नवी दिल्ली : भल्या भल्या संघांवर मात करून रणजी क्रिकेट स्पर्धेत इतिहास घडवत प्रथमच अजिंक्यपदाचा मान मिळवणाऱ्या जम्मू-काश्मीर संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून कौतुक केले. भविष्यातही येथील खेळाडूंचा हा प्रवास असाच सुरू राहील, असाही विश्वास व्यक्त केला.
‘मन की बात’ या आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, की मार्च महिना देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी उत्साह आणि आनंदाने भरलेला होता. ते म्हणाले, भारताने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा पराक्रम केल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आणि संघाच्या या दणदणीत यशाचा सर्व नागरिकांना अभिमान आहे.
Mithun Manhas: जम्मू काश्मीर संघात पाच वर्षांपासून बदल झाला; बीसीसीआय अध्यक्ष आणि मूळ जम्मूचे मिथुन मन्हास यांचे मतगेल्या महिन्याच्या अखेरीस कर्नाटकातील हुबळी येथे रणजी अंतिम सामना झाला. त्यात जम्मू-काश्मीर संघाने अनुभवी असलेल्या कर्नाटक संघाचा पराभव करून विजेतेपदाची मोहर उमटवली, असे त्यांनी सांगितले.
सुमारे सात दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर संघाने प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली, ही अत्यंत आनंददायक बाब आहे. हा अभूतपूर्व यश खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे, असे ते म्हणाले.
Team India: ८ महिन्यांनी कसोटी खेळायचंय, पण कर्णधार शुभमन गिल लागलाय तयारीला; खेळाडूंसाठी काय केल्या शिफारसी?या विजतेपदामुळे केवळ खेळाडू आणि प्रशिक्षकच नव्हे, तर जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकही आनंदित झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.