देशभराचे लक्ष लागलेल्या तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या निकालांची मतमोजणी ४ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतांची गणना केली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.