Maharashtra News Live Updates: निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी
Saam TV May 31, 2025 03:45 PM
किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

पहाटेपासून कारवाईला झाली सुरुवात

जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागावर कारवाई सुरू

31 मे पूर्वी गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली मुदत आज संपणार

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला होता आढावा

कोल्हापूर पोलिसांनी किल्ले विशाळगडावरील पोलीस बंदोबस्त वाढवला

निलेश चव्हाणला थोड्या वेळात पिंपरी चिंचवड पोलीस कोर्टासमोर हजर करणार

वैष्णवी हगवणे प्रकरणी अटक केलेल्या निलेश चव्हाणला थोड्या वेळात पिंपरी चिंचवड पोलीस कोर्टासमोर हजर करणार

सुट्टीच्या कोर्टात पुणे न्यायालयात निलेश चव्हाणची सुनावणी होणार

वैष्णवी हगवण्याचे बाळ घेऊन गेल्याचा आरोप निलेश चव्हाण वर असून तो फरार झाला होता त्याला पुणे पोलिसांनी नेपाळमधून अटक केली त्यानंतर आज कोर्टात हजर केला जाणार.

थोड्या वेळात निलेश चव्हाण ला सुट्टीच्या कोर्टात हजर केलं जाणार.

भंडाऱ्यात निसर्गापुढे शेतकरी हवालदील....उघड्यावर ठेवलेले धान पावसात भिजले

भंडाऱ्यात मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने धुमशाम बघायला मिळत आहेत. रखरखतं ऊन्ह आणि शरीराला बसणारे चटके यांना बेजार होणारा शेतकरी मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे रडकुंडीस आला आहे. कापणीयोग्य भातपीक जमीनदोस्त झाले, कापणी केलेले भातपीक पाण्याखाली आले आणि मळणी केलेले धान पाण्यात सापडल्याने अनेक ठिकाणी याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसल्याने ते आता चिंतेत सापडले आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक...

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचा वतीने करण्यात आले आहे.

बडतर्फ अधिकारी रणजीत कासलेवर बीडमध्ये दोन गुन्हे दाखल.

बडतर्फ अधिकारी रणजीत कासले सोशल मीडियावर भडकाऊ वक्त करत आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

त्यामुळे रणजीत कासलेवर आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत...

रणजीत कासले वर वेळीच पाय बंद घालावेत अशी मागणी देखील बीड करांनी केली आहे...

वेळेआधीच बरसलेल्या पावसामुळे कलिंगड शेतीचे नुकसान

मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळ बाबंडे येथील शेतकरी संभाजी साळवी यांनी साडे चार एकरामध्ये दोन लाख रूपये खर्च करून कलिंगड शेती केली होती. मात्र वेळेआधीच जोरदार बरसलेल्या पावसाने कलिंगड शेतीची पुरती वाट लावली आहे. या कलिंगड शेतीतून त्या शेतकऱ्याला सरासरी पाच लाखाचे उत्पन्न वर्षाकाठी मिळणार होते. मात्र वेळेआधीच कोसळलेल्या पावसाने कलिंगडाची पूर्णपणे नासधूस झाली. तर हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे कलिंगडच्या मागणीत घट झाली. त्यामुळे संभाजी साळवी या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या कणकवलीतील ‘सावडाव धबधब्यावर’ पर्यटकांची गर्दी

मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे कणकवलीतील प्रसिद्ध असलेला सावडावचा धबधबा ही पुर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. सावडाव धबधबा हा सिंधुदुर्गातील एक निवांत आणि निसर्गरम्य धबधबा असून यावर्षी पाऊस वेळेआधी सुरु झाल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे सर्वात सुरक्षित असणाऱ्या या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने दाखल होत आहेत.

राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा

राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा

मनसेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

4-5 दिवसांत मनसेचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे यांसारखे प्रकार सर्रास सुरू त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी राज्यपुरुष आयोगाची गरज

मनसे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र

देशभरात पुरुषांचा छळ आणि मानसिक अत्याचार याचे प्रमाण 51.5% असल्याचा पत्रात उल्लेख

मोफत वाळू धोरण अंमलबजावणीची प्रतीक्षाच

चिपळूण तालुक्यात 310 घरकुल मंजूर झाले आहेत. अनेकांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तालुक्यातील प्रमुख नद्यांमध्ये बांधकाम करण्यायोग्य रेतीसाठा असून लिलाव प्रक्रिया रखडल्याने बांधकामासाठी वाळूची प्रचंड मागणी लक्षात घेता वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. अवैधपणे रेतीचा उपसा आणि वाहतूक सुरूच असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. रेती घाटाचे लिलाव न झाल्याने किंवा शासन निर्णयाप्रमाणे दहा टक्के वाळू गट स्थानिक वापरासाठी आणि घरकुलांसाठी निश्चित निश्चितीकरण न झाल्याने वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. नव्या वाळू धोरणानुसार शासनाने घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा करून तसे शासन निर्णय निर्गमित केले. मात्र पावसाळा सुरू झाला तरी वाळू उपलब्ध होत नसल्याने मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार? असाच सवाल घरकुल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.

गावात दारू पिऊन याल तर एक हजार, विक्री केल्यास पाच हजार दंड

गावात अवैध दारू विक्री आणि पिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी करूनही काहीच होत नाही. त्यामुळे बिलोली तालुक्यातील गंजगाव ग्रामपंचायतीने दारुड्यांच्या विरोधात एक ठराव घेतला. गावात दारू विक्री केल्यास पाच हजारांचा दंड आणि दारू पिऊन येणाऱ्यास एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे.

तेलंगणा-मराठवाडा सिमेलगत असलेल्या अनेक गावांमध्ये सर्रासपणेअवैध दारूची विक्री होत आहे. दारू सेवन केल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येत असून काही गावात खुनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी गंजगावसह अन्य ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, बारा दिवसांपासून तुफान बॅटिंग

धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाचा प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतोय.धाराशिवच्या वाशी तालुक्यातील दसमेगाव गाव येथील सचिन कोठावळे या शेतकऱ्याच्या ड्रॅगन शेतीच पावसामुळे नुकसान झाले.फळ आणि फूल धरणाच्या अवस्थेत असलेल्या ड्रॅगनची वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेती जमीनदोस्त झाली.दहा ते बारा लाखांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अहिल्यादेवींचे 14 कोटींचे स्मारक अंतिम टप्प्यात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन बांधले जात आहे. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचे 21 फुटी पुतळ्यासह स्मारक उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी दीपमाळ, बारव अशा अनेक गोष्टी साकारण्यात येत आहेत. या स्मारकासाठी राज्य सरकारने 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.

निलेश चव्हाणचा माग कसा काढला?

25 मे ला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशने खाजगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झालं. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केला.

गोरखपूरमध्ये जिथं उतरला, त्यापुढं तो कुठं गेला? हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं.

पुढचं दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं.

30 मे ला पिंपरी चिंचवड पोलीस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथं पोहचले.

त्यावेळी तो तिथं निदर्शनास आला अन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवल्या

जालन्यातील अंबड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

जालन्यातील अंबड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. काल भरदिवसा अंबड तालुक्यात तीन गावात ५ ठिकाणी घरफोड्याच्या घटना समोर आल्या आहे. या घरफोड्यात सोने, चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.शिराढोण,पारनेर,किनगाव या गावांमध्ये पाच ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या आहे.अंबड तालुक्यातील शिराढोण येथील गणेश वाबळे हे शेतात कपाशी लागवडीसाठी गेले असता दुपारी त्यांचे घर फोडुन ९० हजार रोख, परमेश्वर वाबळे यांच्या घरातील रोख १० हजार ,सोने,चांदीचे दागिने तर रामेश्वर वाबळे यांच्या घरातील १५ हजार रोख,एक नथ अन्य वस्तू चोरिस गेल्या आहे.किनगाव येथील मोहन चौधरी यांचे घर फोडुन सोने, चांदी ,रोख असा अंदाजे साडेसहा ते सात लाखांचा ऐवज लंपास केला तर पारनेर येथील भगवान संसारे यांचे गावातील मध्यभागी असलेले घरफोडुन अंदाजे सहा लाखांचे सोने व रोख २३ हजार चोरीला गेले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे..

पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 25 हजाराची लाच, संशय येताच ठाण्यातून प्रसार

लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कार्यरत असणारा प्रतापसिंह रजपूत या पोलीस उपनिरीक्षकाने, अटकपूर्व जामीन अर्जामध्ये तक्रारदाराच्या बाजूने न्यायालयात रिपोर्ट देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्याकरिता 25 हजाराची लाच मागितली, मात्र संशय आल्याने चक्क ठाण्यातूनच या पोलीस उपनिरीक्षकाने पलायन केले आहे.. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती निमित्ताने यापुढे ग्रामपंचायतीतील महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी काम करणारया प्रत्येक ग्रामपंचायतील दोन महिलांना यापुढे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने त्याबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातल्या 55 हजार महिलांचा यापुढे सन्मान होणार असल्याचेही मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

सतीश वारजूरकर, संतोषसिंग रावत आणि सुभाष धोटे यांची हायकोर्टात धाव

- विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले महाविकास आघाडीतील उमेदवार सीसीटीव्ही फुटेजसाठी सतीश वारजूरकर, संतोषसिंग रावत आणि सुभाष धोटे यांची हायकोर्टात धाव...

- निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश...

- निवडणुकीशी संबंधित सीसीटीव्हीसह इतर व्हिडिओ फुटेज आणि १७ (सी) फॉर्मच्या प्रती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत.

- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी वारजूरकर, बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांनी रावत, तर राजुरा मतदारसंघात देवराव भोंगळे यांनी धोटे यांचा पराभव केला. त्यानंतर या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट प्रिंटर्स ही उपकरणे मतदानासाठी गोदामांतून बाहेर काढण्यापासून ते मतदानानंतर गोदामांत परत ठेवण्यापर्यंतच्या काळातील सीसीटीव्हीसह इतर सर्व व्हिडिओ फुटेज आणि १७ (सी) फॉर्मच्या प्रती मिळविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज सादर केले. परंतु, त्यांची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आली नाही.

Maharashtra News Live Updates: आमदार रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा

तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी

यावेळी दोघे कट्टर विरोधक आले आमने-सामने

रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनाला

दोघेही एकाच वेळी दर्शनाला आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले

रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही

यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित होते

जहाजांचे कॉम्पोनंट्स चोरी करणाऱ्या चौकडीला तुर्भे पोलिसांनी केली अटक

शिरवणे एमआयडीसी मधील टर्बोचार्जिंग कंपनी मध्ये जहाजांचे कॉम्पोनंट्स सर्व्हिसिंगची कामं केली जातात.. याच कंपनीच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कंपनीतून जहाजाचे 4 कंप्रेसर व्हील, 2 बेअरिंग सेट, 60 स्पेशल टूल्स, 1 इंडक्शन स्टोव्ह असा एकूण 93 लाख 18 हजार 137 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.. घटनास्थळ परिसरातील 40 सिसिटीव्ही तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी तुर्भे एमआयडीसी परिसरातून 4 आरोपीना अवघ्या 24 तासात अटक केली आहे... अटक चारही आरोपीना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या नेरुळ पोलिसांनी आवळाल्या मुसक्या

नेरुळ मध्ये घरफोडी केलेल्या सराईत गुन्हेगारांना नेरुळ पोलिसांनी 32 तासात अटक केली आहे. दोनही आरोपी पळून जात असताना त्यांना भुसावळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ सेक्टर 3 मध्ये घरफोडी करून सोने व रोख रक्कम असा एकूण 35 लाख 42 लाख रुपयांचा एवज चोरट्यांनी लंपास केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अस्लम इसराईल शेख आणि दिनेश कुमार नंदलाल सोनी या दोघांना अटक केली असून त्यांच्या जवळून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल रिकवर केला आहे... अस्लम इसराईल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशी, दहिसर, मुंबई अश्या विविध ठिकाणी तब्बल 16 गुन्ह्यांची नोंद आहे... न्यायालयाने आरोपिंना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई

जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने मोठी कारवाई करत तब्बल दोनशे गोण्या दहा टन बोगस डीएपी खत जप्त केलय. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी कंपनी मालकासह भोलेश्वर रामेश्वर छानछरीया आणि केशव सरोदे यांच्या विरोधात विविध कलमान्वये जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अशा प्रकारे बोगस डीएपी खत विक्री होत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे. या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाने कारवाई करत बोगस खत जप्त केला आहे..

पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात सोमवारी पाणीपुरवठा बंद

कांदिवली (पूर्व) येथे जलवाहिनी जोडणी व झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी पुरवठा राहणार बंद

सोमवार, २ जून दुपारी १.३० ते मंगळवार, ३ जून सकाळी ७.३० या दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा राहणार बंद

सिंहगड किल्ला नागरिकांसाठी पुढील 3 दिवस बंद

सिंहगड किल्ल्यावर सध्या अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील तीन दिवस – म्हणजे दि. 31 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.

या काळात पायवाटांद्वारे गडावर येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, ही विनंती. गडावर JCB किंवा अन्य मोठ्या वाहनांचा वापर शक्य नसल्यामुळे काही स्थायिक RCC (रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट) बांधकामे पूर्णपणे हटवणे बाकी आहे. ही सर्व कामे हातानेच करावी लागत असल्यामुळे कार्यवाहीस अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

शहरातील बेकायदा होर्डिंग विरोधात महापालिकेची धडक कारवाई

धानोरी येथे काही दिवसांपूर्वीच होर्डिंग कोसळले होते. सुर्दैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यापूर्वी होर्डिंग कोसळण्याच्या घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हकनाक जीव गेले आहेत. त्यानंतरही महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बेकायदा होर्डिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पुणे महानगरपालिकेकडून शहरातील या भागात करण्यात आली कारवाई

औंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाच होर्डिंगवर कारवाई

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचले

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचलेत. गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या.मग तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली अन पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.

मुसळधार पावसामुळे अंबरनाथ तालुक्यातील मोगरा शेती संकटात

यंदा हंगामापूर्वीच पावसाळा आल्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील मोगरा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. आधी कडक ऊन आणि नंतर मे महिन्यातच आलेला पाऊस यामुळे मोगऱ्याच्या कळ्या गळू लागल्या असून उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झालीये.

अंबरनाथ तालुक्यातील काराव गावातील कृषीभूषण पुरस्कार विजेते शेतकरी दिलीप देशमुख यांनी एक एकरात जवळपास चार हजार मोगऱ्याची रोपं लावली. त्यांना या रोपांपासून किमान दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मोगरा उत्पादन निम्म्याहून कमी झालय. दरवर्षी त्यांच्या बागेतील मोगरा दादर येथे विक्रीसाठी पाठवला जातो. यंदा मोगऱ्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम झालाय. त्यामुळे कृषी विभागाने मोगरा शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीय.

लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून एका सतरा वर्षे युवकाचा मृत्यू...

लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मुलगा पाण्यामध्ये बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहरातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अथांम प्रयत्ना नंतर मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढन्यात यश आले आला. निलेश शिंदे कासारवाडी पुणे वय सतरा असे त्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या दहा-बारा मित्रांबरोबर लोणावळ्यात पर्यटनासाठी आला होता. वरसोली इथून वलवन धरणाच्या मागील बाजूस ते गेले होते. त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यामध्ये ते पोहण्यासाठी पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे यांचा पाण्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

लक्ष्मण हाकेंना मिटकरींचे उत्तर

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यावरून आमदार म्हणून मिटकरींनी आता लक्ष्मण हाकेना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे?, असा सवाल मिटकरी यांनी केलाय. 2014 च्या निवडणुकीत सांगोल्यातून लढतांना लक्ष्मण हाकेने एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप आमदारअमोल मिटकरींनी केलाय.

मुंबई - नाशिक महामार्गांवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

रात्री च्या सुमारास मुंबई - नाशिक महामार्ग ओलांडताना एका अज्ञात वाहनाने साडे तीन वर्षाच्या नर बिबट्या ला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

शहापूर तालुक्यातील खर्डी वन परिक्षेतील मुंबई नाशिक महामार्गावर करंजपाडा जवळ रात्री च्या वेळी भक्षाच्या शोधात मुंबई नाशिक महामार्गा ओलांडत असताना अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या बाबत खर्डी वन विभागाला माहिती मिळताच तात्काल घटनास्थळी पोहोचून सदर बिबट्या ला वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याचा पशुसंवर्धन अधिकारी मार्फत शवविच्छेदन करून अग्नी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.

