मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
निलेश बुधावले, एबीपी माझा May 27, 2026 11:13 PM

Rohit Pawar : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात (धलगदल झीगमा)  घसरण होताना दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकणिकाणी मोर्चे निघत आहेत. काल नाशिक जिल्ह्यातील चांदवडला भव्य मोर्चा काढण्यात आला. अशातच आज जर  कांदा प्रश्नी तोडगा नाही निघाला तर कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चाचा पुढचा टप्पा पुण्यात असेल याची सरकारने नोंद घ्यावी अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी दिला आहे. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

काल चांदवड (Chandwad) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) आपली ताकद दाखवली, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन आज राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करत आहे, आज तोडगा निघाला तर ठीक अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चाचा पुढचा टप्पा पुण्यात असेल याची सरकारने नोंद घ्यावी असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. 

कांद्याला किमान 24 रुपयांचा हमीभाव तर विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान या मागणीसाठी आंदोलन

नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Agra National Highway) शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान (Subsidy) मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी (SP) आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि भास्कर भगरे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक (Traffic) पूर्णपणे कोलमडली होती. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला (Onion) बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Onion Farmers) याच प्रश्नावर आता महाविकास आघाडी (MVA) आक्रमक झाली असून राज्यात ठिकठिकाणी जोरदार रस्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.

शासकीय कांदा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, दरात वाढ करुनही प्रतिसाद नाही, बाजार समितीकडेच शेतकऱ्यांचा कल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.