- वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी महिलांना देश सोडावा लागणार
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर पाकिस्तानी महिलांना भारत सोडून जावं लागणार
- नाशिक पोलिसांना मात्र फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून कोणतेही लेखी आदेश नाही
- फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून आदेश येताच नाशिक पोलिसांकडून आदेशाप्रमाणे केली जाणार कारवाई
- भारत - पाकिस्तान मधील तणावाच्या संबंधामुळे नाशिकमध्ये व्हिसा घेऊन राहणाऱ्या पाकिस्तानी महिलांना जावं लागणार मायदेशी
Ratnagiri: गणपतीपुळे मंदिरात खास आंब्यांची आरासरत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आज आकर्षक अशी फळांची आरास करण्यात आली आहे.
फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याची आरास आज गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलीय.
सध्या हापूस आंब्याचा सिझन आहे त्यामुळे गणरायाला आज ही आंब्याची आरास करण्यात आलीय.
हे आंबे नंतर भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातात.
Satara: मद्य धुंद पोलिसांनी झोपलेल्या व्यक्तीला चिरडलेकोरेगाव तालुक्यातील सर्कल वाडी येथील दुर्देवी घटना...
रमेश लक्ष्मण सपकाळ या व्यक्तीला रात्री उशिरा भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने घराच्या अंगणातच चिरडले...
अपघातात रमेश लक्ष्मण सपकाळ 45 यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू...
वाहन चालक असणारा पोलीस मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती..
डाळ मीलला आग, आगीत तीस लाखांचे साहित्य जळून खाकयवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंबोडा येथील मातोश्री उर्मीलाबाई राऊत दाल मील आणि ऑईलमीलला शाॅट सर्किटमुळे आग लागल्याने मील मधील चना डाळ, तूर डाळ आणि ऑईल संपूर्ण जळून खाक झाल्याने तीस ते चाळी लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती असून मध्यरात्री लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करित संपूर्ण मिल मधिल साहित्य जळून खाक झालीय.दरम्यान आर्णी नगर परिषदेचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा खामगाव येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेधजम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे आतंकवाद्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील खामगाव येथे हिंदू समाजाच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे.
सरकारने सर्व पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच योग्य ती पावले उचलावीत.
हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दहशतवादी विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात यावा.
तसेच कश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित रिते महाराष्ट्रात आणण्यात यावा अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळेस केली आहे.
Amravati: पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केले बंदचे आव्हानविश्व हिदू परिषद व बजरंग दलाने केले अमरावती बंदचे आव्हान
अमरावती शहरातील दुकान बंद ठेवून अमरावतीच्या राजकमल चौकात पहलगाम येथील झालेल्या हल्ल्याचा नोंदवणार निषेध....
अमरावतीमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ठेवले दुकान बंद......
याच अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये 2021 मध्ये रजा अकादमीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला होता.
त्यावेळी या ठिकाणी दंगल उसळली होती. त्यामुळे या बंदला पोलीस कशाप्रकारे हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
Nanded Band: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाकजम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप 28 जणांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला.
या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरात तीव्र निषेध करण्यात येतोय.
या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आलीय.
सर्व पक्ष संघटनाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आलाय.
या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. या बंदच्या पार्श्वभूमीवर दहा वाजता मोटार सायकल रॅली निघणार आहे.
या रॅलीत नांदेडकर मोठ्या संख्येने सहभागी होत घटनेचा निषेध करतील.
Dharashiv: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत धाराशिवमध्ये काढला कँडल मार्चपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिव मध्ये तिव्र निषेध करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला
तर छञपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले
सरकारने या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करुन बदला घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली.
यामध्ये शहरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Nagpur News: चामोर्शी भिवापूर मार्गे नागपूरला येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सचा मनोरा फाटावर अपघात- चामोर्शी भिवापूर मार्गे नागपूरला येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सचा मनोरा फाटावर अपघात होऊन रस्त्या लगतच्या नाल्यात पलटली.
