Maharashtra News Live Updates: पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण, तीन डॉक्टरांवर कारवाई
Saam TV June 01, 2025 05:45 PM
Pune News: पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण, तीन डॉक्टरांवर कारवाई

बी. जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टर ६ महिन्यांसाठी निलंबित

निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी

शैक्षणिक व परिषदांतील सुद्धा या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणि प्रत्येकी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे

२८ एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने ४ दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली

डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले

PMPML: पुण्यात आजपासून पीएमपी प्रवास महागला

आजपासून नव्या दरांची अंमलबजावणी

पीएमपी प्रशासनाने प्रवासी भाड्यांमध्ये वाढ केली आहे

आज १ जूनपासून ती लागू झाली आहे

किमान तिकीट ५ रुपयांऐवजी आता १० रुपये झाले आहे

१ ते ५ किमी अंतरासाठी नव्या दरानुसार १० रुपये मोजावे लागतील

दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ झाली असून, एकत्रित दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १५०० रुपये इतका झाला आहे

मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सवलती पूर्ववत ठेवण्यात आल्या आहेत

शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या, दोघांना सहा महिन्याचा करावास

लातूरच्या मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता...

दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 5हजार रुपये दंड, आणि सहा महिन्याचा कारावास सुनावला आहे...

या खटल्यात पीडित मुलीचा जवाब आणि इतरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली, त्यामुळे दोषींना ही शिक्षा देण्यात आली आहे.

Ulhasnagar Crime: मोबाईल दुकानावर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण

नीरज यादव असं मोबाईल रिपेरिंग करणाऱ्या दुकानदाराचं नाव आहे,नीरज याच्याकडे मोबाईल डिस्प्ले बनविण्यासाठी तीन तरुण आले ,त्यांना 1500 रू खर्च लागेल असं सांगितलं, पुन्हा ते 5 ते 10 मिनिटाने दुकानात येऊन वाढीव किंमत का सांगितले यावरून वाद घातला,यावेळी त्या तीन तरुणांनी थेट कंबरेला लावलेला पट्ट्या ने नीरज याला बेदम मारहाण केली

उल्हासनगरमध्ये रफिक पार्सलवाल्याच्या गुंडगिरीचा कहर, युवकावर लाकडी बांबूने हल्ला, हात फ्रॅक्चर

उल्हासनगर कॅम्प 5 मधील बसंत बहार परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका युवकावर बांबूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अतिक खान (वय अंदाजे २८) या युवकावर रफिक पार्सलवाले गटाच्या ५ ते ६ जणांनी लाकडी बांबूने मारहाण केली.

या हल्ल्यात अतिकचा एक हात फ्रॅक्चर झाला असून दोन्ही पायांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

तीन दिवसाच्या संपानंतर अखेर अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मिटला

वर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची होती मागणी..

प्रत्येक वृत्तपत्रा पावने दोन रुपये दहा पैसे कमिशन देण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांची मागे

काल नागपूरला वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक झाली या बैठकीमध्ये तोडगा निघाल्याने अमरावती अमरावती शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मागे

अमरावती शहरात वृत्तपत्र वाटप सेवा पूर्ववत सुरू

वृत्तपत्र विक्रेते संपावर गेल्यामुळे जवळपास 60 हजार पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना बसला होता फटका.

आज अमरावती शहरात घरोघरी पोहोचत आहे वृत्तपत्र

सिहोरा येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अत्याचार करणाऱ्या युवकास अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना सिहोरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.

मंगेश रहांगडाले (२५) रा. सिहोरा, असे आरोपीचे नाव आहे.यातील आरोपी मंगेशने पिडीताच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचेवर अत्याचार केला.

आरोपी हा इतकेवरच थांबला नाही तर आरोपीने 'या बद्दल कोणालाही काहीही सांगितल्यास तुझी बदनामी करीन', अशी धमकी दिली.

पिडीतेसोबत घडलेला प्रकार पिडीतेच्या वडिलास माहिती झाल्यावर त्यांनी आरोपीस याबद्दल बोलले असता आरोपीने पिडीतेच्या वडिलाला सुद्धा बदनामीची धमकी दिली.

फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध सिहोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

परंडा तालुक्यात निसर्गाचा चमत्कार, दुधी गावात विना पंपाचे बोअरवेलमधुन मोठ्या दाबाने वाहु लागले पाणी

धाराशिवच्या परंडा तालुक्यातील दुधी येथे निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळत असुन शेतकरी उमेश जाधव यांच्या बोअरवेल मधुन विना पंपाचे मोठ्या दाबाने पाणी वाहु लागल आहे.

उमेश जाधव यांनी त्याच्या शेतात उन्हाळ्यात 250 फुट बोअर घेतला होता, गेल्या 10 दिवसापासून या बोअर मधुन विना पंपाचे तिन ते चार इंज पाणी मोठ्या दाबाने वाहत आहे.

तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने बोअरमधून पाणी वाहत असल्याचा अंदाज आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कारने 12 जणांना उडवलं

या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे.

त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५(ब), २८१ अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काल झालेल्या अपघातात ९ जणं जखमी झाले होते तर यातील २ जणं हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस आणि आयसर टेम्पोमध्ये भीषण अपघात

तलासरीच्या धुंदलवाडी येथील घटना.

मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर अपघात.

अपघातात खाजगी बस मधील वाहकाचा जागीच मृत्यू तर तीन प्रवासी जखमी.

रियाज असं मृत वाहकाचं नाव.

अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी.

सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

लता आणि करिष्मा हगवणेचा मोबाईल अखेर पोलिसांनी निलेश चव्हाण यांच्या घरातून केला जप्त

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक बंदूक असा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त केलेल्या मोबाईल मध्ये करिष्मा आणि लता हगवणे यांचा मोबाईलचा देखील समावेश आहे आणि ज्या बंदुकीच्या राखावर निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं होत.

ती बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर काल बावधन पोलिसांनी त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घराची झळती घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे

तुळजापुर ड्रग्स प्रकरणातील सेवन गटातील आरोपी विनोद गंगणे यांना जामीन मंजुर

तुळजापुर येथील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणात विनोद गंगणे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विनोद गंगणे मागील दीड महीन्यापासुन फरार असुन धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. व्ही व्ही टुशिंग व अॅड. अंगद पवार यांनी गंगणे यांची बाजु मांडली गंगणे यांनीच पोलिसांना टिप दिली असल्याने ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्याचा युक्तीवाद यावेळी गंगणे यांच्या वकिलांनी केला.

दरम्यान अंतिम सुनावणीला गंगणे यांना कोर्टात उपस्थित रहावे लागणार आहे.

14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथुन ड्रग्ससह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते या प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग असुन 19 आरोपी अटक आहेत तर 18 आरोपी अजूनही फरार आहेत.

वणी जवळ आढळल्या प्राचीन निरगुडा गावाच्या पाऊलखुणा

सातवाहन आणि काकटक या दोन हजार वर्षापूर्वीच्या काळात आजच्या यवतमाळच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे निरगुडा असे होते

त्यांच्या पाऊलखुणा ही अस्तित्वात असल्याचा दावा अभ्यासात प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे.

याच गावाच्या नावावरून वणीतून वाहणाऱ्या नदीला निर्गुडा हे नाव पडले

पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन या गावाचे नाव वणी पडले अशी माहिती प्राध्यापक चोपणे यांनी दिली

2025 मध्ये वणीचा इतिहास लिहिण्यासाठी चोपणे यांनी तालुक्याचे अभ्यासकार्य हाती घेतल्यानंतर निरगुडा हे गाव वणी शहराजवळ दक्षिणेला होते त्याचे काही पुरावे हाती लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री राठोड

यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळपास 70 कोटी रुपयांची कामे सिमेंट रस्ते सुरू आहे

या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणूक करून कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

महसूल येथे पालकमंत्र्यांनी यवतमाळ शहरात सुरू असलेली विकास कामे रस्ते व जिल्ह्यातील सिंचन सुविधाचा आढावा घेतला

त्यावेळी ते बैठकीत बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी विकास मिना, सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता यादी उपस्थित होते.

तुळजापुरात पावसाने पाझर तलाव फुटला, शेतकऱ्याची शेती आणि उभे पीक गेले वाहून, विहीर बुजली

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारातील तब्बल पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव पावसाने ओव्हर फ्लो होऊन फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेतजमीन व पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झालय. तलावाचा भरावाचा मलबा शेतात गेल्याने उसाच्या उभ्या पिकात पाच ते सहा फुटांचा थर साचला आहे.त्याखाली पिक गाडलं गेलं असून शेतकऱ्यांची विहीर बुजली आहे,पाईपलाईन वाहून गेली.पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगडगोटे पाहायला मिळत आहेत.

Ratnagiri: एकही रुपाया न भरता आता रत्नागिरीत उपचार होणार

एकही रुपया न भरता पुर्णत: मोफत उपचार सुविधा असलेले रुग्णालय रत्नागिरीत आजपासून सुरु होतय.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालय सुरू होतय.

गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी याउद्देशाने आम्ही मोफत रूग्णालय सुरू करण्यात आलय.

या मोफत रूग्णालयात शस्त्रक्रिया, ह्रदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा, बालरोग विभाग, युरॉलॉजी विभाग, नेत्ररोग सुरू करण्यात येणार आहेत.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने महाराष्ट्रात सुरू केलेले तिसरे मोफत रूग्णालय आहे.

Maharashtra Politics: आगामी निवडणुका संदर्भात खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात धुळ्यात ठाकरे सेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या या संदर्भातील विचार जाणून घेतले आहेत,

उत्तर महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठीच मी आलो असल्याचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले आहे, यावेळी खासदार संजय राऊत यांनी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे कानमंत्र देखील दिले आहेत, यावेळी या मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असल्याचे बघावस मिळाले आहे.

Deccan Queen Express: डेक्कन क्वीन ला आज 96 वर्ष पूर्ण

दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या ट्रेनला सुरू होऊन आज ९६ वर्ष पूर्ण होतायत.

पुणे, मुंबई या २ मेट्रो शहराला जोडणारी भावनिक दुवा असलेली ही ट्रेन अनेक पिढ्यांच्या आठवणींची साक्षीदार आहे.

रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित व लोकप्रिय ट्रेन पैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सेलिब्रेशन जोरदार केले गेले.

पुणे रेल्वे स्टेशन वर आज केक कापून उत्साहात डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले होते.

१ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.