पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. त्यातील 180 पेक्षा जास्त जागांवर भाजप आघाडीवर आहे. 100 च्या आसपास जागांवर तृणमुल काँग्रेस आघाडीवर आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर बहुतांश एक्झिट पोल्सनी जो अंदाज वर्तवला होता, आता तसाच निकाल येताना दिसतोय.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय नेहमीच त्यांना मुस्लिम मतदारांची साथ मिळाली. पण भाजपने यावेळी त्यांना चांगलाच झटका दिला. त्यांची हक्काची मत हिसकावून घेतली. भाजपने हे कुठल्या नेत्यांच्या बळावर शक्य केलं, जाणून घ्या त्या बद्दल.
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे चेहरे प्रचारात आघाडीवर होते. भाजपने या दोन नेत्यांना पुढे केलं. पण पडद्यामागून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संघटनेचं काम चाललेलं. ही जबाबदारी काही नेत्यांवर देण्यात आलेली. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष या पश्चिम बंगालमधील नेत्यांनी खूप मेहनत केली. पण दुसऱ्या राज्यातून आलेले तीन नेते सुद्धा पडद्यामागून आखणी करण्यात महत्वाची भूमिका बजावत होते. पुढच्या लोकसभेच्या दृष्टीने भाजपसाठी पश्चिम बंगाल जिंकणं खूप महत्वाचं होतं.