Sanjay Raut’s taunt to Eknath Shinde over self-respect
Marathi May 31, 2025 01:25 AM


‘ईडी’ सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली.

(Sanjay Raut) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी प्रकाशन झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविली आहे. यासंदर्भात त्यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. माझे एकेकाळचे मित्र आणि त्याच काळातील शिवसेनेतील सहकारी एकनाथ शिंदे यांना ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची प्रत पाठवली. एकनाथ शिंदे आणि सुरत, गुवाहाटीला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळींनी हे पुस्तक जरूर वाचावे, असा आग्रहवजा आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे. (Sanjay Raut’s taunt to मराठी over self-respect)

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाला मोठी मागणी असल्याचे खासदार संजय राऊत यांनी काल, गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. अवघ्या दहा दिवसांमध्ये पुस्तक तीन वेळा छापावे लागले, हा मराठी पुस्तकांच्या बाबतीत विक्रमी प्रसंग आहे. ऍमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर चाललेले हे पुस्तक असून अजूनही देशातून, महाराष्ट्रातून याची मागणी होत आहे, असे ते म्हणाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पुस्तकाची प्रत पाठविताना सोबत एक पत्रही दिले आहे. त्यात संजय राऊत म्हणतात, ‘नरकातील स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. जावेद अख्तर, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी तसेच लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता.

‘ईडी’ सारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून, संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे, असे सांगतानाच, ईडी, सीबीआय वगैरे भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो, हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Maharashtra News : परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पहिली पसंती, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.