जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील महिला केवळ त्यांच्या दागिन्यांसाठी किंवा कपड्यांसाठीच नाही, तर त्यांच्या चमकदार त्वचेसाठीही ओळखल्या जातात. नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि आता राधिका मर्चंट या सर्वांच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो कायमच पाहायला मिळतो.
अंबानी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर इतकं तेज कसे असते, त्यांच्या सौंदर्याचे रहस्य काय, त्या दिवसभर काय स्किनकेअर रुटीन फॉलो करतात, याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबिय त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लोसाठी महागड्या फेशिअलपेक्षा शिस्तबद्ध जीवनशैलीचा आणि नैसर्गिक उपचारांवर भर देते.
अंबानी कुटुंबियांच्या आहारात दररोज ताज्या फळांच्या रसांचा विशेषतः अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त रसांचा समावेश असतो. ते त्वचेच्या बाह्य सौंदर्यासाठी Cleansing, Toning आणि Moisturizing हे त्रिसूत्री मॉडेल पाळतात.
अंबानी कुटुंब दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुतात, ज्यामुळे छिद्रे मोकळी राहतात. तसेच त्वचेचा pH स्तर राखण्यासाठी टोनरचा वापर करतात. त्यासोबतच घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा घरातही प्रखर दिवे असताना त्या सनस्क्रीन लावणे कधीच विसरत नाहीत.
सूर्याच्या UV किरणांपासून संरक्षण मिळाल्यामुळे त्यांच्या त्वचेवर अकाली सुरकुत्या किंवा काळे डाग येत नाहीत. अंबानी कुटुंबाचा आहार प्रामुख्याने शाकाहारी आणि ‘प्लँट-बेस्ड’ (वनस्पतीजन्य) असतो.
त्यांच्या ताटात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असते. अंबानी कुटुंबात मासांहार वर्ज्य आहे.
अंबानी कुटुंब मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Foods) टाळल्यामुळे पचन सुधारते आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसून येतो. ते शक्यतो सूर्यास्तापूर्वी किंवा रात्री ८ च्या आत हलके जेवण घेतात.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचा रिपेअर होण्यासाठी त्या खास नाईट सीरमचा वापर करतात. व्हिटॅमिन सी आणि ई युक्त सीरममुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहते. केवळ बाहेरून क्रीम लावून सौंदर्य येत नाही, तर मानसिक शांतीही महत्त्वाची असते.
नीता अंबानी नियमितपणे योग आणि ध्यान करतात. योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. त्यामुळे अंबानी कुटुबियांतील व्यक्तींची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.