- या अपघातात 35 ते 40 जण जखमी झाले.. तेच 7 ते 8 जणांना दुखापत झाली.. ही घटना बुधवारी दुपारी घडलीय.
- घटनेनंतर जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळली.
- या घटनेत ट्रॅव्हल्सची चालक सचिन धकाते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Nagpur: नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक- नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे... शिवदास ढवळे आणि सागर भगोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे...
- बोगस शिक्षक भरती प्रकरणी शालार्थ आयडी या शिक्षण विभागाच्या संगणकीय प्रक्रियेचा गैरवापर झाल्या प्रकरणी सध्या नागपूरच्या सायबर पोलिसांचा प्रकरणात समांतर तपास करत आहे...
- सायबर सेलने यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयात कर्मचारी असलेल्या शिवदास ढवळे तसेच मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या शालेय शिक्षक सागर भगोले या दोघांना अटक केली आहे...
याप्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह एकूण 7 जण आधीच अटकेत आहेत.
Pune: पुणे जिल्हा नियोजन समितीची आज बैठकबैठकीत 1,379 कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा मांडण्यात येणार
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे
जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत 1,256 कोटी रुपयांची वार्षिक आराखडा होता ..मात्र त्यात आता 123 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इतर विकास कामांबाबत चर्चा होणार आहे त्यासाठी स्थानिक आमदार खासदारांकडून कामांची यादी ही मागवली जाण्याची शक्यता आहे
Pune Latest News: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकालशाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगीनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेण्यात आली. पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
अंतरिम निकाल www. mscepune. in U https:// puppssmsce. in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
Pune News: पुण्यात आरोग्य भवनच्या इमारतीचे भूमिपूजनउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात आरोग्य भवनाच होणार भूमिपूजन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन २० रुग्णालयाचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर देखील कार्यक्रमाला उपस्थितीत
Dharashiv: धाराशिव शहरातील झोरे गल्लीतील नाली व रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेधाराशिव शहरातील झोरे गल्लीतील नाली व रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.
त्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर येत आहे तसेच डुक्करांचा वावर देखील वाढला आहे.
त्यामुळे रोगराई निर्माण होत असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे रखडले नालीचे व रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत नागरीकांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देखील दिले असुन लवकरात लवकर मागणीकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
Pandharpur: पहलगाम घटनेचा पंढरपुरात निषेध आंदोलनकाश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करत पाकिस्तान विरोधात आंदोलन केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केले.
यावेळी दहशतवाद्यांच्या प्रतिमांची होळी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली
Washim: पाणीटंचाईचा भीषण फटका; फुलावर आलेल्या मुगाच्या पिकात शेतकऱ्यांनी सोडल्या बकऱ्यावाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाच्या पेरणीला चांगला प्रतिसाद मिळालेला असताना अचानक उभी राहिलेली पाणीटंचाई शेतकऱ्यांसाठी मोठं संकट बनली आहे.
मुगाच पिकं फुलांवर असतानाच पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुगात चरण्यासाठी बकऱ्या सोडल्या आहेत.
ढिल्ली येथे बॅरेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळी पेरणी झाली होती.
यंदाही यंदाही सुमारे सुमारे २०० ते ३०० एकरवर पेरणी झालीये. मात्र, बॅरेज कोरडे पडल्यामुळे व विहिरी, कूपनलिकांमध्येही पाणी नसल्यानं सुमारे १०० एकरवरील पिके सुकली.
परिणामी, शेतकऱ्यांनी उत्पादनाची आशा सोडून उभ्या पिकातच गुरे व शेळ्या सोडल्या आहेत.
पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास, 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाशहरात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तसेच आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत.
हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो.
पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची संख्या
दीर्घ मुदतीच्या व्हिसावर - ३५ पुरुष, ५६ महिला
व्हिजिटर व्हिसावर - २० नागरिक
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये अडकलेले २३२ पर्यटक आज महाराष्ट्रात परतणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याच्या प्रक्रियेला आणखी गती दिली असून तिसऱ्या विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.
