इराण आणि अमेरिका-इस्राईल यांच्या दरम्यान सुरु असलेले युद्धाची धग आता हिंदी महासागरापर्यंत आली आहे. हा भारतासाठी सामरिक धोरणात्मक दृष्ट्या महत्वपूर्ण भाग मानला जात आहे. मंगळवारी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात अमेरिकन पाणबुडीने इराणच्या विनाशिका आयआरआयएस डेनाला टॉरपीडो क्षेपणास्र डागून बुडवले आहे. द्वितीय जागतिक महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेने टॉरपिडोने शत्रूचे जहाज बुडवले आहे.
आयआरआयएस डेनाला भारता संयक्त नौदल कवायतींसाठी आली होती. आणि त्यानंतर ही युद्धनौकाल परतीच्या प्रवासाला लागली असताना तिच्यावर हा हल्ला अमेरिकेने केला आहे. या दरम्यान, पाकिस्तानने देखील सौदी अरब सोबत संरक्षण करार केल्याने तो इराण संघर्षात ओढला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. या घटनांमुळे भारतीय उपमहाखंड आणि दक्षिण आशियाई समुद्री क्षेत्रातील स्थिरतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आयआरआयएस डेनाने १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या खाडीत झालेल्या भारताच्या मिलन आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्हूयमध्ये सहभाग घेतला होता. या युद्धनौकेला भारतीय नौदलाने खास आमंत्रित केले होते. ही युद्धनौका आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनमहून परतत होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात या युद्धनौकेला अमेरिकन पाणबुडीने हिंद महासागरात लक्ष्य केले आहे.
रिपोर्टनुसार इराणच्या युद्धनौकेवरील ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकन नौदलाने आतापर्यंत ३० खलाशाने वाचवले आहे. त्यांना गाले येथील करापिटियाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.वायुदलाच्या मदतीने अजूनही शोध मोहिम सुरु आहे. ही कारवाई समुद्र कायदा युएन क्लोसअंतर्गत श्रीलंकेने आपली जबाबदारी घेतली आहे. समुद्र संकटात अडकलेल्या जहाजांना मदत करणे हे किनारी भागातील देशांचे कर्तव्य आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्राईलने इराणवर हवाई हल्ले सुरु केले होते. यानंतर इराण ड्रोन आणि मिसाईलने हल्ले करत आहेत. यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव पसरला आहे.
आयआरआयएस डेना युद्ध नौकेवरील हल्ला हा हे या गोष्टीचा संकेत आहे की हिंद महासागरात अमेरिकन नौदलाची मजबूत उपस्थिती राहणार आहे. हा भाग अमेरिकेच्या पाचव्या सागरी आरमाराच्या घेऱ्यात येते. ज्याचे मुख्यालय बहारीन येथे आहे. येथे नेहमीच युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुड्या असतात. टॉरपिडो हल्ल्यात जहाजाचा खालचा भाग तुटला आहे. यामुळे बचाव दलाला तेथे केवळ तेलाचा थर सापडला. जहाजाचा कोणताही भाग सापडला नाही.
अमेरिकेचा हा हल्ला भारताच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हद्दीच्याजवळ घडला आहे. भारताने अमेरिकेला सांगायला हवे की तुम्ही समुद्री युद्ध आमच्या दरवाजापर्यंत आणले आहे असे माजी नौदल प्रमुख एडमिरल अरुण प्रकाश यांनी म्हटले आहे. इराणच्या क्षेपणास्रांनी अमेरिकन नौदलाला भारतीय समुद्री सीमेजवळ आणले आहे. कदाचित अशाच कोणत्या परिस्थितीसाठी अमेरिकेने भारता सोबत २०१६ मध्ये LEMOA ( logistics agreement ) करार केला होता.
मात्र, आता अमेरिकेने कोणत्याही आगळीकी शिवाय सुरु केलेल्या या युद्धाचे भारताला काही घेणे देणे नसतानाही त्याचे धोकादायक परिणाम भोगावे लागू शकतात. यावेळी भारत सरकारला भारतीय हितांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्रपणे आणि समजदारीने पावले उचलायला हवीत. ही घटना इराण संकटात आपण ओढले जाण्याची शक्यता वर्तवत आहे असा इशारा संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले यांनी दिला आहे.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सवाल केला आहे की भारताचे आपल्या शेजारी कोणतेही प्रभाव क्षेत्र उरले नाही का ? हा हल्ला भारतीय सागरी हद्दीत झालेला नाही. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत झाला आहे. जर इराणी युद्धनौका श्रीलंकेला वळसा घालत कोच्चीला पोहचली असती आणि भारतीय सागरी सीमेत असती तर हा मोठा कुटनितीक वाद झाला असता.