Mango Export: जपानची भारतीय आंब्यांवर बंदी, या देशात कोणते आंबे निर्यात होतात ?
Tv9 Marathi May 29, 2026 01:45 AM

जपानने भारतीय आंब्यावर बंदी घातली आहे. या आधी साल १९८६ मध्ये फळ माशीच्या प्रादुर्भावाच्या केस उघड झाल्याने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर ही निर्बंध २० वर्षे जारी होते. नंतर जून २००६ मध्ये झालेल्या तपासणी स्पष्ट झाले की भारतीय आंब्याने आजार आणि जीवाणूंचा धोका नाही. त्यानंतर जपानने पुन्हा भारतीय आंबे आयात करणे सुरु केले. आता पुन्हा एकदा जपानच्या भारतीय आंब्यांवरील बंदीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. बंदीचा निर्णय ऐकल्यानंतर जपानने यंदा का बंदी घातली असा प्रश्न मनात निर्माण होतो ? भारतात कुठे होते आंब्यांची जास्त प्रोडक्शन आणि कोणत्या राज्या कोणता आंबा पिकवला जातो हे पाहूयात…

जापानने भारतीय आंब्यावर बंदी का घातली ?

इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार आंब्यांच्या निर्यातीच्या आधी जपानहून एक टीम येते आणि तपासणी करते. येथील वेपर हीट ट्रीटमेंटची तपासणी करते. या तपासणीत आंब्यांवर कीटकनाशकांचा परिणाम तर झालेला नाही ना ? याची तपासणी केली जाते. तसेच केमिकल वापरुन तो पिकवलेला नाही ना याची देखील तपासणी केली जाते. या वर्षी जपानी टीम तपासणीसाठी उत्तर प्रदेशातील रहमानपूर येथे दाखल झाली आणि त्यांना आंब्यात अनेक त्रूटी आढळल्या.

जपानची संघटना योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने परिपत्रक काढून म्हटले आहे की २५ मार्च,२०२५ वा त्यानंतर भारताद्वारा जारी प्रमाणपत्र असलेले आंब्यांच्या खेप स्वीकार केल्या जाणार नाहीत. संघटनेने हे देखील म्हटले आहे की भारतीय आंब्यांवर तोपर्यंत बंदी कायम असेल जोपर्यंत टोकिओचे अधिकारी आंब्याच्या मानकात सुधारणा झाल्याचे जाहीर करत नाहीत.

जपानमध्ये भारतीय आंब्यांना मोठी मागणी आहे.साल २०२५ मध्ये टोकिओने १५ लाख डॉलर किंमतीचे भारतीय आंब्यांची आयात केली होती.यात सर्वात जास्त प्रमाण गुजराच्या केसर जातींच्या आंब्यांचे होते. त्यांची किंमत २ लाख डॉलर होती.

जपान भारतीय आंब्यांचा मोठा खरेदीदार?

जपानने अलिकडे केलेल्या वक्तव्यानंतर जपान आता भारतीय आंब्यांचा सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे का ? याचे उत्तर नाही असे आहे. जपान आता भारतीय आंब्यांचा सर्वात मोठा खरेदीदार नाही. कारण जपान भारतासह अनेक देशांकडून आंबे खरेदी करत असतो.

थायलँड, तैवान, मेक्सिको आंब्याचा पुरवठा करतात. आता पाकिस्तान आणि व्हिएतनाम देखील आंबे एक्सपोर्ट करतात. तैवानने देखील टोकियोला आंब्याचा पुरवठा केला आहे.

जपानचा निर्णय भारतासाठी मोठा झटका ?

भारतीय आंब्यांवर निर्बंध लादण्याची घोषणा जपानने केली असली त्याचा फटका बसणार आहे. निर्यातदारांचे म्हणणे आहे की जपान जरी आंब्यांचा मोठा खरेदीदार नसला तरी ज्या प्रकारे पश्चिम आशियाती संघर्षाने व्यापाराला फटका बसला आहे तो पाहाता जपानच्या निर्णयाचा देखील फटका बसू शकतो. आंब्यांच्या निर्यातीत ३० टक्के घसरण झाली असताना आता जपानच्या निर्बंधाने आणखी मोठा झटका बसला आहे.

अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा यंदा आंब्यांच्या पिकाला मोठा फटका बसला असतानाच आता जपानने भारतीय आंब्याच्या खरेदीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. साल २०२५ मध्ये आंब्यांचा व्यापार ५६ दशलक्ष डॉलर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. केसर, अल्फान्सो, लंगडा आणि बंगनपल्ली सारखे आंबे जपानला निर्यात होत असतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.