आज दुपारी ३ वाजता आणखी २३२ पर्यटक श्रीनगर येथून मुंबईकडे निघणार आहेत.
आपण उपलब्ध केलेल्या विमानांपैकी हे तिसरे विशेष विमान २३२ पर्यटकांना महाराष्ट्रात मोफत आणणार आहे.
Pune News: पुण्यात येथे पहलगाम हल्ल्याचा निषेधहल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या हत्येचा निषेध करण्यात आला
या हल्ल्यात पुण्यातील ही दोघांना आपला जीव गमावा लागला आहे
कोंढव्यात मुस्लिम बांधव यांनी कोणार्क इंद्रायू मॉल येथे निषेध आंदोलन केलं
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरसकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी
सकाळी आठ वाजता आरोग्य भवन भूमिपूजन कार्यक्रमाला आरोग्य मंत्री ही असणार उपस्थितीत
नऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक
साडे अकरा वाजता बालगंधर्व येथे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार
दुपारनंतर पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार असणार
Yavatmal: वणीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध, ठाकरे गट आक्रमकपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ यवतमाळच्या वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवासेना ठाकरे गटाच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करित आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
Solapur: वाढत्या उन्हामुळे लिंबाची आवक घटली, आवक घटल्याने लिंबाच्या दरात झाली वाढसोलापुरात तापमानाचा पारा दिवासेंदिवस चाळीशीच्या पल्याड जात आहे.
त्यामुळे बाजारात लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे.मात्र मागच्या कांही दिवसात लिंबाची आवक घटली आहे.
यामुळे लिंबाच्या दरात विक्रमी प्रमाणात वाढ झाल्याच चित्र दिसून येत आहे. याची झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागली आहे.
सध्या १ हजार रुपयाला १० किलो लिंबू तर किरकोळ बाजारात २० रुपयांना ३ लिंबू असा दर सुरु आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सफ्वसाधारणपणे ६ टन लिंबांची आवक होते.
मात्र मागच्या कांही दिवसांपासून ही आवक फक्त अडीच टनापर्यंत येऊन पोहोचली आहे.
Solapur: काश्मीरमध्ये 28 हिंदू पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमधील शिवसेना उबाठा झाली आक्रमकअक्कलकोटमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानाची अंत्ययात्रा काढून नोंदवण्यात आला निषेध
यावेळी भगव्या टोप्या घालून मोठ्या संख्येने शिवसैनिक या अंत्ययात्रेत सामील झाल्याचे चित्र दिसून आले.
ही अंत्ययात्रा काढल्यानंतर शिवसैनिकांनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानाच्या तिरडीला आग लावून राग व्यक्त केल्याचं दिसून आलं
Lonavala: पहलगाव येथे अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये जाहीर निषेध, सर्वपक्षीय निषेध सभेचे केले आयोजनकाश्मीर खोऱ्यामधील पहलगाव बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या बेचूट गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 पर्यटक जखमी झाले आहे.
पहलगाव येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्ष्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्ष नागरिक यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचेही आयोजन करण्यात आले होते.
भारत सरकारने ठोस पावले उचलत या अतिरेक्यांचा अड्डा असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी या निषेध मोर्चाच्या दरम्यान सर्वपक्षीयांनी केली आहे..
आतंकवादी कृत्याच्या निषेधार्थ देहूरोड व्यापारी संघटनेच्यावतीने आक्रोश मोर्चाकाश्मीरच्या पहेलगाव येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध देहुरोड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी शांततेची रॅली काढली.
या रॅलीत सहभागी व्यापाऱ्यांनी हातात फलक धरून शांततेचे आणि एकतेचे संदेश दिला..
कश्मीर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला केंद्र शासनाने सर्वतोपरीने प्रयत्न करून या घटनेतील हल्लेखोरांना कठोर शासन करावे अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली.
यावेळी देहूरोड शहरातील बाजारपेठेतून व्यापाऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला.
दरम्यान सुभाष चौक येथे दोन मिनिटे मोन पाळत आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करून मेणबत्ती लावण्यात आली या रॅलीमध्ये शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते...