Narayana Murthy: नारायण मूर्तींची सरकारच्या धोरणांवर टीका; देशातील गरिबी दूर करण्याचा सांगितला प्लॅन, म्हणाले...
esakal March 13, 2025 05:45 PM

Narayana Murthy On Freebies: Tycon Mumbai-2025 कार्यक्रमात इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती म्हणाले की, देशातील गरिबी मोफत योजना देऊन नाही तर नवनवीन उद्योजकांद्वारे रोजगार निर्मितीद्वारे कमी होईल.

या कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी उद्योजकांना अधिकाधिक कंपन्या आणि व्यवसाय निर्माण करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, जर आपण नाविन्यपूर्ण उद्योग निर्माण करू शकलो तर, गरिबी नाहीशी होईल.

संबोधित करताना नारायण मूर्ती म्हणाले, तुमच्यापैकी प्रत्येकजण लाखो रोजगार निर्माण करेल आणि अशा प्रकारे तुम्ही गरिबीची समस्या दूर कराल यात मला शंका नाही. तुम्ही मोफत योजना देऊन गरिबीची समस्या सोडवू शकत नाही. यात कोणताही देश यशस्वी झालेला नाही.

Poverty In India

इन्फोसिसच्या सह-संस्थापकाचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा देशात वस्तू मोफत देण्यावर आणि त्यांच्या किमतीवर वाद सुरू आहे. नारायण मूर्ती यांनी नंतर स्पष्ट केले की त्यांना राजकारण किंवा प्रशासनाबद्दल जास्त माहिती नाही परंतु त्यांनी धोरणात्मक चौकटीच्या दृष्टीकोनातून काही शिफारसी केल्या आहेत.

नारायण मूर्ती म्हणाले 200 युनिट मोफत वीज

म्हणाले की, फायद्यांच्या बदल्यात परिस्थितीतील सुधारणांचेही मूल्यमापन केले पाहिजे. दर महिन्याला 200 युनिट मोफत वीज देण्याचे उदाहरण देताना नारायण मूर्ती म्हणाले की, मुले जास्त अभ्यास करतात की नाही हे जाणून घेण्यासाठी राज्य अशा घरांमध्ये सहा महिन्यांनंतर सर्वेक्षण करू शकते. तसेच या योजनांचे पण सर्वेक्षण केले पाहिजे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.