11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार....तुमसर येथील संतापजनक घटना

भंडाऱ्यातील तुमसर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अवघ्या ११ वर्षांच्या निष्पाप मुलीवर दि. १६ मे रोजी अत्याचार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तब्बल दोन आठवड्यांनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्राथमिक माहितीनुसार घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी समाजभिती आणि आरोपींकडून येणाऱ्या धमक्यांमुळे तक्रार करण्याचे टाळले. मात्र आरोपी थेट पीडितेच्या घरी जाऊन तिच्या पालकांना धमकावू लागला. या प्रकारानंतर भयभीत कुटुंबियांनी अखेर धैर्य एकवटत तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू. पंधरा दिवस झाले अजून तोडगा निघाला नाही

भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यसह मावळ मध्येही विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. पंधरा दिवस उलटूनही अजूनही सरकार दरबारी मार्ग निघाला नाही. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मोजणीचे काम ठप्प झाले आहे.आम्हा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र स्तरावर सुधारित वेतन श्रेणी लागू करावी. वर्ग तीन आणि वर्ग चार भरती प्रक्रिया लवकरात लवकर लागू करावी, अशा अनेक राज्य स्तरावरच्या मागण्या आहे.. मात्र राज्य सरकारने आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल मंत्री अतिशय चांगले काम करत आहे मात्र आमच्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे हे त्यांना दिसत नाही का. आम्ही सर्व कर्मचारी शेतकरी कुटुंबातील आहे. मंत्री महोदय साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख मधील बंधू-भगिनींना तांत्रिक वेतनाचा सुधारित वेतन श्रेणी असो किंवा आकृतीबंध असो, वर्ग तीन आणि वर्ग चार ची भरती प्रक्रिया असो अशा प्रमुख मागण्या मान्य करून कर्मचारी बंधू भगिनींना न्याय द्यावा असं मत पुणे जिल्हा कर्मचारी संघटना अध्यक्ष सदानंद मोरडे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे मात्र कर्मचाऱ्यांचा असाच संप सुरू राहिला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोजण्या लांबल्या आहेत. अनेक लोकांचे कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे मायबाप सरकारने लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले

अकोल्यात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला केलं ठार...

अकोल्यात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला ठार केलंय.. थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता, त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.. सुनील कमालकरनं असं मारेकरी काकाचं नाव आहे.. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकर याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.. दरम्यान, कुणाल बेपत्ता असल्याची तक्रारी खदान पोलीस ठाण्यात 4 दिवसांपूर्वी दाखल होती. मात्र, त्यानंतर अकोल्यातील पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपास दरम्यान हा काकानेच पुतण्याची हत्या केल्याचं उघड झालंय.. या प्रकरणात खदान पोलिस अधिक तपास करतायत..

मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं केलं शेतकऱ्यांचं स्वप्न मातीमोल

मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं केलं शेतकऱ्यांचं स्वप्न मातीमोल... शेतात डोलणाऱ्या ज्वारीच्या कणसांना फुटले कोंब.. काढणीचा खर्च निघणंही कठीण... काही कणसाला कोंब फुटले तर काहींची ज्वारी पडली काळी...

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातला ज्वारी उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत आहेये.. कारण, मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं स्वप्न मातीमोल केलंय.. उन्हाचा तडाखा सोसून शेतात डोलणाऱ्या ज्वारीच्या कणसांना आता कोंब फुटले आहे.. खर्च काढणही आता शेतकऱ्यांसाठी अवघड झालंय..

जोरदार पावसामूळ ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झालंये.. अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी कणसाला कोंब फुटले तर काहींची ज्वारी काळी पडली आहे.. या कोंबाकडे पाहून शेतकऱ्याचे डोळ्यात अश्रू येतायेत.....

आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांतून होत आहे....याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी...

*चौपाल* हिंगणी गावातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसोबत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.