- गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून सोडलं पाणी
- गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गोदामाई खळाळली
- नाशिकमध्ये रामकुंड, गोदाघाटाच्या परिसरात पाणी पातळीत वाढ
- गोदा घाटावरील लहान मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा
- पाण्यासोबत जलपर्णी देखील वाहून आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
- गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Live: काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चला नाशिकमधून होणार सुरुवात-काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चला आज नाशिकमधून सुरुवात होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता नाशिक शहरातील हुतात्मा स्मारकापासून संविधान सद्भावना मार्च निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सद्भावना मार्च निघेल. या यात्रेतून राज्यात शांती आणि सद्भावनेचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
Mumbai Live: कुर्ल्यात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीकुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी फेज-२ येथे दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी फेज-२ येथे दोन गटांनी एकमेकांवर हल्ला केला, ज्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. ही घटना विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Nashik Live: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गनाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने पाणी सोडण्यााच निर्णय घेतला.
Rahul Gandhi Live : राहुल गांधींची पंतप्रधान मोदींना विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंतीलोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्याची विनंती केली आहे. "या कठीण काळात, भारताने दाखवून दिले पाहिजे की आपण नेहमीच दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत," असे पत्रात म्हटले आहे.
Gujarat Live : अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपड्या पाडल्याअहमदाबाद महानगरपालिकेने (एएमसी) चांडोला तलावाजवळील बेकायदेशीर झोपड्या पाडल्या.सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) शरद सिंघल यांच्या मते, बहुतेक बांगलादेशी येथे राहत होते.
Sambhajiraje Chhatrapati : 'पहलगाम घटनेबाबत केंद्राने सखोल चौकशी करावी'; संभाजीराजे यांची मागणीकोल्हापूर : ‘आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सैन्यदल, पोलिस, सीआरपीएफ जवान यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. मात्र, त्यांनी प्रथमच पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. याची खोलवर चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी केली. ते ‘केडीसीए’ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
Bandra Showroom Fire : वांद्रेतील शोरूमला आग, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखलमुंबईतील वांद्रे येथील एका शोरूममध्ये आग लागली आणि आता संपूर्ण मॉलला आगीने वेढले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापूर : टेंबलाई रेल्वे फाटक येथील वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुंडाला शहरात फिरताना पोलिसांनी अटक केली. रविराज ऊर्फ राजा महेश कसबेकर (वय २७, रा. टेंबलाई रेल्वेफाटक नं. २, झोपडपट्टी जवळ, टाकाळा) असे त्याचे नाव आहे. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. कसबेकरला करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, तरीही तो शहरात फिरताना दिसून आला.
Tirupati Accident : तिरुपतीत भीषण अपघात; बंगळूरचे पाच ठार, दोन जण जखमीबंगळूर : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात बंगळूरमधील पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. कानिपाकम जवळील थोटापल्लीजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या मोटार चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपतीहून बंगळूरला परतणाऱ्या मोटारीची ट्रकला धडक झाली. यात मोटार पूर्णपणे चिरडली गेली.
Nagpur News : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यूनागपूर जिल्ह्याच्या दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले. चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या झटापटीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 18 ते 20 महिन्याचा हा वाघ आहे.
Pakistan YouTube Channel : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर बंदीनवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात जिओ न्यूज, डॉन, रफ्तार, बोल न्यूज, एआरवाय न्यूज, समा टीव्ही, सुनो न्यूज यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर या चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.
Jalna News : जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा जप्त; तीन संशयित आरोपी जेरबंदजालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. एका चारचाकी वाहनातून 85 किलो गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले. विजय गाडे, अमोल चांदणे आणि बाबासाहेब मुंजवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tahawwur Rana : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाच्या कोठडीत वाढनवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम बारा दिवसांनी वाढविण्यात आला आहे. अमेरिकेहून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या राणा याच्या कोठडीची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला आज पतियाळा हाऊस न्यायालयासमोर सादर केले होते. राणा हा चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ केली जावी अशी विनंती ‘एनआयए’कडून करण्यात आली होती. न्यायालयाने त्यावर राणा याची कोठडी वाढविली.
Bandra Croma Showroom : वांद्र्यात क्रोमा शोरुमला आग, कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्नवांद्र्यात क्रोमा शोरुमला आग लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Latest Marathi Live Updates 29 April 2025 : पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला. शत्रूसैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा आणि पूँच जिल्ह्यांत गोळीबार केला. या गोळीबाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी भर घालायला सुरुवात केली आहे. आता नौदलासाठी राफेल-एम ही लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. फ्रान्ससोबत त्यासाठी ६३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम बारा दिवसांनी वाढविण्यात आला आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मकाळ सोहळ्याचे आयोजन केले आहे. दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..