फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय, राज्य सरकारचा जीआर
GH News October 10, 2024 04:12 PM

मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णय एका एसएमएसद्वारे आता जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार असून त्यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या जीआरनंतर मिंधे सरकारची उधळपट्टी असे म्हणत सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.’राज्यातील मिंधे भाजप सरकारने पाच दिवसांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तब्बल ९० कोटी रूपयांचे टेंडर काढले असताना आता मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेतले जाणारे निर्णय जनतेपर्यंत एसएमएसद्वारे पाठवण्यासाठी २३ कोटींची उधळपट्टी हे सरकार करत आहे’, असे विरोधकांनी म्हटले आहे. आता मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यत SMSच्या माध्यामातून पोहोचवण्यात येणार असल्याच्या कामासाठी टेंडर मागवले जाणार आहेत. माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाकडून ही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ हजार रुपये इतक्या खर्चाला आज सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.