वुमन्स टीम इंडियान आयपीएलच्या 19 व्या मोसमादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वुमन्स टीम इंडिया या दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 24 मार्च रोजी भारतीय संघाची घोषणा केली. या 15 सदस्यीय भारतीय संघात भारती फुलमाळी हीला संधी देण्यात आली. भारती शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2019 साली खेळली होती. त्यामुळे भारतीची गेल्या 7 वर्षांपासून प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनिमित्ताने भारतीची ही प्रतिक्षा संपणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.