आनंद परांजपे दीडदमडीचा प्राणी, सुनील तटकरेंनी अनेकांना फसवलं, आम्हालाही पाडण्याचा प्रयत्न केलाय
Marathi June 02, 2025 09:25 PM

महेंद्र दालवी: महाड येथील चांदे क्रीडांगणावर काल मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या 62 व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी आणि महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर सडकून टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांचा खरपूस समाचार घेतला. महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांना त्यांना मुघलांची उपमा दिली होती. यानंतर अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आनंद परांजपे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

कोण आनंद परांजपे? आनंद परांजपे हा दीडदमडीचा आहे, अस म्हणत महेंद्र दळवी यांनी आनंद परांजपे यांना खडेबोल सुनावले आहेत. सुनील तटकरे यांनी पाळलेले हे प्राणी आहेत. दुसऱ्या प्रवक्त्याने सुद्धा हे असे वक्तव्य करू नये. कारण सुनिल तटकरे यांना सुद्धा आमचा पूर्व इतिहास माहीत आहे, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांना दिलाय.

तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ

सुनिल तटकरे यांना आम्ही निवडून दिले आणि त्यांनी आम्हालाच पाडण्याचा प्रयत्न केला, अस गंभीर आरोप देखील महेंद्र दळवी यांनी केलाय. परांजपे यांनी 2029 ला सुनिल तटकरेच लोकसभेला निवडून येतील, असे वक्तव्य केले. या वक्तव्याला दळवी यांनी उत्तर देताना तटकरे यांनी आत्ताच राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान दिले आहे. सुनील तटकरे यापुढे निवडून आले तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. आता अशी वेळ राहिली नाही. त्यावेळी तशी परिस्थिती होती म्हणून आम्ही त्यांना मदत केली. परंतु, आता यापुढे असे होणार नाही, त्यांनी त्यांचा सगळा खेळ बंद करावा, असा सज्जड दम दळवी यांनी तटकरे यांना दिला आहे.

रायगडला भरत गोगावले यांच्या रूपानेच पालकमंत्रीपद मिळेल

रायगड पालकमंत्री पदाचा तिढा महायुतीत अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगड पालकमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत महेंद्र दळवी यांनी भाष्य केलंय. रायगडला भरत गोगावले यांच्या रूपानेच पालकमंत्रीपद मिळेल. आम्ही सगळे यासाठी आशावादी आहोत, असे दळवी यांनी म्हटले आहे. रायगड पालकमंत्री पदाचा तिढा महायुतीत नेमका कधी सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते आनंद परांजपे?

राष्ट्रवादी मुख्य प्रवक्ते आनंद परांजेपे यांनी म्हटलं होतं की, काल पुन्हा एकदा मुघलांच्या वंशाजांनी गरळ ओकली. 2029 साली सुनील तटकरे हेच लोकसभेत विजय होतील. ज्या रूमालाचा आपण उल्लेख केला. त्याच रुमालाने आपला चेहरा लपवून पुढील आयुष्य जगावे लागणार नाही ना? ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल. कायम सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका झाली. शिवसेनेचे मंत्री असतील, दोन्ही आमदार असतील, हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात. महेंद्र थोरवे यांचे खास आश्चर्य वाटते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून सांगतात. त्यांचा 2019 साली शिवसेनेत प्रवेश झाला. हे बाळासाहेबांचे संस्कार नाही. पण, तुमचे डान्सबारचे संस्कार नाचताना अखंड भारताने गुवाहाटीमध्ये बघितले आहे. त्यामुळे दोन्ही आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी अवकातीत राहा. सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका, असे त्यांनी म्हटले होते.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Maharashtra Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत वादाची पडणार ठिणगी; नेमकं कारण काय?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.