जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे.
Pahalgam Terrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी भारतात दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते तातडीने भारतात परतले आहेत. जम्मु काश्मिरधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ते तातडीने भारतात आले आहेत. कालच्या हल्ल्यानंतर PM मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमित शाह हे श्रीनगरला गेले असून ते आज ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या घटनास्थळाला भेट देणार आहेत.