्याने मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेशकुमार मीना उद्या (सोमवारी) दुपारी चार वाजता पदाची सूत्रे स्वीकारार आहेत.

Kavlesad Point : कावळेसाद पॉईंट सायंकाळी पाचनंतर पर्यटकांसाठी बंद

सावंतवाडी : आंबोली येथील कावळेसाद पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी पाचनंतर कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असली तरी, यामुळे पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. दुसरीकडे या निर्णयाने कावळेसाद पॉईंटवर होणारे जीवघेणे प्रसंग टाळण्यास मदत होणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून होणार सुरू

Latest Marathi Live Updates 30 June 2025 : राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आवाज उठवत वातावरण तापविल्यानंतर आज सरकारने या संदर्भात काढलेले दोन्ही शासननिर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, शेतकऱ्यांविषयीची सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत आणि विविध भ्रष्टाचारांमध्ये मंत्र्यांचा सहभाग असल्याचा निषेध करत विरोधकांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (ता. ३०) सुरू होत आहे. ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ५० जण जखमी झाले आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज निवृत्त होत असल्याने मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेशकुमार मीना आज दुपारी चार वाजता पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आंबोली येथील कावळेसाद पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी पाचनंतर कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.