"फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय" असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला
मात्र फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल
या हेतूने त्याने ११२ या क्रमांकावर पोलिसांना फोन केला
संतोष दत्तात्रय गायकवाड, (वय ३३) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
फोन करणाऱ्यांनी ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे. त्याची जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली
ती व्यक्ती किरकटवाडी, येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे मिळून आला
त्याच्याकडे चौकशी केली. त्या व्यक्तीने खोटे कॉल करत असल्याचे आढळून आले
Pune News: पुणे शहरात बेशिस्त वाहन चालक आघाडीवरशहरात गेल्या वर्षभरात ६४ हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
नियम मोडणाऱ्या ६४ हजार बेशिस्त वाहन चालकांवर RTO कडून कारवाई
RTO च्या फ्लाइंग स्क्वॉड कडून शहरभरात करण्यात आल्या कारवाया
२०२४-२५ या आर्थिक वर्षात फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या वाहतूक गुन्ह्यांच्या नोंदी
हेल्मेट न घालणे – १९,६४५
वेगमर्यादा ओलांडणे (स्पीड गन) – १३,८१७
अवैध विमा (इनव्हॅलिड इन्शुरन्स) – ८,७४४
सीट बेल्ट न वापरणे- ५,०८७
सिग्नल तोडणे / लेन कटिंग – ३,२०४
फॅन्सी नंबर प्लेट (५०/१७७ अंतर्गत) – ३,५८०
रिफ्लेक्टरशिवाय वाहन -४,२८५
चुकीचे पार्किंग – १,७७७
गाडी चालवताना मोबाईलचा वापर२ – २४३
टेल लॅम्प / ब्रेक लाइट काम करत नसणे – १,४४४
जास्त भार असलेले मालवाहू वाहन – १,३९२
तीन जणांनी दुचाकीवर बसणे – १,४३५
कळंब शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचे आ.कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरणधाराशिवच्या कळंब शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचे धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतुन कळंब मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प उभारण्यात आले आहे.या अनावरण कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Washim: वादळी वाऱ्याचा कहर, शेतकऱ्यांचे सौर पॅनल उडाले, लाखोंचा फटकावाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात काल सायंकाळी आलेल्या वादळवाऱ्याने गावातील पाच ते सहा शेतकऱ्यांचे सौर उर्जा पॅनल उडून गेले, काहींच्या पॅनलला मोठ्या प्रमाणावर तुटफुट झाली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानामुळे मोठा फटका बसला आहे. गणेश शिवदास माहूलकर, बबन कटूजी गायकवाड, महादेव रामजी भोंगळे, ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत आणि परशराम महादेवराव वाघ यांचे सोलर पॅनल पूर्णपणे क्षतीग्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली असून,शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Bhandara Unseasoanl Rain: भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी, शेकडो हेक्ट्ररमधील भातपीक धोक्यातमेघागर्जना आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली.
मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वेळोवेळी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं भात पिकासह पालेभाज्यांची शेतीही धोक्यात आली आहे.
काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टर मधील भात पीक जमीनदोस्त झाला आहे
आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला.
यामुळं हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
चोरट्याचा धुमाकूळ, वयोवृद्ध पती-पत्नीचा खून; पत्नीच्या डोक्यात कुकर, तर पतीला फेकले विहिरीतलातूरच्या गरसुळी इथ शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करून दागिने लंपास केल्याची धक्कादाय घटना घडली आहे...
तर या घटनेत चोरट्याने अत्यंत क्रूरपणे अर्धांगवायू झालेल्या वृद्ध व्यक्तीस खून करून जवळच असलेल्या विहिरीत फेकले आहे,तर वृद्ध महिलेचा डोक्यात कुकर घालून, दगडाने ठेचून तिचा खून केला. आणि चोरटा पसार झाला..
मात्र या घटनेची माहिती लागताच लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात आरोपीला गजाआड केले आहे...
दरम्यान आरोपी हा गावातीलच असल्याच पोलीस तपासात समोर आल आहे...
चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून केल्याच निष्पन्न झाल आहे.. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर 12 तासांत आरोपी पंडित रावणकोळे याला अटक करण्यात आली आहे..
मंगरुळपिर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर, वृद्धेच्या घराचे छत उडाले, एक जण जखमीवाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे मंगरुळपिर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चिखली झोलेबाबा या गावात चंद्रकला श्रीराम खंडारे (वय ७०) यांच्या घरावरचे छत वाऱ्याने उडून गेले.
