Maharashtra News Live Updates : शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे? उद्या सुनावणी होणार
Saam TV May 06, 2025 01:45 PM
Shivsena: शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे? उद्या सुनावणी होणार

शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे यावर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

सप्टेंबर २०२३ म्हणजे दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

एखादी केस लावून घेणे महत्वाचे वैगेरे ऐकले होते पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात यादीवर आणणे किती मोठे दिव्य असते हे यावेळी अनुभवले. इतके करूनही शिवसेनेची पिटिशन 43 क्रमांकावर लागलेली आहे त्यामुळे 7 तारखेला सुनावणी घ्या असे कोर्टासमोर उभे राहून सिनिअर कौन्सिल ने मुद्दाम मेन्शन केले पाहिजे.

पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावात सुकलेल्या गवताला अचानक आग

पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावात सुकलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना..आगीत शेतीपुरक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी

या आगीत शेतकरी धर्मेंद्र विलास शिंदे यांची शेतीची औजारे, दोन कडबाची गंजी यात ९०० कडबा, लाकडे,घराची लाकडे,औत, शेणखत,गव-या असे घराशेजारी ठेवलेल सामान जळून खाक झाल्याने ६० हजार रुपा्यांचे नुकसान झाले..

तर शेतकरी रुपाली गुलाब शिंदे यांचे केसरी आंबे,चिकू, दोन पेरुची झाडे जळून ४० हजार रुपयांचे नुकसान झाले

आगीचं कारण अद्याप असष्ट.

शंभर टक्के निकालात पुणे आघाडीवर

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात १ हजार ९२९ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, तर ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

विशेष म्हणजे,पुणे विभागात सर्वाधिक ३१० महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी ९२ महाविद्यालये लातूर विभागात आहेत.

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १४,४९६ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यात १६ महाविद्यालयांचा निकाल १ ते १० टक्के, ४३ महाविद्यालयांचा १० ते २० टक्के, ६२ महाविद्यालयांचा २० ते ३० टक्के, १०७ महाविद्यालयांचा ३० ते ४० टक्के, १७८ महाविद्यालयांचा ४० ते ५० टक्के, २८५ महाविद्यालयांचा ५० ते ६० टक्के, ५०४ महाविद्यालयांचा ६० ते ७० टक्के, ९६६ महाविद्यालयांचा ७० ते ८० टक्के, १,८०६ महाविद्यालयांचा ८० ते ९० टक्के, तर ४,५६२ महाविद्यालयांचा निकाल ९० ते ९९.९९ टक्के लागला.

महाराष्ट्राला दोन दिवसाचा यलो अलर्ट, पुणे वेधशाळेचा अंदाज

राज्यात दोन दिवसाचा येलो अलर्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज

पुढील 48 तास राज्यात सर्वंत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा पुणे वेध शाळेकडून इशारा

देशात जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंतच्या राज्यांत उद्यापासून पाऊस सुरु होत असून वादळीवारे अन् गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट

यवतमाळ जिल्ह्याला ५ दिवस अलर्ट जारी, उष्णतेच्या लाटेसह वादळ वारा आणि पावसाचा अंदाज

हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसह वादळ, वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील पाच दिवस हे चित्र कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दहा मे पर्यंत शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.शेतशिवारामध्ये तीळ, ज्वारी, मुंग, आंबा, भाजीपाला फुलशेती, भुईमुंग आहे. यातील तीळ, ज्वारी आणि मुंग ही पिके काढणीच्या अवस्थेत आहे.याचवेळी दाखल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन काढणीला आलेला पीक संरक्षित करावे अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहे.

पुणे शहरातील अतिक्रमणांवरील कारवाईचा अहवाल देण आता बंधनकारक

महापालिका आयुक्त यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर स्वतः आयुक्त ठेवणार लक्ष

शहरातील वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करत सविस्तर अहवाल आयुक्तांना दररोज देणे आता अधिकाऱ्यांना बंधनकारक

शहरातील अतिक्रमणांची संख्या वाढत असून, नागरिकांना पदपथांवरून चालणे अवघड झाले आहे. महापालिकेने कारवाईसाठी अनेक ठिकाणी स्थिर तसेच फिरती पथकेही नियुक्त केली आहेत.

