Rohit Pawar : राज ठाकरेंनी कोणते दोन दाखले दिले ? रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा काय ?
Tv9 Marathi February 27, 2026 09:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्या घटनेला उद्या 1 महीना होईल. 28 जानेवारी रोजी बारामतीला सभेसाठी जात असताना व्हीएसआर कंपनीचं विमान लँडिंगदरम्यान खली कोसळलं आणि स्फोट झाला. यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात आहे असा संशय लोकांच्या मनात असून त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)  तर हा विषय लावू धरला आहे. याच मुद्यावरून ते सातत्याने पाठपुरावा करत असून मुंबई, दिल्लीतील पत्रकार परिषदा घेतल्या,खासगी गुप्तहेर संघटनांना दिलेला तपास,  अशा सर्व माध्यमांतून ते अजित पवारांच्या अपघातामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले होते मात्र त्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे रोहित पवार नाराज असून व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते दोन दिवासंपूर्वी मुंबईतील पोलिस स्टेशनमध्ये गेले. तेथे काही दाद मिळाली नाही, त्यानतंर ते काल बारामती पोलिस स्टेशमथध्ये सुमारे दोन तास होते. मात्र या प्रकरणात अद्यापही एफआयआर दाखल झालेली नसून त्यामुळे ते उद्विग्न झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ते विविध नेत्यांची भेट घेत असून आज सकाळी त्यांनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधनाता राज ठाकरे यांच्याशी काय बोलणं झालं , हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.य

राज ठाकरेंनी कोणते दोन दाखले दिले ?

राज ठकरे यांना भेटायचं आहे, त्यांची वेल हवी आहे, अशी विनंती मी काल अमित ठाकरेंकडे केली. त्यानंतर आज राज साहेबांची भेट घेतली, अजित दादांचा विमान अपघात याबद्दल बोललो. त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी माहिती मी घेऊन गेलो, ती सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर बोलत असताना ते म्हणाले की हा महत्वाचा विषय आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की पोलिसांनी दोन एफआयआर का नोंदवून घेतला नाही, असा सवाल राज ठाकेर यांनी विचारला, असं रोहित पवार म्हणाले.

त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. ज्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे, असं राज ठाकेर यांनी सांगितलं.आणि दुसरा दाखला त्यांनी दिला, ते म्हणाले, काहीही झालं तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, असंही त्यांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले. या महाराष्ट्रात एका मोठ्या व्यक्तीचा नेत्याचा जर एफआयआरचं होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.