त्यामुळे त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांच्यासमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर या घटनेत शेजारील नाना देवा खंडारे (वय ४०) यांच्या हातावर व डोक्यावर उडालेले टीन पत्रे पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रकला खंडारे या वयोवृद्ध महिलेने प्रशासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई तसेच मदत देण्याची मागणी केली जात आहे.
स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटोमागील भयानक वास्तव, सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस ?आशिया खंडातील सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठेत एक धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता. मात्र, एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्ही च्या कॅमेरात कैद झाले आहेत.
गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
सडलेले, नाशवंत टोमॅटो आणि भाजीपाला पुन्हा गोळा करून विक्रीस पाठवणे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोकादायक बाब आहे.
ग्राहकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, विशेषतः अतिशय स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याबाबत.
बाजार प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.
Akkalkot: अक्कलकोट तालुक्यात में महिन्यातच भरले साठवण तलावमें महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. घोळसगाव येथील साठवण तलाव ७५% भरला असून, येथील पाझर तलाव तब्बल १००% भरलेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे.
मे महिन्यात नेहमी कोरडी असणारी ही जलसाठ्ये यंदा पावसामुळे भरून निघाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातील पाणीटंचाईसारख्या समस्या काही अंशी टळण्याची शक्यता असल्याने ही स्थिती सकारात्मक मानली जात आहे.
ताज्या पावसामुळे शेतीच्या पूर्वतयारीस गती मिळणार असून,खरीप हंगामासाठी लाभदायक स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा जोर आणखी काही दिवस राहिल्यास तालुक्यातील इतर जलसाठ्यांनाही लाभ होणार आह
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवेच्या तीन तेरानवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनातले डॉक्टर हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी आयुक्तांकडे 4 डॉक्टर जणांनी अर्ज केला आहे
त्यात आरोग्य प्रशासनातले 5 डॉक्टर वॉर्ड ऑफिसर आणि उपायुक्त पदावर बसलेले आहेत
त्यामुळे आरोग्य सेवेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे तीन तेरा वाजले आहेत एकीकडे पावसाळा सुरू झालेला आहे त्यात कोरोनाची संख्या नवी मुंबईत वाढत आहे मात्र डॉक्टरांना उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी आणि मलाई खाण्यासाठी डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 11 जून पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेशहा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात.
अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते.
7 जून रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.
Amravati: अमरावतीत 2 लाखांचा सुगंधित गुटखा जप्तनागपुरी पोलिस स्टेशन हद्दीत अमरावती गुन्हे शाखा 1 ची कारवाई..
गुटख्याचे 3528 पॅकेट केले जप्त..
दोन आरोपी विरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..एक आरोपी अटकेत..
या कारवाई मुळे अमरावतीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले..
Amravati: अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीज पुरवठा बंदवीज वितरण महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात...
दुरुस्ती साठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे
पाऊस व वादळामुळे वीजपुरवठा प्रभावित होते त्यामुळे पावसाळा लक्षात घेता देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने अमरावती शहरातील विज पुरवठा करण्यात येणार बंद..
वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरण कंपनीकडून आवाहन
आजपासून सहा दिवस सकाळच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना त्रास होण्याची शक्यता
कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 ची निविदा निघाली, बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटकामेट्रो 14 मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ही मार्गिका सुरू झाली की दररोज 7 लाख प्रवाशांची ये-जा शक्य असेल.
खाडी पार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल.
या मेट्रोवर 15 स्थानके त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे.असणार आहेत.
बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल.
Panchvati Crime: पंचवटीमध्ये 19 वर्षीय मुलाचा टोळक्याने केलेल्या मारहाणीत खूनआठवडे बाजार मध्ये वडील सोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या 19 वर्षीय मुलाचा चार जनाचे टोळक्याने चाकू ने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना बुधवारी संद्याकाळी पंचवटीतील भाजी पटांगण परिसरात पुला खाली घडला.
नंद लाल उर्फ सूरज जगत दास रा.सीता गुंफा पंचवटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
सूरज वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेला होता वडील भाजी खरेदी करण्यास गेला होते.
सूरज गाडगे महाराज पुल खाली सुलभ जवळ उभा असताना चार संशयित आले.
पैशांची मागणी केली.देण्यास नकार दिला असता संशयिताने डाव्या बाजुला पोटात चाकू मारला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हीलमध्ये नेले उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टर ने मृत घोषित केले.
या बाबत पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे. संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.