मात्र, तरीही अतिक्रमणे होत असल्याने चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत

नक्षलवाद्यांशी संबंधित फरार आरोपीला पुण्यात अटक

नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ 'लॅपटॉप' खालापूर तालुक्यातील डोणवत गावात सुनील जगताप' या बनावट नावाने राहत होता. आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकवण्याचे ढोंग करत आपली खरी ओळख लपवत होता. मात्र पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि ४ मे रोजी अधिकृतपणे अटक केली आहे.

करमाळयात पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागणार्या दोघांना अटक

करमाळा येथील एका व्यवसायिकाला पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी जयवर्धन उर्फ मुन्ना दैन व प्रदीप पोळ याच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वांगी येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांना आरोपींनी पिस्तुल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागितली होती. तक्रारी नंतर पोलिसांनी एक पिस्तुल, पुंगी,तलवार आणि स्कार्पिओ गाडी जप्त केली आहे.

अकोल्यात वादळी वार्यासह पावसाची हजेरी

अकोला जिल्ह्यात काही तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. बार्शीटाकळी आणि तेल्हारा परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली, तर तेल्हारा तालुक्यात केळीच्या बागा जोराच्या वाऱ्यामुळे कोसळल्या आहे.. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं आहे.

तर बार्शीटाकळी महान रस्त्यावर वाऱ्यामुळं झाडे रस्त्यावर कोसळली होती... त्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. या परिस्थितीत काही युवकांनी पुढाकार घेत झाडांच्या फांद्या हटवून वाहतूकीचा रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली.

कुळाचे नाव कमी करण्यासाठी ४ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी व खाजगी लिपिक अटक

कुळाचे नाव कमी करण्यासाठी तक्रार दाराकडुन ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन ४ हजार रुपये स्विकारताना तलाठी व खाजगी लिपिकास धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.धाराशिव तालुक्यातील वाघोली गावचे तलाठी भुषण वशिष्ट चोबे व खाजगी लिपिक भारत मगर यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादळी वाऱ्याचे थैमान. वादळी वाऱ्यामुळे पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले. काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. नांदेड शहरात अनेक ठिकाणी पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर जिल्ह्यातील फळबागांचे देखील या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरावरची पत्रे देखील उडून गेली आहेत. जिल्ह्यात कुठेही पाऊस पडला नसला तरी वादळी वाऱ्याने वाऱ्याने मात्र मोठे थैमान घातले.

अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइनच होणार

महानगरपालिका क्षेत्रांसह आता ग्रामीण भागातील इयत्ता अकरावीचे प्रवेश देखील ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.राज्य सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय यापूर्वीच निघाला आहे.मात्र याला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना धडकल्याने हे प्रवेश आता ऑनलाइन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल लागण्याआधी आणि निकाल लागल्यानंतर अशी दोन वेळा नोंदणी करावी लागणार आहे. शिवाय इयत्ता बारावीसाठीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याने इतर मार्गाने प्रवेश घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन धाराशिव शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत.

उरणमध्ये भाजपाची ताकत वाढणार; शेकापाचे नेते म्हात्रेसह १५ नगरसेवक करणार भाजपात प्रवेश

शेतकरी कामगार पक्षाला पनवेल उरण खालापूर मध्ये मोठा धक्का बसला आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक 15 यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच भारतीय जनता पार्टीमध्ये सात मे रोजी पक्ष प्रवेश करत आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का बसलाय.

मानवनिर्मित पाणी कपात मागे घ्या, मनसेची पुणे आयुक्तांकडे मागणी

दक्षिण पुण्यात नागरिकांवर लादलेली पाणीकपात ही नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित आहे.

पाणीगळती, चोरी आणि प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अभावामुळे कृत्रिम टंचाईचा बोजा सामान्य जनतेवर टाकला जात आहे. ही अन्यायकारक पाणीकपात त्वरित मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

उड्डाण पुलावरून नागरिकांचा उलट प्रवास,सिंहगड रस्त्यावरील प्रकार

सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांनी चक्क यू टर्न घेऊन उड्डाण पुलावरून विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कमान च्या दरम्यान दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे.या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे रोजी झाल्यानंतर आहे त्यानंतर या उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.